शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

जखमा झालेल्या पायांनी त्यांनी धरली गावाची वाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 05:00 IST

लॉकडाऊनमुळे अनेक जण आहे त्याच ठिकाणी अडकून आहेत. अनेकांनी लॉकडाउनच्या काळात घरचा रस्ता धरला. या राज्यातून त्या राज्यात, या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यात जाण्यासाठी प्रत्येकाची धडपड सुरू झाली. परवानगी मिळवून तर कधी परवानगीची प्रतीक्षा न करता घरच्या वाटा जवळ करणे सुरू झाले. अनेक जण गावी पोहोचले. अनेक जण आहे त्याच ठिकाणी थांबले.

ठळक मुद्देकामगारांची पायपीट कायमच : प्रशासनाने सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोनाने गावांच्या वाटा थांबविल्या. हजारो कामगार, विद्यार्थी आदी जागच्या जागेवरच थांबले. परतीचा प्रवास कधी करायला मिळणार, याची कुणालाही खात्री नव्हती. शासनाने परतीचे मार्ग सुरू केले. पण, त्यातही अडथळ्यांची शर्यत. यात मजुरांची परवड होत आहे. प्रखर उष्णतामान, चालताना रस्त्यांचे असह्य चटके सहन करीत मजुरांनी सुरू असलेली मजल-दरमजल शासन, प्रशासनाच्या उपाययोजनांकडे आशेने पाहत आहे.लॉकडाऊनमुळे अनेक जण आहे त्याच ठिकाणी अडकून आहेत. अनेकांनी लॉकडाउनच्या काळात घरचा रस्ता धरला. या राज्यातून त्या राज्यात, या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यात जाण्यासाठी प्रत्येकाची धडपड सुरू झाली. परवानगी मिळवून तर कधी परवानगीची प्रतीक्षा न करता घरच्या वाटा जवळ करणे सुरू झाले. अनेक जण गावी पोहोचले. अनेक जण आहे त्याच ठिकाणी थांबले. लॉकडाऊनचा कालावधी पुन्हा वाढला आणि सर्वांच्याच जिवाची घालमेल सुरू झाली. शासनाकडून परराज्यात, परजिल्ह्यात जाणाऱ्यांची व्यवस्था करण्यास सुरूवात झाली. त्याकरीता काही निमयावली लागू करण्यात आली. शासन उपाययोजना करीत असले तरीही मजुरांचे गावाकडे मार्गक्रमण सुरू आहे. अनेक जण मिळेल त्या वाटेने गावी जाण्याचा प्रयत्न करीत आहेत. वर्ध्यातही मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयापुढे यवतमाळ जिल्ह्यातून २४ कामगार आले. यवतमाळ जिल्ह्याच्या आणि तालुक्यातील एका भागात रस्त्याचे काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले.लॉकडाउनच्या सुरुवातीपासून आतापर्यंतचा काळ काढला. पण, आता खाण्यापिण्याचे वांधे होऊ लागल्याने परतीचा मार्ग धरल्याचे कामगारांनी सांगितले. ज्या कंत्राटदाराने कामावर आणले, तोही परराज्यातील आहे. एकमेकांच्या ओळखीने त्यांनी परतीचा प्रवास सुरू केला. मागील चार दिवसांपासून सातत्याने ते चालत आहेत. आज ते जिल्हाधिकारी कार्यालयापुढे रस्त्याच्या कडेला झाडाच्या सावलीत विसावलेत. यातील बहुतांश मजुरांचे पाय चालल्याने सुजले आहेत काहींनी पायाला झालेल्या जखमा चिंध्या गुंडाळून झाकल्या आहेत. या कामगारांना गावी जाण्यासाठी येथून वाहनाची सुविधा करून मिळेल, अशी अपेक्षा आहे.मदत मिळाली, गावी जाण्याची व्यवस्था हवीचालताना वाटेमध्ये मदत मिळाली. कुणी जेवण दिले तर कुणी पाणी दिले. पण, वाहन नसल्याने ही पायपीट असह्य होत आहे. अजूनही या कामगारांची गावे हजारो किलोमीटर दूर अंतरावर आहे. आताच पायाला दुखापत झाली आहे. पुढचा प्रवास तर असह्य वेदना करणारा ठरू शकतो. प्रशासनाने गावी जाण्याची सुविधा उपलब्ध करण्याची गरज व्यक्त होत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या