शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

पॅसेंजर रेल्वे अद्यापही ‘लॉक’ का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 05:00 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तब्बल आठ ते नऊ महिने रेल्वे वाहतूक ठप्प होती. त्यानंतर शिथिलता मिळाल्याने रेल्वे सेवा सुरू झाली. काही बोटांवर मोजण्याइतपत स्पेशल ट्रेन्स सुरू करण्यात आल्या. मात्र, आता कोरोना नियंत्रणात आला असला तरीदेखील पॅसेंजर रेल्वे सुरू न झाल्यामुळे प्रवाशांना जादा पैसे मोजावे लागत आहेत. त्यामुळे तत्काळ पॅसेंजर रेल्वे सुरू करण्याबाबत रेल्वे विभागाने दखल घ्यावी, अशी मागणी आता प्रवाशांकडून केली जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पॅसेंजर रेल्वे गाड्या बंद करण्यात आल्या. मात्र, आता सर्वत्र निर्बंध शिथिल झाले असून अनलॉक झाले असले तरी पॅसेंजर रेल्वे का बंद आहेत, याबाबतची विचारणा प्रवाशांकडून केली जात असून त्यांच्यात रोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, याबाबत अजून कुठलाही निर्णय रेल्वे विभागाने घेतला नसल्याची माहिती रेल्वे विभागातील अधिकाऱ्यांनी दिली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तब्बल आठ ते नऊ महिने रेल्वे वाहतूक ठप्प होती. त्यानंतर शिथिलता मिळाल्याने रेल्वे सेवा सुरू झाली. काही बोटांवर मोजण्याइतपत स्पेशल ट्रेन्स सुरू करण्यात आल्या. मात्र, आता कोरोना नियंत्रणात आला असला तरीदेखील पॅसेंजर रेल्वे सुरू न झाल्यामुळे प्रवाशांना जादा पैसे मोजावे लागत आहेत. त्यामुळे तत्काळ पॅसेंजर रेल्वे सुरू करण्याबाबत रेल्वे विभागाने दखल घ्यावी, अशी मागणी आता प्रवाशांकडून केली जात आहे. पॅसेंजर गाड्या सुरु न झाल्याने अनेक प्रवाशांमध्ये नाराजी पसरली आहे.

या पॅसेंजर रेल्वे अजूनही बंदच- वर्धा रेल्वे स्थानकावरुन नागपूर- अमरावती पॅसेंजर, अमरावती- नागपूर पॅसेंजर, वर्धा - भुसावळ, तर भुसावळ ते वर्धा अशा पॅसेंजर रेल्वेगाड्या सुरु होत्या. तर सेवाग्राम रेल्वेस्थानकावरुन काजीपेठ ते बल्लारशाह पॅसेंजर रेल्वे गाडी सुरु होती.मात्र, कोरोनामुळे यासर्व रेल्वेगाड्या अजूनही बंदच असल्याने प्रवाशांना आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत आहे.

सुरू असलेल्या स्पेशल ट्रेन्सnसध्या वर्धा रेल्वेस्थानकाहून ३२ रेल्वेगाड्यांची धडधड सुरु आहे. यामध्ये प्रतिदिन धावणाऱ्या गाड्यांमध्ये मुंबई - गांदिया स्पेशल, अहमदाबाद - चेन्नई स्पेशल, मुंबई - हावडा स्पेशल, कोल्हापूर - गाेंदिया स्पेशल, अहमदाबाद - हावडा स्पेशल, पुणे- हावडा स्पेशल, मुंबई - नागपूर स्पेशल या स्पेशल रेल्वे सध्या सुरु असल्याची माहिती रेल्वे विभागाने दिली आहे.

रेल्वेचा प्रवास परवडेना !

कोरोनापूर्वी रेल्वेने नागपूर येथून अपडाऊन करायचो. मात्र, पॅसेंजर रेल्वे बंद झाल्याने मोठे हाल झाले. सध्या केवळ स्पेशल रेल्वेगाड्या धावत असून त्यातही आरक्षणाची अट असल्याने दुप्पट पैसे मोजावे लागत असल्याने खासगी वाहनाने किंवा एसटी महामंडळाच्या गाड्यांनी जाणे येणे करावे लागत आहे. पॅसेंजर गाड्या कधी सुुरु होईल, याकडे लक्ष लागले आहे.प्रणय राऊत, रेल्वे प्रवासी

पॅसेंजर बंद असल्याने प्रवासासाठी अतिरिक्त पैसे मोजावे लागत आहे. विना आरक्षण प्रवास करण्यास प्रतिबंध असल्याने अवघ्या कमी अंतरावर जाण्यासाठीही जास्त पैसे मोजावे लागत आहे. आता तर हॉटेल्स, मॉल्स यांना देखील परवानगी मिळाली आहे. मात्र, पॅसेंजर गाड्या बंद असल्याने हाल होत आहे. रेल्वे विभागाने प्रवाशांच्या होणाऱ्या समस्येची दखल घेण्याची गरज आहे.प्रवीण खांडपासोळे, रेल्वे प्रवासी. 

 

टॅग्स :railwayरेल्वे