शहरं
Join us  
Trending Stories
1
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
2
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
3
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
4
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
5
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
6
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
7
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
8
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
9
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
10
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 
11
MI vs GT : 'पॉवरप्ले'मध्ये DSP सिराजचा धाक! पहिल्याच ओव्हरमध्ये साधला विकेट्सचा डाव
12
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
13
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
14
चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...
15
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
16
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?
17
जीवघेण्या फंगसचा अलर्ट! वाढत्या तापमानामुळे येईल नवं संकट; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा
18
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
19
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
20
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले

चुकीच्या अर्थामुळे अपंग कर्मचाऱ्यांवर अन्याय

By admin | Updated: September 18, 2015 01:54 IST

अपंग कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत. शासनाने अपंगांबाबत वेळोवेळी जारी केलेल्या शासन निर्णयांचा चुकीचा अर्थ लावला जात असल्याने ...

जि.प. प्रशासनाला साकडे : अपंग कर्मचाऱ्यांच्या समस्या निकाली काढण्याची मागणीवर्धा : अपंग कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत. शासनाने अपंगांबाबत वेळोवेळी जारी केलेल्या शासन निर्णयांचा चुकीचा अर्थ लावला जात असल्याने अपंग कर्मचाऱ्यांवर अन्याय होत आहे. शासन, प्रशासनाने याकडे लक्ष देत प्रलंबित समस्या निकाली काढाव्यात, अशी मागणी म.रा. अपंग कर्मचारी, अधिकारी संघटनेच्या प्रतिनिधी मंडळाने केली. याबाबत उपमुख्य कार्यकारी अधिकारी विवेक इलमे यांना निवेदनही सादर करण्यात आले.केंद्र व राज्य शासन वारंवार अपंगांच्या समान संधी, संपूर्ण सहभाग व हक्कांचे संरक्षण अधिनियम १९९५-९६ च्या १ नुसार तसेच त्यात वेळोवेळी सुधारणा करून कल्याणार्थ शासन निर्णय पारित करीत असते; पण त्या निर्णयांचा मोघम व चुकीचा अर्थ काही विभाग लावत आहे. यामुळे अपंग कर्मचारी पात्र लाभांपासून वंचित आहेत. ७ फेब्रुवारी १९९६ पासून पदोन्नतीद्वारे भरावयाच्या सर्व पदांची त्या तारखेपासून वर्षवार व प्रवर्गवार बिंदूनामावलीनुसार परिगणना करून पदे भरणे आवश्यक आहे. मागील सर्व अनुशेष भरणे गरजेचे आहे; पण बहुतांश विभागांनी तसे न करता अपंगांची पदे पदोन्नतीने भरताना वर्तमान उपलब्ध पदसंख्येनुसार अपंग कर्मचाऱ्यांची तीन टक्के पदे भरली. न्यायालयाचा आदेश असताना ७ फेबु्रवारी १९९६ पासून अपंगांचा अनुशेष न भरता अनुशेष भरल्याचे कळविले. सदर अनुशेष त्वरित भरण्यात यावा. अपंग कर्मचाऱ्यांची सेवाज्येष्ठता वैद्यकीय प्रमाणपत्राच्या दिनांकापासून ग्राह्य धरून त्यानुसार प्रसिद्ध करणे व पदोन्नती करणे गरजेचे होते; पण बऱ्याच विभागांनी सेवा रूजू तारखेनुसार ज्येष्ठता ठरवून चुकीच्या पद्धतीने पदोन्नती केली. यात पात्र कर्मचाऱ्यांवर अन्याय झाला. याबाबत निश्चित निर्णय घेत पात्र अपंग कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली.(कार्यालय प्रतिनिधी)