शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
3
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
4
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
5
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
6
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
7
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
8
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
9
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
10
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
11
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
12
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
13
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
14
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
15
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
16
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
17
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
18
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
19
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
20
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  

सीईओ आल्याशिवाय ग्रा.पं.चे कुलूप उघडणार नाही

By admin | Updated: June 10, 2016 02:05 IST

पिण्याच्या पाण्याचा अनियमित पुरवठा व गावात सुरू असलेल्या अनेक कामात अनियमितता व निकृष्ट दर्जाच्या बांधकामाची पाहणी....

गावकऱ्यांची मागणी : धनोडी (बहाद्दरपूर) येथील प्रकरणआर्वी : पिण्याच्या पाण्याचा अनियमित पुरवठा व गावात सुरू असलेल्या अनेक कामात अनियमितता व निकृष्ट दर्जाच्या बांधकामाची पाहणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकारी जोपर्यंत प्रत्यक्ष येत करणार नाही तोपर्यंत ग्रामपंचायतचे कुलूप उघडणार नाही, अशी भूमिका धनोडी (बहाद्दपूर) येथील ग्रामवासियांनी घेतली आहे. यामुळे गत चार दिवसांपासून ग्रामपंचायतीचे कामकाज ठप्प झाले आहे. धनोडी (बहाद्दूर) येथील नागरिकांनी ५ मे रोजी ग्रामपंचायत कार्यालयला कुलूप ठोकले. याची माहिती मिळताच आर्वी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व्ही. डी. धापके यांनी गावाला प्रत्यक्ष भेट देत गावकऱ्यांनी समजूत घालण्याचा प्रयत्न केला; परंतु गावकऱ्यांनी त्यांचे आश्वासन धुडाकावत ते आपल्या मागणीवर ठाम आहे.उन्हाळ्याचे दिवस असताना नियमित पाणीपुरवठा होत नाही. दलित वस्ती योजनेत झालेले बांधकाम निकृष्ट दर्जाचे असून नालीला बेड काँक्रीट केलेच नाही. नव्याने बनविण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीतून दलित वस्तीतील पाणी पुरवठा होऊ शकतो; परंतु तसे न करता जुन्याच पिण्याच्या पाण्याच्या टाकीवरून नव्याने पाईप लाईन टाकण्याचे काम सुरू आहे. हे काम पूर्ण झाल्यास याच टाकीवरून पूर्ण धनोडी गावाला पाणी पुरवठा झाल्यास या टाकीचे पाणी कमी पडेल, असे गावकऱ्यांचे व ग्रामपंचायतीच्या काही सदस्याचे म्हणणे आहे.(शहर प्रतिनिधी)गावकऱ्यांची ग्रामविकास अधिकाऱ्याविरोधात तक्रार ग्रामपंचायत सदस्यांनी ८ जून रोजी मुख्यकार्यपालन अधिकारी व गटविकास अधिकारी यांच्याकडे ग्रामविकास अधिकाऱ्यांविरोधात तक्रार दिली. या तक्रारीत ग्रामविकास अधिकारी हे १० ते १५ दिवसात १-२ वेळा येतात. त्यामुळे गावातील लोकांचे कामे होत नाही. त्याचप्रमाणे ग्रा.पं. मध्ये असलेला अस्थाई कर्मचारी सुद्धा मुद्दाम काही भागात कमी पाणी सोडतो, असा उल्लेख करण्यात आला आहे. ही तक्रार ग्रा.पं. सदस्य कल्पना विलास ठाकरे, नलू मारोतराव वरठी, आशिष लक्ष्मीकांत टिकले यांनी केली असून यावर १०० पेक्षा जास्त नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. सरपंचाची विरोधकांविरोधात तक्रार गुरुवारी सरपंच सुरेखा लढे यांनी गटविकास अधिकारी आर्वी यांच्याकडे तक्रार दिली. यात विरोधी गटाच्या सदस्यांनी केलेले आरोप निराधार आहे. ते खोट्या तक्रारी करतात म्हणून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. यावर जिल्हा प्रशासनाचे अधिकारी काय कार्यवाही करतात, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.