शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

यंदा सोयाबीन एकरी ५ क्विंटलच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 23:47 IST

शेतकऱ्यांसाठी दिवाळी बोनस अशी सोयाबीन पिकाची ओळख; पण यंदा कमी पावसामुळे जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादकांना हे दिवळी बोनस पीक पाहिजे तसे साथ देणार नसल्याची स्थिती आहे. यंदाच्या हंगामात सुरूवातीला पावसाने हुलकावणी दिल्यानंतर हंगामाच्या मध्यंतरी पुन्हा पाऊस लांबल्याने त्याचा परिणाम सोयाबीन पिकावर झाला.

ठळक मुद्देकृषी तज्ज्ञांचा अंदाज : अल्प पावसाचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आर्थिक फटका

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शेतकऱ्यांसाठी दिवाळी बोनस अशी सोयाबीन पिकाची ओळख; पण यंदा कमी पावसामुळे जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादकांना हे दिवळी बोनस पीक पाहिजे तसे साथ देणार नसल्याची स्थिती आहे. यंदाच्या हंगामात सुरूवातीला पावसाने हुलकावणी दिल्यानंतर हंगामाच्या मध्यंतरी पुन्हा पाऊस लांबल्याने त्याचा परिणाम सोयाबीन पिकावर झाला. जिल्ह्यात संध्या काही ठिकाणी अर्ली सोयाबीन सवंगणी व काढणीचे काम सुरू असली तरी यंदा जिल्ह्यात एकरी सरासरी ५ क्विंटलच सोयाबन होईल असा अंदाज कृषी तज्ज्ञांकडून वर्तविला जात आहे. उत्पादनातच घट येत असल्याने सोयाबीन उत्पादकांना आर्थिक फटकाच सहन करावा लागत आहे.यंदाच्या वर्षी जिल्ह्यातील आर्वी तालुक्यात १२ हजार ३५७ हेक्टर मध्ये सोयाबीनची लागवड करण्यात आली. तर आष्टी तालुक्यात ८ हजार ६७४ हेक्टरवर, कारंजा तालुक्यात १२ हजार ०१५०, वर्धा १८ हजार ८३५, सेलू ११ हजार ४००, देवळी १६ हजार ६५५, हिंगणघाट १५ हजार ५६ तर समुद्रपूर तालुक्यात २० हजार ५४२ हेक्टरवर सोयाबीनची लागवड शेतकऱ्यांनी केली. सुरूवातीला पावसाने हुलकावणी दिल्याने यंदा पेरणी कशी करावी, असाच प्रश्न शेतकऱ्यांना सतावत होता. दरम्यान समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणीच्या कामाला वेग दिला. त्यानंतर वेळोवेळी कमी अधिक प्रमाणात पाऊस झाल्याने पिकही बऱ्यापैकी वाढले. परंतु, ज्या वेळी सोयाबीन फुलावर आले त्याच वेळी पाऊस बेपत्ता झाला. आॅगस्ट महिन्यात सोयाबीन पीक शेंगा भरण्याच्या स्थितीत असताना पावसाने दडी मारली. त्यामुळे शेंगांमध्ये पाहिजे तसे दाणे भरली नाहीत. त्यामुळे सध्या उत्पादनात घट येत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. अतिशय मेहनत घेवून नापिकीची परिस्थिती ओढावल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.यंदाच्या वर्षी जिल्ह्यात वेळोवेळी पाहिजे तसा पाऊस न झाल्याने याचा विपरीत परिणाम सोयाबीन पिकावर झाल्याचे दिसून येत आहे. यंदाच्या वर्षी जिल्ह्यात सरासरी हेक्टरी १२ क्विंटल सोयाबीनचे उत्पन्न होण्याची शक्यता आहे. कमी पावसामुळे आष्टी तालुक्यात सर्वात कमी सोयाबीनचे उतारे येण्याची शक्यता आहे.- डॉ. विद्या मानकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वर्धा.आष्टी तालुक्यात सर्वात कमी उतारेजिल्ह्यातील आठही तालुक्यांमधील सोयाबीन पिकांच्या उताऱ्यांचा विचार केला असता हिंगणघाट, समुद्रपूर, सेलू, वर्धा, देवळी, आर्वी, कारंजा व आष्टी अशा उतरत्या क्रमानेच तालुक्यांमधील उत्पादनात घट येणार असल्याचे सांगण्यात येते. जिल्ह्याच्या सरासरीचा विचार केला असता हेक्टरी १२ क्विंटल सोयाबीन होण्याची शक्यता आहे. तर आष्टी तालुक्यातील शेतकऱ्यांना एकरी दोन क्विंटलच सोयाबीनचे उत्पन्न होण्याचे भाविक तज्ज्ञांकडून वर्तविले जात आहे.पावसाची माथ्याकडे पाठवर्धा जिल्ह्याचा माथा म्हणून आष्टी व कारंजा तालुका ओळखल्या जातो. परंतु, यंदाच्या वर्षी आतापर्यंत याच परिसराकडे पावसाने पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे या परिसरात जलयुक्त शिवार योजनेची मोठ्या प्रमाणात कामे झाली आहेत. परंतु, समाधानकारक पाऊसच या परिसरात झाल्या नसल्याने अनेक बांध व बंधारे सध्या तळ दाखवत आहेत. कमी पावसामुळे व भविष्यात जोरदार पाऊस न झाल्यास या भागातील नागरिकांसह शेतकºयांना जलसंकटाला सामोरे जावे लागणार आहे.नऊ ठिकाणी आढळले भेसळ बियाणेदोन शेतकºयांकडून बियाण्यांमध्ये भेसळ असल्याची तक्रार जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडे करण्यात आली आहे. तर कृषी विभागाच्या पाहणीत सात ठिकाणी भेसळ बियाणे आढळून आले आहेत. भेसळ बियाणे साहूर, धाडी, रुद्रापूर आदी ठिकाणी आढळून आले आहेत. त्या अनुषंगाने कृषी विभाग सध्या योग्य कार्यवाहीही करीत आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती