शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! १२ हजार भावांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ; १६४ कोटींचा घोटाळा आला समोर
2
मुहूर्त ट्रेडिंग: शेअर बाजारात तेजी; निफ्टी वर्षाच्या सर्वोच्च पातळीवर, सेन्सेक्स 62 अंकांनी वधारला
3
BCCI: "आशिया चषक भारताला न दिल्यास..." बीसीसीआयचा मोहसिन नक्वी यांना इशारा!
4
अमित शाह यांच्यावर गंभीर आरोप, प्रशांत किशोर यांनी दाखवला फोटो; जनसुराजच्या उमेदवाराचं अपहरण?
5
अमेरिकेचा 88 लाखांचा H-1B व्हिसा आजपासून लागू; भारतीयांना मोठा दिलासा...
6
Beed: फटाका विझलाय समजून पुन्हा पेटवयाला गेला अन्...; बीडमध्ये सहा वर्षांच्या मुलासोबत भयंकर घडलं!
7
"तात्या विंचू तुम्हाला चावेल...", संजय राऊतांच्या टीकेवर महेश कोठारेंची प्रतिक्रिया, म्हणाले- "ते माझ्याविषयी जे बोलले..."
8
Alyssa Healy : बॅक टू बॅक सेंच्युरी, तरीही स्टार्कच्या बायकोवर आली बाकावर बसण्याची वेळ; कारण...
9
Bhai Dooj 2025: भाऊबीजेसाठी पार्लर ग्लो फक्त चार स्टेप मध्ये! तोही घरच्या साहित्यात, चेहऱ्यावर आणा नैसर्गिक तेज!
10
युनूस सरकारला IMFचा मोठा धक्का! बांगलादेशला दिली जाणारी ८०० दशलक्ष डॉलर्सची मदत थांबवली...
11
"मला तू आवडत नाहीस, कधीच आवडणार नाहीस"; व्हाईट हाऊसमध्ये राडा, ऑस्ट्रेलियन राजदूताला ट्रम्प यांचा टोला
12
India Probable Playing 11 vs Australia 2nd ODI: कांगारुंना जाळ्यात अडकवण्यासाठी गंभीर हा डाव खेळणार?
13
नीतीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री बनूच शकणार नाहीत..! बिहार निवडणुकांपूर्वी मोठी भविष्यवाणी
14
Bhai Dooj 2025: यमराज भाऊबीजेला आले, तेव्हा यमुनेला काय मिळाली ओवाळणी?
15
मृत्यूनंतरही घरात फिरतोय पत्नीचा आत्मा, अभिनेत्याने सांगितला अनुभव म्हणाला- "अचानक कापूरचा वास आला आणि..."
16
चाळीसगावचे माजी आमदार राजीव देशमुख यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन
17
चंद्रपुरात दोन देशी कट्टे, दोन माऊझर, ३५ जिवंत काडतुसे, चार खंजिरांसह चौघांना अटक
18
ट्रम्प यांचा नवा वादग्रस्त निर्णय ! गांजा विक्रेत्याला केले अमेरिकेचा इराकमधील 'विशेष दूत'
19
Diwali Padwa 2025: दिवाळी पाडव्याला नवर्‍याने बायकोला ओवाळणी देणे, हा हक्क की कर्तव्य?

वर्षभरात वर्धा-नांदेड रेल्वे मार्गाचे काम जाणार पूर्णत्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2020 05:00 IST

वर्धा-यवतमाळ या ७८ किलोमीटर लांबीच्या रेल्वेकामाच्या प्रगतीचा आढावा खासदार रामदास तडस यांनी घेतला. यावेळी भूसंपादन अधिकारी सुनील कोरडे, मध्ये रेल्वे विभागचे उपअभियंता एच. एल. कावरे, एम. एम. सत्यमूर्ती, बालमोमुद्र त्रिपाठी आदी उपस्थित होते. वर्धा जिल्ह्यातील वर्धा-नांदेड रेल्वे लाईनकरिता ४८.४८ हेक्टर जमीन शेतकऱ्यांकडून संपादित करावयाची होती.

