शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
2
आजचे राशीभविष्य, ११ ऑगस्ट २०२५: विविध लाभ, मान-सन्मानाचा दिवस; संयम राखा, शांत राहा
3
नेत्यांना घेऊन जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग; खासदार म्हणाले - आम्ही थोडक्यात बचावलो!
4
भारत जगात सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था; ट्रम्प यांच्या 'डेड इकॉनॉमी'ला अप्रत्यक्ष उत्तर
5
शरद पवारांनी निवडणूक आयोग-पोलिसांकडे तक्रार का केली नाही? : फडणवीस
6
श्रावण संकष्ट चतुर्थी: यशोदामातेने केले होते व्रत, इच्छा होतील पूर्ण; यंदा विशेष अंगारक योग
7
गरज पडल्यास कबुतरखान्यासाठी शस्त्र उचलणार; जैन मुनी नीलेशचंद्र विजय यांच्या वक्तव्याने नवा वाद
8
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
9
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
10
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
11
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
12
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
13
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
14
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
15
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
16
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
17
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
18
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
19
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
20
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका

‘गाळमुक्त धरणा’ची कामे केवळ ४.८० टक्केच पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 22:18 IST

गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार ही शेतकरी हितार्थ असलेली योजना यंदा वर्धा जिल्ह्यात तिसऱ्यांदा राबविली जात आहे. यंदाच्या वर्षी तब्बल ४८ कामे हाती घेण्यात आली आहे; पण केवळ २० कामांचा श्रीगणेशा वेळीच करण्यात आल्याने हे काम ढेपाळल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. विशेष म्हणजे सध्या केवळ ४.८० टक्के काम झाले आहे.

ठळक मुद्देसंडे अँकर । ४८ पैकी केवळ २० कामे सुरू, कामांना वेळीच गती देण्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार ही शेतकरी हितार्थ असलेली योजना यंदा वर्धा जिल्ह्यात तिसऱ्यांदा राबविली जात आहे. यंदाच्या वर्षी तब्बल ४८ कामे हाती घेण्यात आली आहे; पण केवळ २० कामांचा श्रीगणेशा वेळीच करण्यात आल्याने हे काम ढेपाळल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. विशेष म्हणजे सध्या केवळ ४.८० टक्के काम झाले आहे.हिंगणघाट तालुक्यातील सावली (वाघ) येथील गाव तलाव गाळमुक्त करण्याचे काम सध्या ४०.५८ टक्के पूर्ण झाले आहे. तर याच तालुक्यातील लघुसिंचन तलाव धामणगावचे काम ३.३३ टक्के झाले आहे. साठवण तलाव आर्वी (छ.) ५५.५६ टक्के झाले. तर लघुसिंचन तलाव सेलू (मु.), गाव तलाव चिकमोह, पाझर तलाव उमरी (येंडे), साठवण तलाव कानगाव व साठवण तलाव भैय्यापूरचे काम अद्यापही सुरू झालेले नाही. शिवाय समुद्रपूर तालुक्यातील गावतलाव साखरा २३.३३ टक्के, गाव तलाव पिंपळगाव ७६.६७ टक्के, साठवण तलाव गिरड-१०.० टक्के, गावतलाव समुद्रपूर ५.५० टक्के, लघुसिंचन तलाव नंदोरी ६.०० टक्के, पाझर तलाव मंगरूळ ३.३३ टक्के काम झाले आहे. तर साठवण तलाव पिंपरी, साठवण तलाव गिरड-२, गावतलाव दसोडा-२, गावतलाव कानकाटी येथून गाळ काढण्यास सुरूवात करण्यात आलेली नाही. देवळी तालुक्यातील गाव तलाव कोळोणा (चो.) ६०.०० टक्के, पाझर तलाव कोल्हापूर (राव) १४.०० टक्के काम झाले आहे. तर पाझर तलाव गौळ येथून मुठभरही गाळ काढण्यात आलेला नाही.आष्टी तालुक्यातील लघुसिंचन तलाव पांढुर्णा, पाझर तलाव तळेगाव (श्या.पंत.), साठवण तलाव इंदरमारी येथून एक मिटरही गाळ काढण्यात आलेला नाही. आर्वी तालुक्यातील पाझर तलाव आजनगाव ३५ टक्के गाळ काढण्यात आला आहे. तर पाझरतलाव सालधरा, पाझर तलाव पांझरा (बो.), लघुसिंचन तलाव काकडधरा, लघुसिंचन तलाव गौरखेडा येथून गाळ काढण्याच्या कामाला सुरूवात झालेली नाही. लघुसिंचन तलाव आजनादेवी ३० टक्के, लघुसिंचन तलाव ठाणेगाव २ टक्के गाळ काढण्यात आला आहे. तर लघुसिंचन तलाव पिपरी, पाझर तलाव आगरगाव, गावतलाव बांगडापूर, लघुसिंचन तलाव सेलगाव, लघुसिंचन तलाव सुसुंद्रा, साठवण तलाव बोंदरठाणा येथून गाळ काढण्यात आलेला नाही.केळझरच्या दोन तलावातून काढला १०० टक्के गाळसेलू तालुक्यातील गाव तलाव केळझर व गणेश तलाव केळझर येथून १०० टक्के गाळ काढण्यात आला आहे. असे असले तरी गाव तलाव सोंडी, ल.पा. तलाव पांझरा बोधली, ल.पा. तलाव कुºहा, ल.पा. तलाव दहेगाव (गोंडी), ल.पा. तलाव आष्टी, सेलू तालुक्यातील मदन प्रकल्प, समुद्रपूर तालुक्यातील पोथरा प्रकल्प, कारंजा तालुक्यातील कार नदी प्रकल्प, आर्वी तालुक्यातील सुकळी ल.पा. प्रकल्पातून मुठभरली गाळ काढण्यात आलेला नाही.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई