शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीमध्ये २०७ जागांवर एकमत, कोण किती जागा लढवणार? अमित साटमांनी सांगितला आकडा
2
‘अरवली’बाबत सुप्रीम कोर्टाने स्वत: घेतली दखल, सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी
3
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
4
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
5
तैवानमध्ये मोठा भूकंप, इमारती हादरल्या, लोकांमध्ये दहशत, आसामपर्यंत जाणवले धक्के
6
ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   
7
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
8
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
9
’मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणार’, एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
10
मैदानातच आला हृदयविकाराचा झटका, प्रसिद्ध प्रशिक्षकाचं निधन, बांगलादेश क्रिकेटवर शोककळा  
11
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
12
VIDEO: खतरनाक! समुद्राच्या तळाशी पोहणाऱ्या डायव्हरवर अचानक ऑक्टोपसने केला हल्ला अन् मग...
13
ठाण्यात तीन प्रभागावरून युती अडली; आज तोडगा निघण्याची शक्यता, १२ जागांवरून अडले घोडे
14
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
15
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
16
"PM मोदींचा हा वन मॅन शो फक्त..."; मनरेगाच्या नामांतरावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, काँग्रेस ५ जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार
17
VIDEO : इटलीच्या बॅटरकडून शाहीन आफ्रिदीची धुलाई; पाक गोलंदाजावर 'लंगडी' घालत मैदान सोडण्याची वेळ!
18
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
19
जळगाव: बापच बनला हैवान! चौथी मुलगी झाल्याच्या रागातून अवघ्या ३ दिवसांच्या मुलीची हत्या
20
बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
Daily Top 2Weekly Top 5

मातंग समाजाच्या उद्धारासाठी एकजुटीने कार्य करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2019 06:00 IST

समाज प्रगतीच्या दिशेने झेप घेत असताना मातंग समाजानेसुद्धा मागे न राहता विकासाच्या या प्रवाहात सामील होण्यासाठी सर्वांनी एकजुटीने कार्य करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन लोकशाहीर अण्णा भाऊ साठे स्मारक समितीचे सचिव व राष्ट्रीय लहुशक्तीचे संस्थापक अध्यक्ष मधुकर कांबळे यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देमधुकर कांबळे यांचे आवाहन : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जन्मशताब्दी महोत्सव

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात व स्वातंत्र्यानंतर समाजात जनजागृती चळवळ राबविली. पोवाडे, कांदबऱ्या या माध्यमातून समाजाला नवी दिशा दिली. लोकांच्या मनात ज्ञानाची ज्योत पेटविण्यासाठी पोवाड्याचा आधार घेत समाजप्रबोधनाचे कार्य केले. सर्व समाज प्रगतीच्या दिशेने झेप घेत असताना मातंग समाजानेसुद्धा मागे न राहता विकासाच्या या प्रवाहात सामील होण्यासाठी सर्वांनी एकजुटीने कार्य करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन लोकशाहीर अण्णा भाऊ साठे स्मारक समितीचे सचिव व राष्ट्रीय लहुशक्तीचे संस्थापक अध्यक्ष मधुकर कांबळे यांनी व्यक्त केले.लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त राष्ट्रीय लहुशक्ती वर्धा जिल्हाद्वारा देवळी येथील हरिदिनी भोंग सभागृहात आयोजित मातंग समाजाच्या महामेळाव्यात ते बोलत होते. उद्घाटक समीर देशमुख होते. राष्ट्रीय लहुशक्तीचे विदर्भप्रमुख गणेशदास गायकवाड, देवी कृउबाचे उपसभापती व जि.प. सदस्य संजय कामनापुरे, धनराज तेलंग, पं. स. सभापती विद्या भुजाडे, सुचिता मडावी, रेखा कांबळे, आशा जालफळ, मिलिंद कांबळे, सचिन पोटफोडे, गजानन महाजन, नीतेश बावणे, सुमन बावणे, दिलीप पोटफोडे, नितीन देशमुख, अमोल कसनारे, विलास डोंगरे, गणेश मुंगले, अमोल गायकवाड, नंदू वैद्य, बावनकर यांची उपस्थिती होती.कांबळे यांनी समाजाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासन विविध योजना राबवित असल्याची माहिती देत लाभ घेण्याचे आवाहन केले. समीर देशमुख यांनी मातंग समाजाच्या उद्धारासाठी असे मेळावे गरजेचे असून समाजाला या माध्यमातून नवी दिशा मिळते, असे सांगितले. यावेळी मधुकर कांबळे व समीर देशमुख यांच्या हस्ते समाजातील गुणवंत विद्यार्थी व नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य, उपसरपंच, पोलीस पाटील व सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये फकिरा खडसे, राजेश अहिव, गुलाब कळणे, देवानंद बेडे, दशरथ बावनकर, प्रभाकर खंदार, पुंडलिक पवार, शंकर बावणे, गोपाल कावळे, सुमन बावणे, संगीता वानखडे, अजय डोंगरे, श्याम इंगोले, अशोक डोंगरे, सुरेश चव्हाण, राजेश चन्ने, दर्शन मेढे, रामदास खडसे, गजानन मुंगले, नामदेव शिखरे, भीमराव हिवराळे, दुर्गा गवळी, रोहित लोहकरे, दिंगाबर मुगले, अमोल गायकवाड, शीतल खंदार, दुर्गा पोटखोडे, प्रियांका कांबळे, हरिभाऊ डोंगरे यांचा समावेश आहे.