शहरं
Join us  
Trending Stories
1
राजेंद्र हगवणेला मदत करणाऱ्या चोंधेवर गुन्हा दाखल; सुयश चोंधेच्या पत्नीची बावधन पोलिसांकडे तक्रार
2
'व्हायरल व्हिडीओ बनावट,मी गाडीत नव्हतो'; महामार्गावर कांड करणाऱ्या नेत्याने काय सांगितले?
3
संभाजीनगरच्या उपजिल्हाधिकाऱ्याच्या घरी धाड, ५० लाखांचं सोनं, मोठं घबाड सापडलं
4
'दहशतवादी पुन्हा त्यांच्या अड्ड्यांवर येताहेत'; BSF ने सीमेवर घुसखोरी होण्याचा दिला इशारा
5
चेज मास्टर कोहलीनं अर्धशतकासह मोडला वॉर्नरचा विक्रम; मग अनुष्काची खास झलकही दिसली (VIDEO)
6
२९ पैकी १५ जखमा ताज्या; मारहाण करून वैष्णवीची हत्या केली, कसून चौकशी करा, कस्पटेंची मागणी
7
'अब की बार ९००० पार!' टी-२० क्रिकेट जगतात असा पराक्रम करणारा कोहली पहिला फलंदाज
8
...अन् रिषभ पंतनं कोलांटी उडी मारत व्यक्त केला शतकी खेळीचा आनंद (VIDEO)
9
अशोक सराफ यांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने गौरव, म्हणाले- "माझ्या जीवनातील विशेष क्षण..."
10
शेतजमीन वाटणीपत्राच्या दस्तावरील नोंदणी शुल्क माफ; वाचा मंत्रिमंडळाचे दहा महत्वाचे निर्णय
11
महाराष्ट्रातील 'या' भागांना अतिमुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी
12
Jyoti Malhotra: थेट आयएसआय एजंटसोबतच संपर्क! ज्योती मल्होत्राचे 'ते' चार मित्र कोण? 12 टीबी डेटा पोलिसांच्या हाती
13
धक्कादायक! त्याला वाटलं अ‍ॅसिडिटी झालीये, पण..., १३ वर्षांच्या विद्यार्थ्याचा गुजरातमध्ये मृत्यू
14
आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख वाढवली, जाणून घ्या कधीपर्यंत रिटर्न भरता येणार?
15
हेल्पलाईन नंबर सकाळी 9.45 ते सायंकाळी 06.15 या कार्यालयीन वेळेत सुरु; महिला आयोगाचे स्पष्टीकरण
16
लातुरमध्ये दोन तास धो-धो पाऊस, दुचाकी वाहिल्या तर चारचाकी तरंगल्या; घरांमध्ये पाणी शिरले
17
निर्णय मागे घ्या, नाहीतर अणुबॉम्ब टाकेन; किम जोंग उनची अमेरिकेला थेट धमकी! कारण काय?
18
Shalarth ID Ghotala: दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचे पुनर्मुल्यांकनाचे काम रखडणार, नवी गुणपत्रिका कोण बनविणार?
19
Yuzvendra Chahal Shashank Singh, IPL 2025: "पंजाब किंग्जसाठी युजवेंद्र चहल आणि टीम बसचा ड्रायव्हर एकसमान"; शशांक सिंगचे विधान व्हायरल
20
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! उद्यापासून २४ तास 'या' भागातील पाणीपुरवठा राहणार बंद

जखमा झालेल्या पायांनी त्यांनी धरली गावाची वाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 05:00 IST

लॉकडाऊनमुळे अनेक जण आहे त्याच ठिकाणी अडकून आहेत. अनेकांनी लॉकडाउनच्या काळात घरचा रस्ता धरला. या राज्यातून त्या राज्यात, या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यात जाण्यासाठी प्रत्येकाची धडपड सुरू झाली. परवानगी मिळवून तर कधी परवानगीची प्रतीक्षा न करता घरच्या वाटा जवळ करणे सुरू झाले. अनेक जण गावी पोहोचले. अनेक जण आहे त्याच ठिकाणी थांबले.

