शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या मित्रपक्षांमध्ये वाद, NDA सरकारमध्ये वाढली डोकेदुखी; बंद दाराआड बैठक घेणार
2
हे जग सोडून गेलेल्या बहिणीच्या हाताने रक्षाबंधन! वलसाडच्या भावासाठी 'ती' जिवंत हात घेऊन आली...
3
'या' देशातील लोक आता आपला पत्ताच बदलणार; संपूर्ण देश ऑस्ट्रेलियामध्ये सामील होणार! कारण काय?
4
ICICI Bank Minimum Balance: आता ₹१०००० नाही, बचत खात्यात ₹५०००० चा मिनिमम बॅलन्स ठेवावा लागणार, 'या' दिवसापासून नियम लागू होणार
5
हृदयद्रावक! रक्षाबंधनासाठी येणाऱ्या भावासोबत आक्रित घडलं, वाट पाहत होत्या बहिणी पण...
6
लफडं! पतीचे हात तोडले अन् १० वर्ष लहान भाच्यासोबत पळाली मामी; नात्याला काळीमा फासणारी कहाणी
7
पाकिस्तानात मोठ्या राजकीय घडामोडी...! संसदेच्या विरोधी पक्षनेत्याला पदावरून काढले, पीटीआयचे अनेक नेते अडचणीत
8
स्थानिक संस्थांच्या निवडणुकीत अद्याप आघाडी नाही; मविआबाबत संजय राऊतांचं मोठं विधान, 'मनसे' युतीचे संकेत
9
अमूल, पार्ले-जी, गोदरेज... अमेरिकेच्या टॅक्सपासून वाचण्यासाठी भारतीय कंपन्यांचा 'जुगाड', उचलू शकतात 'हे' पाऊल
10
"तिला कितीदा समजावले, तरीही दुसऱ्या मुलांशी बोलत राहिली"; संतापलेल्या प्रियकराने असा काढला राग अन्...
11
बलात्काराची खोटी तक्रार; माजी महिला बँक कर्मचाऱ्याला अटक
12
...तर अमेरिकेत १९२९ सारखी महामंदी येईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेलाच दिली धमकी
13
Bank of Baroda मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹३०,२२८ रुपयांचं फिक्स व्याज, पाहा स्कीमच्या डिटेल्स
14
रक्षाबंधनाच्या दिवशी दोन जवान धारातीर्थी पडले; कुलगाममध्ये एक दहशतवादी ठार, मोठी चकमक सुरु
15
रशिया-युक्रेन युद्धालाही मिळणार पूर्णविराम? 'या' दिवशी डोनाल्ड ट्रम्प घेणार पुतिन यांची भेट
16
तरुण असो वा वृद्ध.., पोस्टाच्या या जबरदस्त स्कीमनं घरबसल्या करू शकता कमाई; 'या' ट्रिकनं दरवर्षी मिळतील ₹१,११,०००
17
मृत अर्थव्यवस्था? मग हा वाढीचा ७% वेग कोणाचा हो राष्ट्राध्यक्ष ट्रम्प? अरविंद पनगढियांचा पलटवार
18
राहुल गांधी, आव्हान स्वीकारा! ...जेणेकरून ‘दूध का दूध, और पानी का पानी’ होईल.
19
उत्तरकाशीतून ६५० लोकांना बाहेर काढण्यात यश; ३०० लोक अजूनही अडकल्याची भीती, धरालीमध्ये बचावकार्य सुरू
20
Raksha Bandhan Shubh Muhurt: राखी बांधण्यासाठी साडेसात तासांचा शुभ मुहूर्त; सुरु झाला, कधी संपणार... अख्खा दिवस नाहीय...

बापूराव देशमुखांचे कार्य लोकांपर्यंत जावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 00:11 IST

शिक्षण व सहकार क्षेत्रातील कार्याव्यतिरिक्त बापूराव देशमुखांचे सामाजिक व इतर क्षेत्रातील कार्यही मोठे आहे. ते पुढे आले पाहिजे. पुस्तकांच्या माध्यमातून दाआजींनी ज्यांच्यासाठी काम केले त्या बहुजनापर्यंत ते कार्य जायला हवे, .....

ठळक मुद्देसुरेश देशमुख : सहकार महर्षी बापूराव देशमुख पुस्तकाचे प्रकाशन

ऑनलाईन लोकमतवर्धा : शिक्षण व सहकार क्षेत्रातील कार्याव्यतिरिक्त बापूराव देशमुखांचे सामाजिक व इतर क्षेत्रातील कार्यही मोठे आहे. ते पुढे आले पाहिजे. पुस्तकांच्या माध्यमातून दाआजींनी ज्यांच्यासाठी काम केले त्या बहुजनापर्यंत ते कार्य जायला हवे, असे प्रतिपादन माजी आमदार तथा यशवंत ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. सुरेश देशमुख यांनी केले. स्थानिक प्रियदर्शिनी महिला महाविद्यालयात आयोजित विशेष कार्यक्रमात ते मार्गदर्शन करताना बोलत होते.व्यासपीठावर माजी आमदार वसंतराव कार्लेकर, बापूराव देशमुख फाऊंडेशनचे अध्यक्ष शरद देशमुख, सचिव डॉ. भा.की. खडसे, सुधीर गवळी, प्राचार्य डॉ. रंभा सोनाये, डॉ. मालिनी वडतकर यांची उपस्थिती होती. कार्यक्रमादरम्यान राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. मालिनी वडतकर लिखित सहकार महर्षी बापूरावजी देशमुख या पुस्तकाचे प्रकाश करण्यात आले.डॉ. कासारे म्हणाले की, महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यापासून आपल्या विदर्भातील पंजाबराव देशमुख यांच्यापर्यंतच्या समाजसुधारकानी समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शिक्षणाची ज्योत नेली. त्या सर्व कर्मवीर, थोर शिक्षण महर्षीच्या परंपरेतील अलीकडच्या काळातील लोक नेते म्हणजे बापूराव देशमुख होते, असे सांगितले.डॉ. भा.की. खडसे यांनी जिल्ह्यावर मालगुजार श्रीमंताचा प्रभाव असताना तो दूर सारीत गाव खेड्यातील बहुजन, ग्रामीण तरूण नेतृत्वाला पुढे आणण्याचे कार्य बापूराव देशमुख यांनी केले. सर्व जातीपातीच्या सामान्य लोकांना सोबत घेऊन ते जात असे सांगितले. यावेळी माजी आमदार वसंतराव कार्लेकर, व सुधीर गवळी यांनीही मनोगत व्यक्त केले. सुरेश देशमुख यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. प्रास्ताविक डॉ. वडतकर यांनी केले. डॉ. अरूणा हरर्ले यांच्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले. संचालन मराठी विभाग प्रमुख डॉ. अनिता देशमुख यांनी केले तर आभार प्राचार्य डॉ. रंभा सोनाये यांनी मानले. यावेळी सहकार क्षेत्रातील मान्यवर व वर्धेतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.