शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
2
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
3
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
4
Anaya Bangar: संजय बांगरची ट्रान्सजेंडर मुलगी अनाया बांगरची BCCI कडे खास मागणी, म्हणाली- 'मला सहानुभूती नकोय, पण..."
5
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
6
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
7
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
8
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
9
रायगडात धो धो पाऊस, शाळा, कॉलेजनां सुट्टी, अलिबाग-रोहा , पाली खोपोली रस्ता वाहतुकीस बंद
10
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
11
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
12
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
13
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
14
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
15
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान
16
Maharashtra Rain Alert: ठाणे, पुण्यासह पाच जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
17
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
18
"जे काही होतं सगळं जवळच्यांना दिलं, आता मला...", अभिषेक बच्चनची 'ती' पोस्ट चर्चेत, नेमकं म्हणायचंय काय?
19
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
20
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर

‘गाळमुक्त धरणा’ची कामे केवळ ४.८० टक्केच पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 22:18 IST

गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार ही शेतकरी हितार्थ असलेली योजना यंदा वर्धा जिल्ह्यात तिसऱ्यांदा राबविली जात आहे. यंदाच्या वर्षी तब्बल ४८ कामे हाती घेण्यात आली आहे; पण केवळ २० कामांचा श्रीगणेशा वेळीच करण्यात आल्याने हे काम ढेपाळल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. विशेष म्हणजे सध्या केवळ ४.८० टक्के काम झाले आहे.

ठळक मुद्देसंडे अँकर । ४८ पैकी केवळ २० कामे सुरू, कामांना वेळीच गती देण्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार ही शेतकरी हितार्थ असलेली योजना यंदा वर्धा जिल्ह्यात तिसऱ्यांदा राबविली जात आहे. यंदाच्या वर्षी तब्बल ४८ कामे हाती घेण्यात आली आहे; पण केवळ २० कामांचा श्रीगणेशा वेळीच करण्यात आल्याने हे काम ढेपाळल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. विशेष म्हणजे सध्या केवळ ४.८० टक्के काम झाले आहे.हिंगणघाट तालुक्यातील सावली (वाघ) येथील गाव तलाव गाळमुक्त करण्याचे काम सध्या ४०.५८ टक्के पूर्ण झाले आहे. तर याच तालुक्यातील लघुसिंचन तलाव धामणगावचे काम ३.३३ टक्के झाले आहे. साठवण तलाव आर्वी (छ.) ५५.५६ टक्के झाले. तर लघुसिंचन तलाव सेलू (मु.), गाव तलाव चिकमोह, पाझर तलाव उमरी (येंडे), साठवण तलाव कानगाव व साठवण तलाव भैय्यापूरचे काम अद्यापही सुरू झालेले नाही. शिवाय समुद्रपूर तालुक्यातील गावतलाव साखरा २३.३३ टक्के, गाव तलाव पिंपळगाव ७६.६७ टक्के, साठवण तलाव गिरड-१०.० टक्के, गावतलाव समुद्रपूर ५.५० टक्के, लघुसिंचन तलाव नंदोरी ६.०० टक्के, पाझर तलाव मंगरूळ ३.३३ टक्के काम झाले आहे. तर साठवण तलाव पिंपरी, साठवण तलाव गिरड-२, गावतलाव दसोडा-२, गावतलाव कानकाटी येथून गाळ काढण्यास सुरूवात करण्यात आलेली नाही. देवळी तालुक्यातील गाव तलाव कोळोणा (चो.) ६०.०० टक्के, पाझर तलाव कोल्हापूर (राव) १४.०० टक्के काम झाले आहे. तर पाझर तलाव गौळ येथून मुठभरही गाळ काढण्यात आलेला नाही.आष्टी तालुक्यातील लघुसिंचन तलाव पांढुर्णा, पाझर तलाव तळेगाव (श्या.पंत.), साठवण तलाव इंदरमारी येथून एक मिटरही गाळ काढण्यात आलेला नाही. आर्वी तालुक्यातील पाझर तलाव आजनगाव ३५ टक्के गाळ काढण्यात आला आहे. तर पाझरतलाव सालधरा, पाझर तलाव पांझरा (बो.), लघुसिंचन तलाव काकडधरा, लघुसिंचन तलाव गौरखेडा येथून गाळ काढण्याच्या कामाला सुरूवात झालेली नाही. लघुसिंचन तलाव आजनादेवी ३० टक्के, लघुसिंचन तलाव ठाणेगाव २ टक्के गाळ काढण्यात आला आहे. तर लघुसिंचन तलाव पिपरी, पाझर तलाव आगरगाव, गावतलाव बांगडापूर, लघुसिंचन तलाव सेलगाव, लघुसिंचन तलाव सुसुंद्रा, साठवण तलाव बोंदरठाणा येथून गाळ काढण्यात आलेला नाही.केळझरच्या दोन तलावातून काढला १०० टक्के गाळसेलू तालुक्यातील गाव तलाव केळझर व गणेश तलाव केळझर येथून १०० टक्के गाळ काढण्यात आला आहे. असे असले तरी गाव तलाव सोंडी, ल.पा. तलाव पांझरा बोधली, ल.पा. तलाव कुºहा, ल.पा. तलाव दहेगाव (गोंडी), ल.पा. तलाव आष्टी, सेलू तालुक्यातील मदन प्रकल्प, समुद्रपूर तालुक्यातील पोथरा प्रकल्प, कारंजा तालुक्यातील कार नदी प्रकल्प, आर्वी तालुक्यातील सुकळी ल.पा. प्रकल्पातून मुठभरली गाळ काढण्यात आलेला नाही.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई