शहरं
Join us  
Trending Stories
1
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
2
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
3
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
4
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
5
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!
6
सात महिन्यांमध्ये राज्यात वाढले १४ लाख मतदार; राजकीय पक्षांकडून कोणताच आक्षेप नाही
7
iPhone 17: आयफोन १७ मालिकेची विक्री आजपासून सुरू; मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी
8
सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, वितरण २२ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार; जाणून घ्या यादी
9
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
10
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
11
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
12
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
13
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
14
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
15
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
16
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
17
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
18
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
19
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
20
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर

दिवाळीत तरी रेल्वेला जनरल डबे लागणार की नाहीत? प्रवाशांचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2021 16:36 IST

सध्या सुरू असलेल्या रेल्वेगाड्यांमध्ये जनरल डबे नसल्याने प्रवाशांना जादा दराने तिकीट काढून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे जनरल डबे लागणार कधी, असा प्रश्न प्रवाशांकडून विचारण्यात येत आहे.

ठळक मुद्देसर्वसामान्यांच्या खिसा होतोय रिकामा : रेल्वे विभागाने लक्ष देण्याची गरज

वर्धा : दिवाळीच्या काळात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत असते. मात्र, वर्धा जिल्ह्यात अजूनही पॅसेंजर रेल्वेगाडी सुरू न झाल्याने दिवाळीत तरी रेल्वेला जनरल डबे लागणार की नाहीत, असा प्रश्न सर्वसामान्यांकडून विचारला जात आहे.

कोरोनामुळे केवळ स्पेशल रेल्वेंची वर्धा जिल्ह्यातील रुळांवरून धडधड सुरू आहे. नागरिकांना प्रवासासाठी आरक्षणाची अट असल्याने अनेकांना कमी अंतरासाठीही जादा रक्कम मोजावी लागत आहे. त्यामुळे नागरिकांनी पॅसेंजर गाड्या आणि जनरल डबे लावावेत, अशी मागणी रेटून धरली होती. मागणीची दखल घेत रेल्वे विभागाने पॅसेंजर सुरू करण्याचा निर्णयही घेतला. मात्र, त्याचे पुढे काय झाले ते कुणास ठाऊक, तसेच सध्या सुरू असलेल्या रेल्वेगाड्यांमध्ये जनरल डबे नसल्यानेदेखील प्रवाशांना जादा दराने तिकीट काढून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे जनरल डबे लागणार कधी, असा प्रश्न प्रवाशांकडून विचारण्यात येत आहे.

सध्या सुरू असलेल्या रेल्वे

मुंबई ते हावडा स्पेशल.

अहमदाबाद ते पुरी स्पेशल.

पुणे ते नागपूर स्पेशल.

पुणे ते हावडा स्पेशल.

पुणे ते हटिया स्पेशल.

मुंबई ते नागपूर स्पेशल.

अजनी ते पुणे स्पेशल.

ओख ते खुर्द स्पेशल.

गांधीधाम ते विशाखापट्टनम स्पेशल.

स्पेशल तिकिटाची खिशाला कात्री

सध्या स्पेशल रेल्वेगाड्यांचीच धडधड सुरू असून, यामुळे कमी अंतरावर जाण्यासाठीदेखील पहिले आरक्षण काढावे लागत आहे. त्यामुळे विनाकारण खिशाला अतिरिक्त पैशाची कात्री बसत आहे. रेल्वे विभागाने याची दखल घेण्याची गरज आहे.

पॅसेंजर रुळावर कधी येणार?

१० ऑक्टोबर रोजीपासून पॅसेंजर रेल्वे सुरू करण्याचा निर्णय रेल्वे विभागाने घेतला होता. मात्र, काही तांत्रिक कारणामुळे पॅसेंजर सुरू होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे पुन्हा एकदा प्रवाशांच्या आनंदावर विरजण पडले. आता पॅसेंजर रुळावर कधी येणार, असा प्रश्न सर्वसामान्य प्रवाशांकडून विचारल्या जात आहे.

प्रवासी काय म्हणतात?

सध्या स्पेशल रेल्वे सुरू असल्याने कमी अंतराच्या प्रवासासाठीदेखील जादा पैसे मोजावे लागत आहेत. त्यातच जनरल डबे लागत नसल्याने आरक्षण पक्के करावे लागत आहे, याचा नाहक त्रास होतो आहे.

-प्रणय राऊत, प्रवासी

आरक्षणाची अट ठेवल्याने रेल्वेने प्रवास करणे सध्या टाळत आहे. कमी अंतरावर जाण्यासाठीदेखील जादा पैसे मोजावे लागत असल्याने आरक्षणाची अट रद्द करण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे.

-आशुतोष धोटे, प्रवासी

टॅग्स :Public Transportसार्वजनिक वाहतूकrailwayरेल्वे