शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

दिवाळीत तरी रेल्वेला जनरल डबे लागणार की नाहीत? प्रवाशांचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2021 16:36 IST

सध्या सुरू असलेल्या रेल्वेगाड्यांमध्ये जनरल डबे नसल्याने प्रवाशांना जादा दराने तिकीट काढून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे जनरल डबे लागणार कधी, असा प्रश्न प्रवाशांकडून विचारण्यात येत आहे.

ठळक मुद्देसर्वसामान्यांच्या खिसा होतोय रिकामा : रेल्वे विभागाने लक्ष देण्याची गरज

वर्धा : दिवाळीच्या काळात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत असते. मात्र, वर्धा जिल्ह्यात अजूनही पॅसेंजर रेल्वेगाडी सुरू न झाल्याने दिवाळीत तरी रेल्वेला जनरल डबे लागणार की नाहीत, असा प्रश्न सर्वसामान्यांकडून विचारला जात आहे.

कोरोनामुळे केवळ स्पेशल रेल्वेंची वर्धा जिल्ह्यातील रुळांवरून धडधड सुरू आहे. नागरिकांना प्रवासासाठी आरक्षणाची अट असल्याने अनेकांना कमी अंतरासाठीही जादा रक्कम मोजावी लागत आहे. त्यामुळे नागरिकांनी पॅसेंजर गाड्या आणि जनरल डबे लावावेत, अशी मागणी रेटून धरली होती. मागणीची दखल घेत रेल्वे विभागाने पॅसेंजर सुरू करण्याचा निर्णयही घेतला. मात्र, त्याचे पुढे काय झाले ते कुणास ठाऊक, तसेच सध्या सुरू असलेल्या रेल्वेगाड्यांमध्ये जनरल डबे नसल्यानेदेखील प्रवाशांना जादा दराने तिकीट काढून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे जनरल डबे लागणार कधी, असा प्रश्न प्रवाशांकडून विचारण्यात येत आहे.

सध्या सुरू असलेल्या रेल्वे

मुंबई ते हावडा स्पेशल.

अहमदाबाद ते पुरी स्पेशल.

पुणे ते नागपूर स्पेशल.

पुणे ते हावडा स्पेशल.

पुणे ते हटिया स्पेशल.

मुंबई ते नागपूर स्पेशल.

अजनी ते पुणे स्पेशल.

ओख ते खुर्द स्पेशल.

गांधीधाम ते विशाखापट्टनम स्पेशल.

स्पेशल तिकिटाची खिशाला कात्री

सध्या स्पेशल रेल्वेगाड्यांचीच धडधड सुरू असून, यामुळे कमी अंतरावर जाण्यासाठीदेखील पहिले आरक्षण काढावे लागत आहे. त्यामुळे विनाकारण खिशाला अतिरिक्त पैशाची कात्री बसत आहे. रेल्वे विभागाने याची दखल घेण्याची गरज आहे.

पॅसेंजर रुळावर कधी येणार?

१० ऑक्टोबर रोजीपासून पॅसेंजर रेल्वे सुरू करण्याचा निर्णय रेल्वे विभागाने घेतला होता. मात्र, काही तांत्रिक कारणामुळे पॅसेंजर सुरू होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे पुन्हा एकदा प्रवाशांच्या आनंदावर विरजण पडले. आता पॅसेंजर रुळावर कधी येणार, असा प्रश्न सर्वसामान्य प्रवाशांकडून विचारल्या जात आहे.

प्रवासी काय म्हणतात?

सध्या स्पेशल रेल्वे सुरू असल्याने कमी अंतराच्या प्रवासासाठीदेखील जादा पैसे मोजावे लागत आहेत. त्यातच जनरल डबे लागत नसल्याने आरक्षण पक्के करावे लागत आहे, याचा नाहक त्रास होतो आहे.

-प्रणय राऊत, प्रवासी

आरक्षणाची अट ठेवल्याने रेल्वेने प्रवास करणे सध्या टाळत आहे. कमी अंतरावर जाण्यासाठीदेखील जादा पैसे मोजावे लागत असल्याने आरक्षणाची अट रद्द करण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे.

-आशुतोष धोटे, प्रवासी

टॅग्स :Public Transportसार्वजनिक वाहतूकrailwayरेल्वे