शहरं
Join us  
Trending Stories
1
आणखी एका मंत्र्याचा आज राजीनामा?; वादामुळे महायुती सरकार बॅकफूटवर, अजित पवारांची कोंडी
2
'मी दबावाखाली काम करत नाही'; जगदीप धनखड यांनी असे का म्हटले?, राजीनाम्यानंतर व्हिडीओ व्हायरल
3
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याचं टायमिंग अनेकांना न पटण्यासारखे; 'त्या' ३ तासांत काय घडले?
4
Stock Market Today: ३२७ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; Zomato मध्ये बंपर तेजी, बँक आणि रियल्टीमध्ये तेजी
5
राजनाथ सिंह यांच्याकडे राजकीय हालचालींना वेग; भाजपा खासदाराच्या कोऱ्या कागदावर का घेतल्या सह्या?
6
LIC चा ‘या’ स्कीममध्ये फक्त ४ वर्ष भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरंटी, आणखीही बेनिफिट्स मिळणार
7
चातुर्मासातील पहिली शिवरात्री: शिवपूजन कसे करावे? व्रताचरणाची सोपी पद्धत; मिळेल सुख-लाभ!
8
एकदा- दोनदा नाही, एअर इंडियाला सहा महिन्यात ९ कारणे दाखवा नोटीस बजावल्या; सरकारची माहिती
9
२ शत्रू ग्रहांची युती: ९ राशींचे कल्याण, दुपटीने लाभ; पद-पैसा वृद्धी, राजयोगांचा वरदान काळ!
10
४ मुलांच्या आईनं २४ वर्षाच्या युवकाशी केलं कोर्ट मॅरेज; पतीनं सोडला सुटकेचा नि:श्वास, म्हणाला...
11
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
12
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
13
राज्य सरकार, तपासयंत्रणांना मोठा धक्का, गुन्हे सिद्ध करण्यात सरकारी वकील ठरले अपयशी : उच्च न्यायालय
14
'आम्ही अणुकार्यक्रम सुरूच ठेवणार', युरोपीय देशांशी चर्चेपूर्वी इराणचा अमेरिकेला संदेश
15
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
16
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
17
एअर इंडिया विमानाचे तीन टायर फुटले; विमानतळावर लँडिंगच्या वेळी पावसामुळे विमानाने धावपट्टी सोडली
18
मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींच्या सुटकेसाठी उच्च न्यायालयाला का लागले तब्बल १० वर्षे?
19
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
20
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!

तळपत्या उन्हातही कामगारांचे उपोषण सुरूच

By admin | Updated: April 24, 2016 02:17 IST

येथील सुगुना फुड्सच्या कामगारांनी किमान वेतनाकरिता कंपनीसमोर उपोषण सुरू केले. जिल्ह्यात पारा ४५ अंशावर असताना १५ दिवसांपासून ...

आंदोलनाचा पंधरवडा : कंपनी प्रशासनाकडून अद्याप दखल नाहीहिंगणघाट : येथील सुगुना फुड्सच्या कामगारांनी किमान वेतनाकरिता कंपनीसमोर उपोषण सुरू केले. जिल्ह्यात पारा ४५ अंशावर असताना १५ दिवसांपासून सुरू असलेल्या या उपोषणाची कंपनी प्रशासनाकडून द्याप कुठलीही दखल घेतली नाही. या उपोषणाची माहिती नागपूरच्या असिस्टंट लेबर कमिशनर बनकर यांना मिळाली असता त्यांनी उपोषण मंडपाला भेट देत प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी कामगारांसोबत चर्चा झाली; मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही. येथील एकता कामगार युनियनद्वारे गत १४ दिवसापासून उपोषण सुरूच आहे. या उपोषण मंडपात आतापर्यंत ११ जणांनी उपोषण केले आहे. ९ एप्रिल पासून सुरू झालेल्या उपोषणात आतापर्यंत दामोदर वंजारी, चेतन पिसे, नंदू काळे, भगवान बारई, नितीन गायकवाड, किशोर हेडावू, युनिस शेख, कैलास मून, श्रीकांत आसोले, हरिश्चंद्र चौधरी, राहुल जावळकर हे सध्या उपोषणावर बसले आहेत. यात प्रकृती खालावल्याने दामोदर वंजारी, चेतन पिसे, नंदू काळे यांना उपोषण सोडावे लागले. उपोषणास बसलेल्यांमध्ये अशक्तपणा वाढल्याने हिंगणघाट येथील ग्रामीण रुग्णालयाद्वारे उपोषणकर्त्यांची तपासणी करून त्यांच्यावर उपचार करण्यात आले. उपचारानंतर काहींनी पुन्हा उपोषण सुरू केले आहे. शनिवारी उपोषणकर्ता किशोर हेडावू हा एकटाच उपोषणावर बसून होता. कंपनीमध्ये किमान वेतन मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. तसेच पुणे, मुंबई, बिहार येथे बदली करण्याच्या धमक्या कामगारांनाा दिल्या जात असल्याचे आंदोलक सांगत आहेत. अद्यापही कंपनीद्वारे दखल घेण्यात आलेली नाही.(शहर प्रतिनिधी) उपोषण करणाऱ्या कामगारांच्या मागण्याज्या सात कामगारांना संघटनात्मक भेदभाव व पूर्ण बदली देऊन कामावरून बेदखल केले त्यांना त्वरित कामावर घेण्यात यावे. कंपनीतील ठेकेदार पद्धती त्वरित बंद करण्यात यावी. कामगारांना नियमानुसार किमान वेतन देण्यात यावे. कंपनीमध्ये कामगारांकडून १२ तास काम करून घेतल्या जाते ते त्वरित बंद करण्यात यावे. कंपनीतील सर्व कामगारांना स्थायी करण्यात यावे, तसेच त्यांना ओळखपत्र देण्यात यावे. कंपनीतील काम करणाऱ्या सर्व कामगारांचा पी.एफ. कापण्यात यावा आणि आज पर्यंतचा पी.एफ. एरिअर्स म्हणून जमा करावा. अधिक वेळ काम केल्यास नियमानुसार अधिक भत्ता द्यावा. कंपनीत काम करणाऱ्या सर्व कामगारांना आरोग्य सेवा ईसीआयसी नियमानुसार उपलब्ध करून द्यावी. कामगारांना काम नाही म्हणून कामावरून परत पाठविणे त्वरित बंद करण्यात यावे. कंपनीत उच्च पदावर व एच.आर.स्थानिक भाषिक लोक असावे. कंपनीत कामगारांना बोनस नियुक्ती नुसार देण्यात यावे व मागील बोनस एरिअर्स देण्यात यावा, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.