ठळक मुद्देकामगारांची पायपीट कायमच : प्रशासनाने सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोनाने गावांच्या वाटा थांबविल्या. हजारो कामगार, विद्यार्थी आदी जागच्या जागेवरच थांबले. परतीचा प्रवास कधी करायला मिळणार, याची कुणालाही खात्री नव्हती. शासनाने परतीचे मार्ग सुरू केले. पण, त्यातही अडथळ्यांची शर्यत. यात मजुरांची परवड होत आहे. प्रखर उष्णतामान, चालताना रस्त्यांचे असह्य चटके सहन करीत मजुरांनी सुरू असलेली मजल-दरमजल शासन, प्रशासनाच्या उपाययोजनांकडे आशेने पाहत आहे.लॉकडाऊनमुळे अनेक जण आहे त्याच ठिकाणी अडकून आहेत. अनेकांनी लॉकडाउनच्या काळात घरचा रस्ता धरला. या राज्यातून त्या राज्यात, या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यात जाण्यासाठी प्रत्येकाची धडपड सुरू झाली. परवानगी मिळवून तर कधी परवानगीची प्रतीक्षा न करता घरच्या वाटा जवळ करणे सुरू झाले. अनेक जण गावी पोहोचले. अनेक जण आहे त्याच ठिकाणी थांबले. लॉकडाऊनचा कालावधी पुन्हा वाढला आणि सर्वांच्याच जिवाची घालमेल सुरू झाली. शासनाकडून परराज्यात, परजिल्ह्यात जाणाऱ्यांची व्यवस्था करण्यास सुरूवात झाली. त्याकरीता काही निमयावली लागू करण्यात आली. शासन उपाययोजना करीत असले तरीही मजुरांचे गावाकडे मार्गक्रमण सुरू आहे. अनेक जण मिळेल त्या वाटेने गावी जाण्याचा प्रयत्न करीत आहेत. वर्ध्यातही मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयापुढे यवतमाळ जिल्ह्यातून २४ कामगार आले. यवतमाळ जिल्ह्याच्या आणि तालुक्यातील एका भागात रस्त्याचे काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले.लॉकडाउनच्या सुरुवातीपासून आतापर्यंतचा काळ काढला. पण, आता खाण्यापिण्याचे वांधे होऊ लागल्याने परतीचा मार्ग धरल्याचे कामगारांनी सांगितले. ज्या कंत्राटदाराने कामावर आणले, तोही परराज्यातील आहे. एकमेकांच्या ओळखीने त्यांनी परतीचा प्रवास सुरू केला. मागील चार दिवसांपासून सातत्याने ते चालत आहेत. आज ते जिल्हाधिकारी कार्यालयापुढे रस्त्याच्या कडेला झाडाच्या सावलीत विसावलेत. यातील बहुतांश मजुरांचे पाय चालल्याने सुजले आहेत काहींनी पायाला झालेल्या जखमा चिंध्या गुंडाळून झाकल्या आहेत. या कामगारांना गावी जाण्यासाठी येथून वाहनाची सुविधा करून मिळेल, अशी अपेक्षा आहे.मदत मिळाली, गावी जाण्याची व्यवस्था हवीचालताना वाटेमध्ये मदत मिळाली. कुणी जेवण दिले तर कुणी पाणी दिले. पण, वाहन नसल्याने ही पायपीट असह्य होत आहे. अजूनही या कामगारांची गावे हजारो किलोमीटर दूर अंतरावर आहे. आताच पायाला दुखापत झाली आहे. पुढचा प्रवास तर असह्य वेदना करणारा ठरू शकतो. प्रशासनाने गावी जाण्याची सुविधा उपलब्ध करण्याची गरज व्यक्त होत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या