शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार हे महाराष्ट्रातील कट कारस्थानाचा कारखाना, त्यांच्यावर..."; गोपीचंद पडळकरांची बोचरी टीका
2
दिल्ली-मुंबई हल्ल्यात मसूद अजहरचा हात; जैश कमांडर इलियासचा आणखी एक कबुलीजबाब
3
साखर कारखान्याच्या टँकरमध्ये सापडले दोन तरुणांचे मृतदेह, गार्ड आणि अधिकारी गायब  
4
मंत्र्यांच्या बंगल्यांच्या दुरुस्तीसाठी कोटींची उधळपट्टी? कंत्राटदाराने २१ टक्के 'बिलो'ने काम घेतल्याने प्रकार उघडकीस
5
इनरवेअर बनवणाऱ्या शेअरचा जलवा! १०० स्टॉक्समधून एकाच महिन्यात २ लाख रुपयांची कमाई
6
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
7
"आमचे प्रेरणास्रोत..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींना इटलीच्या जॉर्जिया मेलोनी यांच्याकडून खास शुभेच्छा
8
अशक्यही होईल शक्य फक्त जिद्द हवी; १५ वर्षीय दृष्टीहीन करुणाने मिळवलं भारतीय संघात स्थान
9
५% व्याजावर ३ लाख रुपयांपर्यंतचं लोन; 'या' लोकांसाठी आहे मोदी सरकारचं मोठं गिफ्ट
10
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
11
कंपन्या जीएसटी रिकव्हरीच्या मुडमध्ये! २२ सप्टेंबरआधीच शाम्पू, साबण २० टक्के डिस्काऊंटवर विकू लागल्या... 
12
"महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना  हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्या’’, काँग्रेसची मागणी   
13
पत्नीचं अफेअर, पतीला लागली कुणकुण; जळफळाट झाला अन् खुनी खेळ रंगला!
14
सॉवरेन गोल्ड बॉंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! ६ वर्षांत १८३% परतावा, RBI ने जाहीर केली मुदतीपूर्वीची किंमत
15
WiFi कनेक्शन बंद केल्याने पोटच्या लेकानेच केली आईची हत्या; वडील म्हणाले, "मुलाला फाशी द्या"
16
"अमेरिका, युरोपमधून इस्लाम संपुष्टात आणणार’’, ट्रम्प समर्थक महिला नेत्याचं वादग्रस्त विधान  
17
आता जेवढा जीएसटी कमी झालाय ना, तेवढ्याला १९८६ मध्ये बुलेट मिळत होती...
18
बोल्ड लूकसह स्मार्ट फीचर्स! होन्डाची पहिली इलेक्ट्रिक बाईक लॉन्च, एका चार्जवर १३० किमी धावणार
19
लग्नाच्या अवघ्या २०व्या दिवशी नवरी झाली फरार; नवऱ्याला म्हणाली लवकर जाऊन येते अन्...
20
पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील बायोपिकची घोषणा, हा अभिनेता साकारणार भूमिका, पोस्टर रिलीज

महागडे बियाणे कशाला? घरातील सोयाबीन करेल तुम्हाला मालामाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2022 05:00 IST

