शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
2
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
3
पालिका बँक निवडणुकीत ठाकरे, दरेकर गटाला धक्का, सहकार पॅनलने मारली बाजी
4
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
5
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
6
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
7
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
8
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
9
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
10
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
11
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
12
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
13
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
14
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
15
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
16
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
17
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
18
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
19
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
20
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक

जंगली श्वापदांमुळे शेतकऱ्यांना ३० लाखांचा फटका

By admin | Updated: February 1, 2015 23:00 IST

नैसर्गिक आपत्ती व शासकीय उदासीानतेच्या चाकात फसलेल्या शेतकऱ्यांना जंगली श्वापदांच्या हल्ल्याचाही सामना करावा लागत आहे. डिसेंबर २०१४ अखेर पर्यंत जंगली श्वापदांच्या हल्ल्यात

रूपेश खैरी - वर्धानैसर्गिक आपत्ती व शासकीय उदासीानतेच्या चाकात फसलेल्या शेतकऱ्यांना जंगली श्वापदांच्या हल्ल्याचाही सामना करावा लागत आहे. डिसेंबर २०१४ अखेर पर्यंत जंगली श्वापदांच्या हल्ल्यात शेतकऱ्यांचे ३० लाख ३४ हजार ११८ रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती आहे. यातील काही शेतकऱ्यांना मदत मिळाली तर काहंीना अद्यापही मदतीची प्रतीक्षा कायम आहे. जिल्ह्यात बोर अभयारण्य आहे तर जिल्ह्याच्या सिमेवर ताडोबाच्या जंगलाचा काही भाग येत आहे. या जंगलातील श्वापदे अन्नाच्या शोधात येत लगतच्या शेतात धुडगूस घालतात. या श्वापदांकडून शेतातील कोणत्याही एका भागातील पिकाचे नुकसान होते. नुकसान करून पळून जाताना ही श्वापदे शेतातील पूर्ण पिकच तुडवत असल्याचे चित्र आहे. वन विभागाकडून मात्र एकाच भागातील पिकाची पाहणी करून मदत मिळते. जिल्ह्यात या श्वापदांनी एकूण ४९९ शेतकऱ्यांच्या शेतातील पीक उद्ध्वस्त केले. याची पाहणी वनविभागाच्यावतीने करण्यात आली असून काही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात आली आहे. तर काही शेतकरी अद्यापही मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांना अनुदान नसल्याचे कारण सांगण्यात येत आहे. या वन्य प्राण्यांनी केवळ शेतीचेच नाही तर शेतकऱ्यांच्या पशुधनावरही हल्ला चढविला आहे. त्यांनी जिल्ह्यात यंदाच्या सत्रात आतापर्यंत एकूण ९१ जनावरांचा फडशा पाडला आहे. तर १३ व्यक्तींवर हल्ला केला आहे. सुदैवाने यात एकाचाही मृत्यू झाला नाही. या सर्व प्रकरणात वनविभागाच्यावतीने मदत देण्यात असली तरी या मदतीकरिता वनविभागाच्या कार्यालयात चकरा मारणे शेतकऱ्यांना परवडणारे नाही. अशात कधी नियमाची आडकाठी तर कधी अनुदान नसल्याचा रोडा असल्यामुळे शेतकऱ्यांना नाईलाजास्तव या नुसानीचा सामाना करावा लागत आहे. यावर शासनाच्यावतीे ठोस उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.