शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

महिला आरक्षणाचा दिग्गजांना हादरा

By admin | Updated: October 6, 2016 00:33 IST

जिल्ह्याचे लक्ष असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आरक्षणाची बुधवारी सोडत झाली

जिल्हा परिषदेसह पंचायत समिती आरक्षणाची सोडत : नव्या गट-गणांत महिलांनाच संधीवर्धा: जिल्ह्याचे लक्ष असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आरक्षणाची बुधवारी सोडत झाली. आरक्षणाच्या नव्या नियमात ५० टक्के जागा महिलांना देण्याचा नियम अनेकांच्या आशांवर पाणी फेरणारा ठरला. महिला आरक्षणामुळे जिल्ह्यातील दिग्गजांना फटका बसल्याचे दिसून आले आहे. जिल्ह्यात नव्याने तयार झालेले पाच गट व गणात महिलांची वर्णी लागल्याने येथे आपली जागा शोधणाऱ्यांच्या आशाही मावळल्या. सर्वांचे लक्ष असलेल्या तळेगाव (टा), अल्लीपूर, वायफड, तरोडा, नाचणगाव, इंझाळा, येळाकेळी व वडनेर या गटाच्या जागा महिलांकरिता राखीव झाल्याने या भागात कायम वर्चस्व राखणाऱ्या दिग्गजांच्या तोंडचे पाणी पळाल्याचे चित्र विकास भवनात दिसून आले. तर जिल्हा परिषदेच्या विद्यमान अध्यक्ष चित्रा रणनवरे यांचा हिंगणी व विद्यमान उपाध्यक्ष विलास कांबळे यांचा सावंगी (मेघे) गट खुल्या प्रवर्गाकरिता राखीव झाला आहे. गत पंचवार्षिकेत संधी हुकलेल्या काहींना नव्या आरक्षणाने तारल्याने त्यांच्या आशा पल्लवित झाल्याचे दिसून आले. बुधवारी निघालेल्या नव्या आरक्षणामुळे राजकीय पक्षांनी या भागात आपले वर्चस्व कायम राखण्याकरिता उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. जिल्हा परिषदेत नव्याने निर्माण करण्यात आलेल्या सुकळी (स्टेशन), वरूड, पवनार, सालोड (हिरापूर) व जाम या पाचही गटात महिलांची वर्णी लागली आहे. विकास भवनात गटाचे आणि आठही पंचायत समिती स्तरावर दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या उपस्थितीत आरक्षणाची सोडत निघाली. आरक्षण काढताना सर्वप्रथम नियम सांगण्यात आले. यात शासनाच्या निर्देशानुसार, ५२ पैकी सात जागा अनुसूचित जातींकरिता राखीव इेवत त्यातील चार जागा महिलांकरिता राखीव ठेवण्यात आल्या. याच नियमानुसार अनुसूचित जमातीकरिता सात जागा राखीव ठेवत त्यातील चार जागा महिलांकरिता आरक्षित करण्यात आल्या. यानंतर नागरिकांचा मागास प्रवर्गातील आरक्षणाची सोडत काढण्यात आली. या प्रवर्गाकरिता १४ जागा देण्यात आल्या. त्यातील सात जागा महिलांकरिता राखीव ठेवण्यात आल्या. यानंतर उर्वरीत २४ जागा खुल्या प्रवर्गाकरिता राखीव करण्यात आल्या. यातील ११ जागा महिलांकरिता राखीव ठेवण्यात आल्या. विकास भवनात सुरू असलेल्या आरक्षण सोडतीच्यावेळी जिल्हा परिषदेचे आजी माजी दिग्गजांची उपस्थिती होती. यावेळी काही सदस्यांनी सुरू असलेल्या आरक्षण सोडतीच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेण्याचा प्रयत्न केला. मात्र जिल्हाधिकारी नवाल यांनी त्यांच्या समस्येचे निराकरण करीत आरक्षण सोडतीचे कार्य पार पाडले. आरक्षण जाहीर होताच विकास भवनाच्या आवारात ज्यांचे गट महिलांकरिता राखीव झाला त्यांनी नाराजी व्यक्त करीत नव्या गटाचा शोध सुरू करणार असल्याचे बोलून दाखविले. तर काहींनी पक्ष काय सूचना देतो यावर आपली भूमिका ठरणार असल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)