ठळक मुद्देवर्धा ते यवतमाळ पहिल्या टप्प्याचे ६० टक्के काम पूर्ण , मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कपवनार : जिल्ह्यातील पहिल्या टप्प्यातील वर्धा ते कळंब ४० किलोमीटर व कळंब ते यवतमाळ ३८ किलोमीटर, वर्धा-यवतमाळ-नांदेड या रेल्वेमार्गाचे वर्धा ते यवतमाळ या पहिल्या टप्प्याचे ६० टक्के काम पूर्ण झाले आहे. यासाठी एक हजार २७८ कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. वर्धा ते कळंबकरिता केंद्र शासनाकडून निधी प्राप्त झालेला असून राज्य सरकारकडे निधी प्रलंबित आहे. वर्धा-नांदेड रेल्वेचे काम एक ते दीड वर्षात पूर्ण होईल, अशी माहिती आढावा बैठकीत अधिकाऱ्यांनी दिली.वर्धा-यवतमाळ या ७८ किलोमीटर लांबीच्या रेल्वेकामाच्या प्रगतीचा आढावा खासदार रामदास तडस यांनी घेतला. यावेळी भूसंपादन अधिकारी सुनील कोरडे, मध्ये रेल्वे विभागचे उपअभियंता एच. एल. कावरे, एम. एम. सत्यमूर्ती, बालमोमुद्र त्रिपाठी आदी उपस्थित होते.वर्धा जिल्ह्यातील वर्धा-नांदेड रेल्वे लाईनकरिता ४८.४८ हेक्टर जमीन शेतकऱ्यांकडून संपादित करावयाची होती. पैकी ०८.३७ हेक्टर जमीन संपादित केलेली असून सालोड, हिरापूर, देवळी, बाभूळगाव, भिडी, शिरपूर, रत्नापूर, सेलसुरा, मेघापूर या गावातील शेतकºयांकडून भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे. जिल्ह्यातील जमीन अधिग्रहणाचे काम जवळपास पूर्ण होईल, अशी माहिती भूसंपादन अधिकारी यांनी दिली.वर्धा-कळंबदरम्यान १० मोठ्या पुलांचे बांधकाम प्रगतिपथावर आहे. तसेच यशोदा नदीवरील व भिडी येथील दोन पुलांचे काम पूर्ण झाले असून वर्धा नदीवरील रेल्वे पुलाचे काम न्यायालयीन प्रक्रियेमुळे प्रलंबित होते. मात्र, आता आता उर्वरीत कामाची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. वर्धा-कळंब दरम्यान स्टेशन इमारत व कार्यालये बांधकामाची निविदा अंतिम झाली. वर्धा-कळंबसाठी स्टाफ क्वार्टर बांधणे, वर्धा-कळंबसाठी आरओबी बांधण्यासाठीची निविदा अंतिम टप्प्यात असल्याची माहिती मध्ये रेल्वे विभागाचे उपअभियंता कावरे यांनी दिली.भूसंपादनात शेतकऱ्यांवर अन्याय व्हायला नकोवर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे लाईन प्रकल्पाकरिता तत्कालीन खासदार विजय दर्डा यांनी प्रकल्प मंजूर करून प्रकल्पाला गती प्रदान करण्याकरिता प्रयत्न केलेले आहे तसेच तसेच वर्धा-यवतमाळ - नांदेड रेल्वे प्रकल्प कालबद्ध वेळेत पूर्ण व्हावा म्हणून २०१४ पासून सातत्याने पाठपुरावा करीत आहे. वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वेचे काम जलदगतीने पूर्ण करण्याकरिता प्रलंबित कामांना गती द्यावी तसेच वर्धा-यवतमाळ मध्ये रेल्वेलाईनकरिता शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करताना शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही, याची दक्षता घ्यावी. भूसंपादन केल्यानतर त्वरित मोबदला देण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना यावेळी अधिकाऱ्यानां खासदार रामदास तडस यांनी दिल्या.

टॅग्स :railwayरेल्वेRamdas Tadasरामदास तडस