शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
2
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
3
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
4
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
5
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ
6
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
7
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
8
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
9
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
10
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
11
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
12
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
13
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
14
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
15
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
16
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
17
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
18
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
19
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
20
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली

यंदा सोयाबीन एकरी ५ क्विंटलच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 23:47 IST

शेतकऱ्यांसाठी दिवाळी बोनस अशी सोयाबीन पिकाची ओळख; पण यंदा कमी पावसामुळे जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादकांना हे दिवळी बोनस पीक पाहिजे तसे साथ देणार नसल्याची स्थिती आहे. यंदाच्या हंगामात सुरूवातीला पावसाने हुलकावणी दिल्यानंतर हंगामाच्या मध्यंतरी पुन्हा पाऊस लांबल्याने त्याचा परिणाम सोयाबीन पिकावर झाला.

ठळक मुद्देकृषी तज्ज्ञांचा अंदाज : अल्प पावसाचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आर्थिक फटका

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शेतकऱ्यांसाठी दिवाळी बोनस अशी सोयाबीन पिकाची ओळख; पण यंदा कमी पावसामुळे जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादकांना हे दिवळी बोनस पीक पाहिजे तसे साथ देणार नसल्याची स्थिती आहे. यंदाच्या हंगामात सुरूवातीला पावसाने हुलकावणी दिल्यानंतर हंगामाच्या मध्यंतरी पुन्हा पाऊस लांबल्याने त्याचा परिणाम सोयाबीन पिकावर झाला. जिल्ह्यात संध्या काही ठिकाणी अर्ली सोयाबीन सवंगणी व काढणीचे काम सुरू असली तरी यंदा जिल्ह्यात एकरी सरासरी ५ क्विंटलच सोयाबन होईल असा अंदाज कृषी तज्ज्ञांकडून वर्तविला जात आहे. उत्पादनातच घट येत असल्याने सोयाबीन उत्पादकांना आर्थिक फटकाच सहन करावा लागत आहे.यंदाच्या वर्षी जिल्ह्यातील आर्वी तालुक्यात १२ हजार ३५७ हेक्टर मध्ये सोयाबीनची लागवड करण्यात आली. तर आष्टी तालुक्यात ८ हजार ६७४ हेक्टरवर, कारंजा तालुक्यात १२ हजार ०१५०, वर्धा १८ हजार ८३५, सेलू ११ हजार ४००, देवळी १६ हजार ६५५, हिंगणघाट १५ हजार ५६ तर समुद्रपूर तालुक्यात २० हजार ५४२ हेक्टरवर सोयाबीनची लागवड शेतकऱ्यांनी केली. सुरूवातीला पावसाने हुलकावणी दिल्याने यंदा पेरणी कशी करावी, असाच प्रश्न शेतकऱ्यांना सतावत होता. दरम्यान समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणीच्या कामाला वेग दिला. त्यानंतर वेळोवेळी कमी अधिक प्रमाणात पाऊस झाल्याने पिकही बऱ्यापैकी वाढले. परंतु, ज्या वेळी सोयाबीन फुलावर आले त्याच वेळी पाऊस बेपत्ता झाला. आॅगस्ट महिन्यात सोयाबीन पीक शेंगा भरण्याच्या स्थितीत असताना पावसाने दडी मारली. त्यामुळे शेंगांमध्ये पाहिजे तसे दाणे भरली नाहीत. त्यामुळे सध्या उत्पादनात घट येत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. अतिशय मेहनत घेवून नापिकीची परिस्थिती ओढावल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.यंदाच्या वर्षी जिल्ह्यात वेळोवेळी पाहिजे तसा पाऊस न झाल्याने याचा विपरीत परिणाम सोयाबीन पिकावर झाल्याचे दिसून येत आहे. यंदाच्या वर्षी जिल्ह्यात सरासरी हेक्टरी १२ क्विंटल सोयाबीनचे उत्पन्न होण्याची शक्यता आहे. कमी पावसामुळे आष्टी तालुक्यात सर्वात कमी सोयाबीनचे उतारे येण्याची शक्यता आहे.- डॉ. विद्या मानकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वर्धा.आष्टी तालुक्यात सर्वात कमी उतारेजिल्ह्यातील आठही तालुक्यांमधील सोयाबीन पिकांच्या उताऱ्यांचा विचार केला असता हिंगणघाट, समुद्रपूर, सेलू, वर्धा, देवळी, आर्वी, कारंजा व आष्टी अशा उतरत्या क्रमानेच तालुक्यांमधील उत्पादनात घट येणार असल्याचे सांगण्यात येते. जिल्ह्याच्या सरासरीचा विचार केला असता हेक्टरी १२ क्विंटल सोयाबीन होण्याची शक्यता आहे. तर आष्टी तालुक्यातील शेतकऱ्यांना एकरी दोन क्विंटलच सोयाबीनचे उत्पन्न होण्याचे भाविक तज्ज्ञांकडून वर्तविले जात आहे.पावसाची माथ्याकडे पाठवर्धा जिल्ह्याचा माथा म्हणून आष्टी व कारंजा तालुका ओळखल्या जातो. परंतु, यंदाच्या वर्षी आतापर्यंत याच परिसराकडे पावसाने पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे या परिसरात जलयुक्त शिवार योजनेची मोठ्या प्रमाणात कामे झाली आहेत. परंतु, समाधानकारक पाऊसच या परिसरात झाल्या नसल्याने अनेक बांध व बंधारे सध्या तळ दाखवत आहेत. कमी पावसामुळे व भविष्यात जोरदार पाऊस न झाल्यास या भागातील नागरिकांसह शेतकºयांना जलसंकटाला सामोरे जावे लागणार आहे.नऊ ठिकाणी आढळले भेसळ बियाणेदोन शेतकºयांकडून बियाण्यांमध्ये भेसळ असल्याची तक्रार जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडे करण्यात आली आहे. तर कृषी विभागाच्या पाहणीत सात ठिकाणी भेसळ बियाणे आढळून आले आहेत. भेसळ बियाणे साहूर, धाडी, रुद्रापूर आदी ठिकाणी आढळून आले आहेत. त्या अनुषंगाने कृषी विभाग सध्या योग्य कार्यवाहीही करीत आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती