शहरं
Join us  
Trending Stories
1
'PM मोदींनी आपला हट्टीपणा सोडावा', असीम मुनीरच्या अमेरिका दौऱ्यावरुन काँग्रेसची टीका
2
भारतासोबत अतिशय घाणेरडा खेळ...! आसिम मुनीरच्या प्रेमात पडली अमेरिका, हे काय बोलले टॉप लष्करी कमांडर...?
3
राज कुशवाह तर मोहरा, सोनमचं खरं प्रेम कुणीतरी दुसरंच...? राजा रघुवंशी प्रकरणात नवा 'ट्विस्ट'
4
३००० रुपयांवरील UPI पेमेंट वर शुल्क लागणार का, सरकारनं काय म्हटलं? जाणून घ्या डिटेल्स
5
महायुती अन् मविआच्याही एकसंधतेवर प्रश्नचिन्हच; पडघम वाजले, चित्र अस्पष्ट
6
आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी : पंढरीच्या वाटेत दर पाच किलोमीटरवर आपला दवाखाना, दहा खाटांचे आयसीयू
7
शेअर बाजाराची सुस्त सुरुवात, ५६ अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स; Infosys मध्ये घसरण, 'या' शेअर्समध्ये तेजी
8
RCB वर मोठी कारवाई होणार? BCCI बैठकीत काय निर्णय घेणार? समोर आली खास अपडेट
9
निवृत्तीचे वय ६० करण्यास होतोय विरोध, दुसरीकडे ६५ पर्यंत काम करण्याची मुभा
10
मुंबईत १६ वर्षाच्या मुलीवर अत्याचार, गर्भवती राहिल्यानंतर धक्कादायक प्रकार उघड, गुन्हा दाखल
11
Swami Samartha: राग, चिडचिड, नैराश्य घालवण्याचा रामबाण उपाय म्हणजे 'हा' स्वामी संदेश!
12
एक स्मार्ट डिसिजन EPFO कडून मिळवून देईल अधिक पेन्शन; वय आणि कमाईचं कनेक्शन बहुतेकांना माहीत नाही
13
हूल दिलेल्या मान्सूनची पुन्हा चाहूल; राज्यभर ऑरेंज अलर्ट, धो धो बरसणार
14
मराठा आरक्षणावरील सुनावणी १८ जुलैपासून, अंतिम निकालावरच भवितव्य अवलंबून
15
'महाभारत' सिनेमानंतर आमिर खान खरंच निवृत्ती घेणार? चर्चांवर म्हणाला, "आजकाल लोक..."
16
घटस्फोटानंतर दोन महिन्यातच एक्स पतीचं निधन, त्याच्या आठवणीत अभिनेत्री शुभांगी अत्रे भावुक
17
कोपरखैरणेत बेरोजगार पतीचं हादरवणारं कृत्य; पत्नीची मैत्रीण घरात शिरताच उडाला थरकाप
18
आजचे राशीभविष्य, १२ जून २०२५: आजचा दिवस यशदायी, पदोन्नती संभवते, मित्र भेटतील !
19
होमस्टेमध्ये सापडलेल्या 'त्या' गोष्टीमुळे पोलिसांना सोनमवर आला संशय; पुराव्याने हत्येचे गूढ उकले
20
अमेरिका आंदोलनाने पेटली, १२ राज्यांतील २५ शहरांत लोक उतरले रस्त्यावर; लॉस एंजिलिसमध्ये संचारबंदीनंतर आंदोलन चिरडून टाकण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रयत्न

दिवाळीत तरी रेल्वेला जनरल डबे लागणार की नाहीत? प्रवाशांचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2021 16:36 IST

सध्या सुरू असलेल्या रेल्वेगाड्यांमध्ये जनरल डबे नसल्याने प्रवाशांना जादा दराने तिकीट काढून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे जनरल डबे लागणार कधी, असा प्रश्न प्रवाशांकडून विचारण्यात येत आहे.

