शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
3
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
4
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
5
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
6
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
7
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
8
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
9
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
10
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
11
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
12
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
13
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
14
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
15
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
16
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
17
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
18
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
19
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
20
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली

जंगली श्वापदांमुळे शेतकऱ्यांना ३० लाखांचा फटका

By admin | Updated: February 1, 2015 23:00 IST

नैसर्गिक आपत्ती व शासकीय उदासीानतेच्या चाकात फसलेल्या शेतकऱ्यांना जंगली श्वापदांच्या हल्ल्याचाही सामना करावा लागत आहे. डिसेंबर २०१४ अखेर पर्यंत जंगली श्वापदांच्या हल्ल्यात

रूपेश खैरी - वर्धानैसर्गिक आपत्ती व शासकीय उदासीानतेच्या चाकात फसलेल्या शेतकऱ्यांना जंगली श्वापदांच्या हल्ल्याचाही सामना करावा लागत आहे. डिसेंबर २०१४ अखेर पर्यंत जंगली श्वापदांच्या हल्ल्यात शेतकऱ्यांचे ३० लाख ३४ हजार ११८ रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती आहे. यातील काही शेतकऱ्यांना मदत मिळाली तर काहंीना अद्यापही मदतीची प्रतीक्षा कायम आहे. जिल्ह्यात बोर अभयारण्य आहे तर जिल्ह्याच्या सिमेवर ताडोबाच्या जंगलाचा काही भाग येत आहे. या जंगलातील श्वापदे अन्नाच्या शोधात येत लगतच्या शेतात धुडगूस घालतात. या श्वापदांकडून शेतातील कोणत्याही एका भागातील पिकाचे नुकसान होते. नुकसान करून पळून जाताना ही श्वापदे शेतातील पूर्ण पिकच तुडवत असल्याचे चित्र आहे. वन विभागाकडून मात्र एकाच भागातील पिकाची पाहणी करून मदत मिळते. जिल्ह्यात या श्वापदांनी एकूण ४९९ शेतकऱ्यांच्या शेतातील पीक उद्ध्वस्त केले. याची पाहणी वनविभागाच्यावतीने करण्यात आली असून काही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात आली आहे. तर काही शेतकरी अद्यापही मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांना अनुदान नसल्याचे कारण सांगण्यात येत आहे. या वन्य प्राण्यांनी केवळ शेतीचेच नाही तर शेतकऱ्यांच्या पशुधनावरही हल्ला चढविला आहे. त्यांनी जिल्ह्यात यंदाच्या सत्रात आतापर्यंत एकूण ९१ जनावरांचा फडशा पाडला आहे. तर १३ व्यक्तींवर हल्ला केला आहे. सुदैवाने यात एकाचाही मृत्यू झाला नाही. या सर्व प्रकरणात वनविभागाच्यावतीने मदत देण्यात असली तरी या मदतीकरिता वनविभागाच्या कार्यालयात चकरा मारणे शेतकऱ्यांना परवडणारे नाही. अशात कधी नियमाची आडकाठी तर कधी अनुदान नसल्याचा रोडा असल्यामुळे शेतकऱ्यांना नाईलाजास्तव या नुसानीचा सामाना करावा लागत आहे. यावर शासनाच्यावतीे ठोस उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.