शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

पिसाळलेल्या श्वानांनी तोडले सात जणांचे लचके, जखमीत पाच बालकांचा समावेश

By चैतन्य जोशी | Updated: April 15, 2023 15:52 IST

रेहकी येथील घटनेने नागरिक भयभीत

वर्धा : पिसाळलेल्या मोकाट श्वानांनी गावात चांगलाच उच्छाद घातला असून, मोकाट श्वानांनी सात जणांचे लचके तोडून जखमी केले. विशेष म्हणजे जखमींमध्ये पाच बालकांचाही समावेश आहे. ही घटना रेहकी गावात शुक्रवारी घडली. या घटनेमुळे रेहकी गावातील नागरिक भयभीत झाले आहे.

प्राप्त माहितीनुसार, एक चिमुकली दुपारच्या सुमारास घरासमोरील अंगणात खेळत असताना एका श्वानाने अचानक तिच्यावर हल्ला केला. हल्ल्यात तिच्या चेहऱ्याला तसेच हाताला जखमा झाल्या. त्यानंतर त्या श्वानाने रस्त्यावरून जाणाऱ्या अंशू सुरेश मानके (७) याच्या हाताला चावा घेत लचका तोडला. तसेच अनुष्का दामोधर धाबर्डे (१०) हिच्या उजव्या हाताच्या दंडाला चावा घेत जखमी केले.

या घटनेमुळे गावातील नागरिक चांगलेच भयभीत झाले आहे. दरम्यान, पिसाळलेल्या श्वानाने रोशन दिलीप सराटकर (१०) यालादेखील चावा घेत जखमी केले. याच धडपडीत सिकंदर गोडघाटे नामक तरुणाच्या पायावरदेखील श्वानाने चावा घेतला. अखेर गावातील नागरिकांनी पिसाळलेल्या श्वानांचा बंदोबस्त करण्यासाठी पुढाकार घेत त्या पिसाळलेल्या श्वानाला यमसदनी पाठविले.

पुन्हा एका बालकावर केला हल्ला

शुक्रवारची घटना ताजी असतानाच शनिवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास एका पांढऱ्या रंगाच्या पिसाळलेल्या श्वानाने एका बालकावर हल्ला चढवला. मात्र, नागरिकांनी आरडाओरड केली असता झालेल्या झटापटीत तो बालक रस्त्यावर पडला. यात त्याच्या डोक्याला गंभीर मार लागला. सर्व जखमींना सेलू येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर जखमींना सुटी देण्यात आली.

गावकऱ्यांत दहशत, बंदोबस्ताची मागणी

मागील काही दिवसांपासून गावात पिसाळलेल्या मोकाट श्वानांनी चांगलाच धुमाकूळ घातला आहे. अशातच बालकांवर अचानक होणारे हल्ले गंभीर बाब आहे. त्यामुळे या पिसाळलेल्या श्वानांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी आता नागरिकांतून केली जात आहे.

टॅग्स :dogकुत्राAccidentअपघातwardha-acवर्धा