ठळक मुद्देसर्वसामान्यांच्या खिसा होतोय रिकामा : रेल्वे विभागाने लक्ष देण्याची गरज

वर्धा : दिवाळीच्या काळात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत असते. मात्र, वर्धा जिल्ह्यात अजूनही पॅसेंजर रेल्वेगाडी सुरू न झाल्याने दिवाळीत तरी रेल्वेला जनरल डबे लागणार की नाहीत, असा प्रश्न सर्वसामान्यांकडून विचारला जात आहे.

कोरोनामुळे केवळ स्पेशल रेल्वेंची वर्धा जिल्ह्यातील रुळांवरून धडधड सुरू आहे. नागरिकांना प्रवासासाठी आरक्षणाची अट असल्याने अनेकांना कमी अंतरासाठीही जादा रक्कम मोजावी लागत आहे. त्यामुळे नागरिकांनी पॅसेंजर गाड्या आणि जनरल डबे लावावेत, अशी मागणी रेटून धरली होती. मागणीची दखल घेत रेल्वे विभागाने पॅसेंजर सुरू करण्याचा निर्णयही घेतला. मात्र, त्याचे पुढे काय झाले ते कुणास ठाऊक, तसेच सध्या सुरू असलेल्या रेल्वेगाड्यांमध्ये जनरल डबे नसल्यानेदेखील प्रवाशांना जादा दराने तिकीट काढून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे जनरल डबे लागणार कधी, असा प्रश्न प्रवाशांकडून विचारण्यात येत आहे.

सध्या सुरू असलेल्या रेल्वे

मुंबई ते हावडा स्पेशल.

अहमदाबाद ते पुरी स्पेशल.

पुणे ते नागपूर स्पेशल.

पुणे ते हावडा स्पेशल.

पुणे ते हटिया स्पेशल.

मुंबई ते नागपूर स्पेशल.

अजनी ते पुणे स्पेशल.

ओख ते खुर्द स्पेशल.

गांधीधाम ते विशाखापट्टनम स्पेशल.

स्पेशल तिकिटाची खिशाला कात्री

सध्या स्पेशल रेल्वेगाड्यांचीच धडधड सुरू असून, यामुळे कमी अंतरावर जाण्यासाठीदेखील पहिले आरक्षण काढावे लागत आहे. त्यामुळे विनाकारण खिशाला अतिरिक्त पैशाची कात्री बसत आहे. रेल्वे विभागाने याची दखल घेण्याची गरज आहे.

पॅसेंजर रुळावर कधी येणार?

१० ऑक्टोबर रोजीपासून पॅसेंजर रेल्वे सुरू करण्याचा निर्णय रेल्वे विभागाने घेतला होता. मात्र, काही तांत्रिक कारणामुळे पॅसेंजर सुरू होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे पुन्हा एकदा प्रवाशांच्या आनंदावर विरजण पडले. आता पॅसेंजर रुळावर कधी येणार, असा प्रश्न सर्वसामान्य प्रवाशांकडून विचारल्या जात आहे.

प्रवासी काय म्हणतात?

सध्या स्पेशल रेल्वे सुरू असल्याने कमी अंतराच्या प्रवासासाठीदेखील जादा पैसे मोजावे लागत आहेत. त्यातच जनरल डबे लागत नसल्याने आरक्षण पक्के करावे लागत आहे, याचा नाहक त्रास होतो आहे.

-प्रणय राऊत, प्रवासी

आरक्षणाची अट ठेवल्याने रेल्वेने प्रवास करणे सध्या टाळत आहे. कमी अंतरावर जाण्यासाठीदेखील जादा पैसे मोजावे लागत असल्याने आरक्षणाची अट रद्द करण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे.

-आशुतोष धोटे, प्रवासी

टॅग्स :Public Transportसार्वजनिक वाहतूकrailwayरेल्वे