शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
3
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
4
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
5
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
6
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
7
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
8
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
9
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
10
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
11
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
12
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
13
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
14
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
15
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
16
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
17
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
18
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
19
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

सीईओ आल्याशिवाय ग्रा.पं.चे कुलूप उघडणार नाही

By admin | Updated: June 10, 2016 02:05 IST

पिण्याच्या पाण्याचा अनियमित पुरवठा व गावात सुरू असलेल्या अनेक कामात अनियमितता व निकृष्ट दर्जाच्या बांधकामाची पाहणी....

गावकऱ्यांची मागणी : धनोडी (बहाद्दरपूर) येथील प्रकरणआर्वी : पिण्याच्या पाण्याचा अनियमित पुरवठा व गावात सुरू असलेल्या अनेक कामात अनियमितता व निकृष्ट दर्जाच्या बांधकामाची पाहणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकारी जोपर्यंत प्रत्यक्ष येत करणार नाही तोपर्यंत ग्रामपंचायतचे कुलूप उघडणार नाही, अशी भूमिका धनोडी (बहाद्दपूर) येथील ग्रामवासियांनी घेतली आहे. यामुळे गत चार दिवसांपासून ग्रामपंचायतीचे कामकाज ठप्प झाले आहे. धनोडी (बहाद्दूर) येथील नागरिकांनी ५ मे रोजी ग्रामपंचायत कार्यालयला कुलूप ठोकले. याची माहिती मिळताच आर्वी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व्ही. डी. धापके यांनी गावाला प्रत्यक्ष भेट देत गावकऱ्यांनी समजूत घालण्याचा प्रयत्न केला; परंतु गावकऱ्यांनी त्यांचे आश्वासन धुडाकावत ते आपल्या मागणीवर ठाम आहे.उन्हाळ्याचे दिवस असताना नियमित पाणीपुरवठा होत नाही. दलित वस्ती योजनेत झालेले बांधकाम निकृष्ट दर्जाचे असून नालीला बेड काँक्रीट केलेच नाही. नव्याने बनविण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीतून दलित वस्तीतील पाणी पुरवठा होऊ शकतो; परंतु तसे न करता जुन्याच पिण्याच्या पाण्याच्या टाकीवरून नव्याने पाईप लाईन टाकण्याचे काम सुरू आहे. हे काम पूर्ण झाल्यास याच टाकीवरून पूर्ण धनोडी गावाला पाणी पुरवठा झाल्यास या टाकीचे पाणी कमी पडेल, असे गावकऱ्यांचे व ग्रामपंचायतीच्या काही सदस्याचे म्हणणे आहे.(शहर प्रतिनिधी)गावकऱ्यांची ग्रामविकास अधिकाऱ्याविरोधात तक्रार ग्रामपंचायत सदस्यांनी ८ जून रोजी मुख्यकार्यपालन अधिकारी व गटविकास अधिकारी यांच्याकडे ग्रामविकास अधिकाऱ्यांविरोधात तक्रार दिली. या तक्रारीत ग्रामविकास अधिकारी हे १० ते १५ दिवसात १-२ वेळा येतात. त्यामुळे गावातील लोकांचे कामे होत नाही. त्याचप्रमाणे ग्रा.पं. मध्ये असलेला अस्थाई कर्मचारी सुद्धा मुद्दाम काही भागात कमी पाणी सोडतो, असा उल्लेख करण्यात आला आहे. ही तक्रार ग्रा.पं. सदस्य कल्पना विलास ठाकरे, नलू मारोतराव वरठी, आशिष लक्ष्मीकांत टिकले यांनी केली असून यावर १०० पेक्षा जास्त नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. सरपंचाची विरोधकांविरोधात तक्रार गुरुवारी सरपंच सुरेखा लढे यांनी गटविकास अधिकारी आर्वी यांच्याकडे तक्रार दिली. यात विरोधी गटाच्या सदस्यांनी केलेले आरोप निराधार आहे. ते खोट्या तक्रारी करतात म्हणून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. यावर जिल्हा प्रशासनाचे अधिकारी काय कार्यवाही करतात, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.