शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

‘त्या’ महिलेचे घटनास्थळीच झाले शवविच्छेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2019 22:04 IST

आष्टी-मोर्शी मार्गावरील अप्पर वर्धा धरणालगतच्या जोलवाडी जंगल शिवारात महिलेचा कुजलेल्या व अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने परिसरात विविध तर्कवितर्क लावले जात आहे. सदर मृतदेहाचे शवविच्छेदन वैद्यकीय तज्ज्ञाना पाचारण करून घटनास्थळीच करण्यात आले आहे.

ठळक मुद्देनमुने पाठविले प्रयोगशाळेत : ओळख पटविण्यासाठी दोन चमू रवाना

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (शहीद) : आष्टी-मोर्शी मार्गावरील अप्पर वर्धा धरणालगतच्या जोलवाडी जंगल शिवारात महिलेचा कुजलेल्या व अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने परिसरात विविध तर्कवितर्क लावले जात आहे. सदर मृतदेहाचे शवविच्छेदन वैद्यकीय तज्ज्ञाना पाचारण करून घटनास्थळीच करण्यात आले आहे. शिवाय तिची ओळख पटविण्यासाठी आष्टी पोलिसांची दोन चमू रवाना करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, शवविच्छेदन झाल्यानंतर महिलेचा मृतदेह धरणाच्या परिसरात पुरविण्यात आला आहे. शिवाय घेण्यात आलेले नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर अधिकची माहिती पोलिसांना मिळणार आहे.साहूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. गावंडे यांनी शवविच्छेदन केले. मृत महिला ही २५ ते ३० वर्षावयोगटातील असून तिच्या डाव्या हातामधील कंंगन पूर्ण जळाल्याचे आणि उजव्या हातामधील कंगन जसेच्या तसे असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत पुढे आले आहे. तसेच मृत महिला विवाहिता असावी असा भास निर्माण करण्यासाठीही आरोपीने तिच्या गळ्यात मंगळसूत्र टाकल्याचे निदर्शनास आले आहे. ते साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे. सदर महिलेचा मृत्यू अनैतिक संबंधातून तसेच तिच्यावर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचा संशयही सध्या पोलिसांकडून वर्तविला जात आहे.परंतु, मृत महिलेची ओळख पटल्यावरच अधिकची माहिती पुढे येईल, असे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. रविवारी आष्टी पोलिसाच्या दोन चमू वरुड, मोर्शी, तिवसा, जलालखेडा पोलीस ठाण्याकडे रवाना झाल्या आहेत. या दोन्ही चमू सदर महिलेची ओळख पटविण्यासह अधिकची गोपनीय माहिती गोळा करणार आहे. सदर पोलीस कर्मचाऱ्यांच्या हाती काय लागले हे या दोन्ही चमू परतल्यावर पुढे येणार आहे. पुढील तपास ठाणेदार जीतेंद्र चांदे, पोलीस उपनिरीक्षक राजू दहिलेकर, राहुल तेलंग, निलेश वंजारी, मंगेश भगत, बाबा गवई करीत आहेत.रुमाल ठरतोय शंका निर्माण करणारासदर महिलेसोबत फार मोठे कृत्य करुन पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने तिला जाळले असावे, असा अंदाज पोलिसांकडून वर्तविला जात आहे. परंतु, तिची ओळख पटल्यावर तसेच शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यावरच अधिकची माहिती पोलिसांना मिळणार आहे. विशेष म्हणजे, मृत महिलेच्या तोंडात रुमाल होता. तो रुमाल सध्या अनेक शंका निर्माण करीत आहे. या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी श्वानपथक मदतगार ठरले असते, असे काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे. परंतु, घटनास्थळी श्वानपथकाला पाचारणच करण्यात आले नव्हते. शिवाय त्याची गरज नव्हती, असे पोलीस अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. पुढे हे प्रकरण कुठले नवीन वळण घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Murderखून