सध्या सोयाबीन उत्पादक सोयाबीन मळणीच्या कामाला गती देत आहेत. जिल्ह्यात उत्पादित होणारे हेच सोयाबीन खरिपात सोयाबीनची लागवड करणाऱ्यांना दिलासा देणारे ठरणार आहे. विशेष म्हणजे मागील काही वर्षांपासून बियाण्यांच्या दरात दिवसेंदिवस वाढ आहे, तर यंदा डिझेल दरवाढीमुळे बियाण्यांच्या किमतीवरही त्याचा परिणाम पडल्याचे काही कृषी व्यावसायिक सांगतात.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यातील शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीला लागले असून, सध्या उन्हाळवाहीची कामे पूर्ण केली जात आहेत. खरीप हंगामात ४ लाख ३७ हजार हेक्टरवर विविध पिकांची पेरणी होणार असून, सोयाबीनसाठी एक लाख ४२ हजार क्विंटल तर इतर पिकासाठी ९ हजार ८५१ क्विंटल बियाण्यांची आवश्यकता भासणार आहे.मोठ्या प्रमाणात बियाण्यांची गरज भासणार असली तरी यंदाच्या उन्हाळी हंगामात जिल्ह्यात तब्बल ७०३.४ हेक्टर जमिनीवर उन्हाळी सोयाबीनची लागवड झाली होती, तर सध्या सोयाबीन उत्पादक सोयाबीन मळणीच्या कामाला गती देत आहेत. जिल्ह्यात उत्पादित होणारे हेच सोयाबीन खरिपात सोयाबीनची लागवड करणाऱ्यांना दिलासा देणारे ठरणार आहे. विशेष म्हणजे मागील काही वर्षांपासून बियाण्यांच्या दरात दिवसेंदिवस वाढ आहे, तर यंदा डिझेल दरवाढीमुळे बियाण्यांच्या किमतीवरही त्याचा परिणाम पडल्याचे काही कृषी व्यावसायिक सांगतात. त्यामुळेच वाढत्या महागाईत महागडे बियाणे घेण्यापेक्षा घरातील सोयाबीन शेतकऱ्यांना मालामाल करण्याची शक्यता असून, शेतीवरील उत्पादन खर्च कमी करण्यासाठी घरचेच बियाणे शेतकऱ्यांनी वापरावे, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे.

७०३.४ हेक्टरवर उन्हाळी पेरासिंचनाची सोय असलेल्या अनेक शेतकऱ्यांनी यंदा उन्हाळी सोयाबीन लागवडीला पसंती दर्शविली. ७०३.४ हेक्टरवर उन्हाळी सोयाबीनचा पेरा झाला असून, सध्या सोयाबीन मळणीच्या कामाला शेतकरी गती देत आहेत.

९० हजार मेट्रिक टन खताची लागणार गरजजिल्ह्याला ९० हजार मेट्रिक टन खताची आवश्यकता असून, मागणी प्रमाणे बियाणे व खते उपलब्ध होणार आहे. खतांचा ४ हजार ६७० मेट्रिक टन इतका बफर स्टॉक करण्यात आला आहे. शिवाय खरीप हंगामात बांधावर खते व बियाणे या योजनेंतर्गत ४ हजार ३०० शेतकऱ्यांना त्यांच्या शेतावर खते व बियाणे उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

घरच्या घरी करा बीज प्रक्रियाशेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये या उद्देशाने मागील वर्षी तसेच यंदाही जिल्ह्यात विशेष प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. अवघ्या काही तासांच्या प्रशिक्षणाअंति शेतकऱ्यांना घरच्या घरीच बीज प्रक्रिया करून बियाण्याची गुणवत्ता तपासता येते. त्यामुळे  फसवणूक टळते.

१ हजार १७० कोटी पीककर्ज वाटपाचे उद्दिष्टयंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना १ हजार १७० कोटी रुपयांचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे. मागेल त्याला पीककर्ज उपलब्ध करून देण्यासाठी विशेष रणनिती तयार करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

गौडबंगाल करणाऱ्यांवर होणार कारवाई

खरीप हंगामात बोगस बियाणे विकल्या जाण्याची शक्यता असल्याने कृषी विभागाच्या वतीने विशेष भरारी पथके तयार करण्यात आली आहे. त्यात जिल्हास्तरीय एक तर तालुका स्तरावर प्रत्येकी एक पथकाचा समावेश आहे. बोगस बियाणे विकणाऱ्यांवर कायदेशीर कठोर कारवाई केली जाणार आहे.

शेतकऱ्यांनी शेतीवरील उत्पादन खर्च करू करण्याच्या उद्देशाने घरातीलच सोयाबीनचा बियाणे म्हणून वापर करावा. गुणवत्ता तपासण्यासाठी सुरुवातीला बीज प्रक्रिया करावी. जिल्ह्यात बियाणे व खताचा तुटवडा निर्माण होणार नाही, असे नियोजन करण्यात आले आहे.- अनिल इंगळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वर्धा

 

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी