शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
4
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
5
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
6
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
7
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
8
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
9
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
10
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
12
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
13
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
14
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
15
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
16
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
17
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
18
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
19
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

गो-सेवा केंद्र योजनेत वर्ध्यातील ‘एमगिरी’ नोडल एजन्सी बनणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2023 11:24 IST

मुख्यमंत्र्यांसोबतच बैठकीत चर्चा : निदेशकांच्या प्रस्तावाला तत्त्वत: मान्यता

वर्धा : महाराष्ट्रातील गोशाळांच्या सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र शासनाने घोषित केलेल्या ‘गोवर्धन गोवंश सेवा केंद्र’ योजनेच्या अंमलबजावणीसाठी वर्ध्यातील महात्मा गांधी ग्रामीण औद्योगिकीकरण संस्था (एमगिरी)ला ‘नोडल एजन्सी’ म्हणून नियुक्त करण्यासाठी ‘एमगिरी’चे निदेशक डॉ. आशुतोष मुरकुटे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन प्रस्ताव सादर केला. त्याला मुख्यमंत्र्यांनी तत्त्वत: मान्यताही दिली आहे.

बैठकीला केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांचीही उपस्थिती होती. ‘गोवर्धन गोवंश सेवा केंद्र’ योजनेंतर्गत पशुसंवर्धन मंत्रालयामार्फत पशुधनाच्या आधारे महाराष्ट्रातील ३२४ तालुक्यांमध्ये प्रत्येकी एक गोशाळा निवडून १५ ते २५ लाख रुपयांचे अनुदान दिले जाईल. या अनुदानाच्या रकमेतून ३२४ गो-शाळांमध्ये दूध न देणाऱ्या गायी आणि वृद्ध जनावरांची देखभाल, चारा शेडची व्यवस्था आणि प्रत्येक गोशाळेत पंचगव्यांचे उत्पादन आणि विक्री करण्यास प्रोत्साहन दिले जाणार आहे.

डॉ. आशुतोष मुरकुटे यांनी ‘एमगिरी’द्वारा विकसित केलेल्या पंचगव्य संबंधित तंत्राद्वारे महाराष्ट्रातील सर्व गोशाळा स्वयंपूर्ण आणि रोजगार निर्मिती केंद्र बनविण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या गो-सेवा केंद्र योजनेतील ‘नोडल एजन्सी’ बनविण्याचा प्रस्ताव मांडला आहे. लवकरच पशुसंवर्धन मंत्रालयाशी चर्चा करून हे काम पुढे नेण्याचे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले. बैठकीत डॉ. मुरकुटे यांनी मुख्यमंत्र्यांना गांधी विचारधारेवर आधारित ग्रामोद्योगांना चालना देण्यासाठी संस्थेमार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली आणि ‘एमगिरी’ने विकसित केलेल्या तंत्रज्ञानाची पुस्तिकाही त्यांना भेट म्हणून दिली.

‘एमगिरी’ने १७५ गोशाळांना दिले पंचगव्याचे प्रशिक्षण

देशात पंचगव्य उत्पादनांचे मानकीकरण आणि त्यांची परिणामकारकता यावर संशोधन करणारी आणि पंचगव्य आधारित उत्पादनांवर उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करणारी एमगिरी, वर्धा ही देशातील एकमेव संस्था आहे. खादी ग्रामोद्योग आयोगाने गेल्या आर्थिक वर्षात राष्ट्रीय कामधेनू आयोगाच्या शिफारशीवरून ‘एमगिरी’ला दिलेल्या प्रकल्पात देशातील १७५ गोशाळांतील लोकांना पंचगव्य आधारित उत्पादनांच्या उद्योगाचे यशस्वी प्रशिक्षण संस्थेचे डॉ. जयकिशोर छांगाणी यांच्या मार्गदर्शनात दिले गेले.

टॅग्स :Governmentसरकारwardha-acवर्धा