शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

गो-सेवा केंद्र योजनेत वर्ध्यातील ‘एमगिरी’ नोडल एजन्सी बनणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2023 11:24 IST

मुख्यमंत्र्यांसोबतच बैठकीत चर्चा : निदेशकांच्या प्रस्तावाला तत्त्वत: मान्यता

वर्धा : महाराष्ट्रातील गोशाळांच्या सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र शासनाने घोषित केलेल्या ‘गोवर्धन गोवंश सेवा केंद्र’ योजनेच्या अंमलबजावणीसाठी वर्ध्यातील महात्मा गांधी ग्रामीण औद्योगिकीकरण संस्था (एमगिरी)ला ‘नोडल एजन्सी’ म्हणून नियुक्त करण्यासाठी ‘एमगिरी’चे निदेशक डॉ. आशुतोष मुरकुटे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन प्रस्ताव सादर केला. त्याला मुख्यमंत्र्यांनी तत्त्वत: मान्यताही दिली आहे.

बैठकीला केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांचीही उपस्थिती होती. ‘गोवर्धन गोवंश सेवा केंद्र’ योजनेंतर्गत पशुसंवर्धन मंत्रालयामार्फत पशुधनाच्या आधारे महाराष्ट्रातील ३२४ तालुक्यांमध्ये प्रत्येकी एक गोशाळा निवडून १५ ते २५ लाख रुपयांचे अनुदान दिले जाईल. या अनुदानाच्या रकमेतून ३२४ गो-शाळांमध्ये दूध न देणाऱ्या गायी आणि वृद्ध जनावरांची देखभाल, चारा शेडची व्यवस्था आणि प्रत्येक गोशाळेत पंचगव्यांचे उत्पादन आणि विक्री करण्यास प्रोत्साहन दिले जाणार आहे.

डॉ. आशुतोष मुरकुटे यांनी ‘एमगिरी’द्वारा विकसित केलेल्या पंचगव्य संबंधित तंत्राद्वारे महाराष्ट्रातील सर्व गोशाळा स्वयंपूर्ण आणि रोजगार निर्मिती केंद्र बनविण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या गो-सेवा केंद्र योजनेतील ‘नोडल एजन्सी’ बनविण्याचा प्रस्ताव मांडला आहे. लवकरच पशुसंवर्धन मंत्रालयाशी चर्चा करून हे काम पुढे नेण्याचे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले. बैठकीत डॉ. मुरकुटे यांनी मुख्यमंत्र्यांना गांधी विचारधारेवर आधारित ग्रामोद्योगांना चालना देण्यासाठी संस्थेमार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली आणि ‘एमगिरी’ने विकसित केलेल्या तंत्रज्ञानाची पुस्तिकाही त्यांना भेट म्हणून दिली.

‘एमगिरी’ने १७५ गोशाळांना दिले पंचगव्याचे प्रशिक्षण

देशात पंचगव्य उत्पादनांचे मानकीकरण आणि त्यांची परिणामकारकता यावर संशोधन करणारी आणि पंचगव्य आधारित उत्पादनांवर उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करणारी एमगिरी, वर्धा ही देशातील एकमेव संस्था आहे. खादी ग्रामोद्योग आयोगाने गेल्या आर्थिक वर्षात राष्ट्रीय कामधेनू आयोगाच्या शिफारशीवरून ‘एमगिरी’ला दिलेल्या प्रकल्पात देशातील १७५ गोशाळांतील लोकांना पंचगव्य आधारित उत्पादनांच्या उद्योगाचे यशस्वी प्रशिक्षण संस्थेचे डॉ. जयकिशोर छांगाणी यांच्या मार्गदर्शनात दिले गेले.

टॅग्स :Governmentसरकारwardha-acवर्धा