शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

मक्त्याच्या शेतीतून उभा केला महिलांनी संसार

By admin | Updated: June 4, 2015 01:52 IST

महिलांनी उद्योग उभारणे ही बाबच आजही पुरुषांच्या पचनी पडलेली नाही. त्यातही काही महिलांनी उद्योग उभारण्याचा विडा उचललाच तर फार फार तर लोणची, पापड ...

पराग मगर वर्धामहिलांनी उद्योग उभारणे ही बाबच आजही पुरुषांच्या पचनी पडलेली नाही. त्यातही काही महिलांनी उद्योग उभारण्याचा विडा उचललाच तर फार फार तर लोणची, पापड यापुरते ते मर्यादित राहतात किंवा ठेवले जातात. त्यातच कृषी हे क्षेत्र म्हणजे पुरुषांची मक्तेदारी. स्त्रिया केवळ मजुरीचीच कामे करतात. पण ही मक्तेदारी मोडीत काढत बचत गटाच्या माध्यमातून मक्त्याने शेती करून आपल्या संसार उभारण्याची किमया मातोश्री मालिनी महिला मंडळद्वारे अक्षर संयुक्त देयता गटाद्वारे बोरगाव (आलोडा) येथील पाच महिलांनी करून दाखविली.मंगला राऊत, वैशाली कराळे, वंदना पवार, कुसूम टिपले आणि भाग्यश्री झामरे अशी या महिलांची नावे आहेत. शेतीच सध्या परवडेनाशी झाल्याची वल्गना केली जाते. त्यातही मक्त्याची शेती करणारे हे पुरुषच असतात. परंतु शेतीच्या कामाची सवय असलेल्या बोरगाव (आलोडा) येथील या पाच जणींनी नाबार्ड प्रकल्पांतर्गत मातोश्री मालिनी महिला मंडळ वर्धा द्वारा अक्षर संयुक्त देयता गट, बोरगाव (आलोडा) ची स्थापना केली. आणि गटांतर्गत मक्त्याने शेती करण्याचा धाडसी निर्णय घेतला. दर महिन्याला १०० रुपयांची बचत जमा करण्याचा निर्णय घेतला. नाबार्डच्या सहाय्यक महाप्रबंधक डॉ. स्नेहल बन्सोड व योगिनी शेंडे यांनी गट कशाप्रकारे चालवावा व मक्त्याची शेती करताना कोणकोणत्या अडचणी येतात तसेच त्या कशा हाताळाव्या याबाबत मार्गदर्शन केले. त्याच प्रमाणे आर्थिक बाबतीत आलेले जिकरीने प्रश्न कसे नेटाने सोडवावे याची माहिती दिली. सर्वप्रथम त्यांनी बॅँक आॅफ इंडिया, बोरगाव (मेघे) या शाखेतून ३१ डिसेंबर २०१३ रोजी ५० हजार रुपयांचे कर्ज उचलले. यातून मक्त्याने शेती घेऊन त्यात गहू, हरबरा आदी पिके घेतली. पाचही जणी मिळून शेतात राबायच्या. यात त्यांना बँकेच्या कर्जाची परतफेड करून १० हजार रुपयांचा नफा झाला. त्यामुळे त्यांची हिंम्मत वाढली. त्यांनी पुन्हा साडेचार एकर शेती मक्त्याने करून त्यात कापूस व तुरीची लागवड केली. याकरिता बँकेने त्यांना ७० हजारांचे कर्ज दिले. या काळात बियाणे व खतांचे भाव वधारले. पावसानेही दगा दिल्याने दुबार पेरणी करावी लागली. तरीही हिमतीच्या जोरावर पिकांची मशागत केली. पिकांवर रोग पसरल्याने उत्पन्नात घट झाली. या काळात जोमाने कार्यकरण्यासाठी डॉ. बन्सोड यांनी खूप धीर दिल्याचे या पाचजणी सांगतात. हंगामात माल निघाल्यानंतर १५ क्विंटल कापूस व आठ क्विंटल तुरी झाल्या. मालाचे भाव पडल्याने त्यांना नुकसान सोसावे लागले. यात गटाला नफा मिळाला नाही. परंतु हिम्मत हारली नसल्याचे त्या सांगतात. तसेच पुन्हा मक्त्याची शेती करणार असल्याचेही हिमतीने सांगतात. कुठलेही तारण नसताना या पाच जणींनी हिमतीच्या जोरावर ही मक्त्याची शेती करून दाखवित जिल्ह्यात एक आदर्श निर्माण केला. सुरुवातीला त्रास झालाआतापर्यंत शेतात मजुरी करीत असल्याने शेतीच्या कामाची जाण होती. नफ्या तोट्याचीही जाणीव होती. प्रत्यक्ष शेती करताना मात्र दिव्यातून जावे लगले. शेतीतून नुकसानच होते अशा अनेकांच्या भावना असल्याने तणाव होतात. परंतु सर्व संकटांना सामोरे जात त्यांनी पुरुषी मक्तेदारी मोडीत काढत मक्त्याची शेती करून दाखविली. आता हिम्मत वाढल्याचेही त्या गर्वाने भावना व्यक्त करतात.