शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळीत तरी रेल्वेला जनरल डबे लागणार की नाहीत? प्रवाशांचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2021 16:36 IST

सध्या सुरू असलेल्या रेल्वेगाड्यांमध्ये जनरल डबे नसल्याने प्रवाशांना जादा दराने तिकीट काढून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे जनरल डबे लागणार कधी, असा प्रश्न प्रवाशांकडून विचारण्यात येत आहे.

ठळक मुद्देसर्वसामान्यांच्या खिसा होतोय रिकामा : रेल्वे विभागाने लक्ष देण्याची गरज

वर्धा : दिवाळीच्या काळात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत असते. मात्र, वर्धा जिल्ह्यात अजूनही पॅसेंजर रेल्वेगाडी सुरू न झाल्याने दिवाळीत तरी रेल्वेला जनरल डबे लागणार की नाहीत, असा प्रश्न सर्वसामान्यांकडून विचारला जात आहे.

कोरोनामुळे केवळ स्पेशल रेल्वेंची वर्धा जिल्ह्यातील रुळांवरून धडधड सुरू आहे. नागरिकांना प्रवासासाठी आरक्षणाची अट असल्याने अनेकांना कमी अंतरासाठीही जादा रक्कम मोजावी लागत आहे. त्यामुळे नागरिकांनी पॅसेंजर गाड्या आणि जनरल डबे लावावेत, अशी मागणी रेटून धरली होती. मागणीची दखल घेत रेल्वे विभागाने पॅसेंजर सुरू करण्याचा निर्णयही घेतला. मात्र, त्याचे पुढे काय झाले ते कुणास ठाऊक, तसेच सध्या सुरू असलेल्या रेल्वेगाड्यांमध्ये जनरल डबे नसल्यानेदेखील प्रवाशांना जादा दराने तिकीट काढून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे जनरल डबे लागणार कधी, असा प्रश्न प्रवाशांकडून विचारण्यात येत आहे.

सध्या सुरू असलेल्या रेल्वे

मुंबई ते हावडा स्पेशल.

अहमदाबाद ते पुरी स्पेशल.

पुणे ते नागपूर स्पेशल.

पुणे ते हावडा स्पेशल.

पुणे ते हटिया स्पेशल.

मुंबई ते नागपूर स्पेशल.

अजनी ते पुणे स्पेशल.

ओख ते खुर्द स्पेशल.

गांधीधाम ते विशाखापट्टनम स्पेशल.

स्पेशल तिकिटाची खिशाला कात्री

सध्या स्पेशल रेल्वेगाड्यांचीच धडधड सुरू असून, यामुळे कमी अंतरावर जाण्यासाठीदेखील पहिले आरक्षण काढावे लागत आहे. त्यामुळे विनाकारण खिशाला अतिरिक्त पैशाची कात्री बसत आहे. रेल्वे विभागाने याची दखल घेण्याची गरज आहे.

पॅसेंजर रुळावर कधी येणार?

१० ऑक्टोबर रोजीपासून पॅसेंजर रेल्वे सुरू करण्याचा निर्णय रेल्वे विभागाने घेतला होता. मात्र, काही तांत्रिक कारणामुळे पॅसेंजर सुरू होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे पुन्हा एकदा प्रवाशांच्या आनंदावर विरजण पडले. आता पॅसेंजर रुळावर कधी येणार, असा प्रश्न सर्वसामान्य प्रवाशांकडून विचारल्या जात आहे.

प्रवासी काय म्हणतात?

सध्या स्पेशल रेल्वे सुरू असल्याने कमी अंतराच्या प्रवासासाठीदेखील जादा पैसे मोजावे लागत आहेत. त्यातच जनरल डबे लागत नसल्याने आरक्षण पक्के करावे लागत आहे, याचा नाहक त्रास होतो आहे.

-प्रणय राऊत, प्रवासी

आरक्षणाची अट ठेवल्याने रेल्वेने प्रवास करणे सध्या टाळत आहे. कमी अंतरावर जाण्यासाठीदेखील जादा पैसे मोजावे लागत असल्याने आरक्षणाची अट रद्द करण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे.

-आशुतोष धोटे, प्रवासी

टॅग्स :Public Transportसार्वजनिक वाहतूकrailwayरेल्वे