शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
6
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
7
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
8
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
9
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
10
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
11
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
12
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
13
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
14
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
15
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
16
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
17
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
18
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
19
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती

पॅसेंजर रेल्वे अद्यापही ‘लॉक’ का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 05:00 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तब्बल आठ ते नऊ महिने रेल्वे वाहतूक ठप्प होती. त्यानंतर शिथिलता मिळाल्याने रेल्वे सेवा सुरू झाली. काही बोटांवर मोजण्याइतपत स्पेशल ट्रेन्स सुरू करण्यात आल्या. मात्र, आता कोरोना नियंत्रणात आला असला तरीदेखील पॅसेंजर रेल्वे सुरू न झाल्यामुळे प्रवाशांना जादा पैसे मोजावे लागत आहेत. त्यामुळे तत्काळ पॅसेंजर रेल्वे सुरू करण्याबाबत रेल्वे विभागाने दखल घ्यावी, अशी मागणी आता प्रवाशांकडून केली जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पॅसेंजर रेल्वे गाड्या बंद करण्यात आल्या. मात्र, आता सर्वत्र निर्बंध शिथिल झाले असून अनलॉक झाले असले तरी पॅसेंजर रेल्वे का बंद आहेत, याबाबतची विचारणा प्रवाशांकडून केली जात असून त्यांच्यात रोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, याबाबत अजून कुठलाही निर्णय रेल्वे विभागाने घेतला नसल्याची माहिती रेल्वे विभागातील अधिकाऱ्यांनी दिली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तब्बल आठ ते नऊ महिने रेल्वे वाहतूक ठप्प होती. त्यानंतर शिथिलता मिळाल्याने रेल्वे सेवा सुरू झाली. काही बोटांवर मोजण्याइतपत स्पेशल ट्रेन्स सुरू करण्यात आल्या. मात्र, आता कोरोना नियंत्रणात आला असला तरीदेखील पॅसेंजर रेल्वे सुरू न झाल्यामुळे प्रवाशांना जादा पैसे मोजावे लागत आहेत. त्यामुळे तत्काळ पॅसेंजर रेल्वे सुरू करण्याबाबत रेल्वे विभागाने दखल घ्यावी, अशी मागणी आता प्रवाशांकडून केली जात आहे. पॅसेंजर गाड्या सुरु न झाल्याने अनेक प्रवाशांमध्ये नाराजी पसरली आहे.

या पॅसेंजर रेल्वे अजूनही बंदच- वर्धा रेल्वे स्थानकावरुन नागपूर- अमरावती पॅसेंजर, अमरावती- नागपूर पॅसेंजर, वर्धा - भुसावळ, तर भुसावळ ते वर्धा अशा पॅसेंजर रेल्वेगाड्या सुरु होत्या. तर सेवाग्राम रेल्वेस्थानकावरुन काजीपेठ ते बल्लारशाह पॅसेंजर रेल्वे गाडी सुरु होती.मात्र, कोरोनामुळे यासर्व रेल्वेगाड्या अजूनही बंदच असल्याने प्रवाशांना आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत आहे.

सुरू असलेल्या स्पेशल ट्रेन्सnसध्या वर्धा रेल्वेस्थानकाहून ३२ रेल्वेगाड्यांची धडधड सुरु आहे. यामध्ये प्रतिदिन धावणाऱ्या गाड्यांमध्ये मुंबई - गांदिया स्पेशल, अहमदाबाद - चेन्नई स्पेशल, मुंबई - हावडा स्पेशल, कोल्हापूर - गाेंदिया स्पेशल, अहमदाबाद - हावडा स्पेशल, पुणे- हावडा स्पेशल, मुंबई - नागपूर स्पेशल या स्पेशल रेल्वे सध्या सुरु असल्याची माहिती रेल्वे विभागाने दिली आहे.

रेल्वेचा प्रवास परवडेना !

कोरोनापूर्वी रेल्वेने नागपूर येथून अपडाऊन करायचो. मात्र, पॅसेंजर रेल्वे बंद झाल्याने मोठे हाल झाले. सध्या केवळ स्पेशल रेल्वेगाड्या धावत असून त्यातही आरक्षणाची अट असल्याने दुप्पट पैसे मोजावे लागत असल्याने खासगी वाहनाने किंवा एसटी महामंडळाच्या गाड्यांनी जाणे येणे करावे लागत आहे. पॅसेंजर गाड्या कधी सुुरु होईल, याकडे लक्ष लागले आहे.प्रणय राऊत, रेल्वे प्रवासी

पॅसेंजर बंद असल्याने प्रवासासाठी अतिरिक्त पैसे मोजावे लागत आहे. विना आरक्षण प्रवास करण्यास प्रतिबंध असल्याने अवघ्या कमी अंतरावर जाण्यासाठीही जास्त पैसे मोजावे लागत आहे. आता तर हॉटेल्स, मॉल्स यांना देखील परवानगी मिळाली आहे. मात्र, पॅसेंजर गाड्या बंद असल्याने हाल होत आहे. रेल्वे विभागाने प्रवाशांच्या होणाऱ्या समस्येची दखल घेण्याची गरज आहे.प्रवीण खांडपासोळे, रेल्वे प्रवासी. 

 

टॅग्स :railwayरेल्वे