शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

पॅसेंजर रेल्वे अद्यापही ‘लॉक’ का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 05:00 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तब्बल आठ ते नऊ महिने रेल्वे वाहतूक ठप्प होती. त्यानंतर शिथिलता मिळाल्याने रेल्वे सेवा सुरू झाली. काही बोटांवर मोजण्याइतपत स्पेशल ट्रेन्स सुरू करण्यात आल्या. मात्र, आता कोरोना नियंत्रणात आला असला तरीदेखील पॅसेंजर रेल्वे सुरू न झाल्यामुळे प्रवाशांना जादा पैसे मोजावे लागत आहेत. त्यामुळे तत्काळ पॅसेंजर रेल्वे सुरू करण्याबाबत रेल्वे विभागाने दखल घ्यावी, अशी मागणी आता प्रवाशांकडून केली जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पॅसेंजर रेल्वे गाड्या बंद करण्यात आल्या. मात्र, आता सर्वत्र निर्बंध शिथिल झाले असून अनलॉक झाले असले तरी पॅसेंजर रेल्वे का बंद आहेत, याबाबतची विचारणा प्रवाशांकडून केली जात असून त्यांच्यात रोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, याबाबत अजून कुठलाही निर्णय रेल्वे विभागाने घेतला नसल्याची माहिती रेल्वे विभागातील अधिकाऱ्यांनी दिली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तब्बल आठ ते नऊ महिने रेल्वे वाहतूक ठप्प होती. त्यानंतर शिथिलता मिळाल्याने रेल्वे सेवा सुरू झाली. काही बोटांवर मोजण्याइतपत स्पेशल ट्रेन्स सुरू करण्यात आल्या. मात्र, आता कोरोना नियंत्रणात आला असला तरीदेखील पॅसेंजर रेल्वे सुरू न झाल्यामुळे प्रवाशांना जादा पैसे मोजावे लागत आहेत. त्यामुळे तत्काळ पॅसेंजर रेल्वे सुरू करण्याबाबत रेल्वे विभागाने दखल घ्यावी, अशी मागणी आता प्रवाशांकडून केली जात आहे. पॅसेंजर गाड्या सुरु न झाल्याने अनेक प्रवाशांमध्ये नाराजी पसरली आहे.

या पॅसेंजर रेल्वे अजूनही बंदच- वर्धा रेल्वे स्थानकावरुन नागपूर- अमरावती पॅसेंजर, अमरावती- नागपूर पॅसेंजर, वर्धा - भुसावळ, तर भुसावळ ते वर्धा अशा पॅसेंजर रेल्वेगाड्या सुरु होत्या. तर सेवाग्राम रेल्वेस्थानकावरुन काजीपेठ ते बल्लारशाह पॅसेंजर रेल्वे गाडी सुरु होती.मात्र, कोरोनामुळे यासर्व रेल्वेगाड्या अजूनही बंदच असल्याने प्रवाशांना आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत आहे.

सुरू असलेल्या स्पेशल ट्रेन्सnसध्या वर्धा रेल्वेस्थानकाहून ३२ रेल्वेगाड्यांची धडधड सुरु आहे. यामध्ये प्रतिदिन धावणाऱ्या गाड्यांमध्ये मुंबई - गांदिया स्पेशल, अहमदाबाद - चेन्नई स्पेशल, मुंबई - हावडा स्पेशल, कोल्हापूर - गाेंदिया स्पेशल, अहमदाबाद - हावडा स्पेशल, पुणे- हावडा स्पेशल, मुंबई - नागपूर स्पेशल या स्पेशल रेल्वे सध्या सुरु असल्याची माहिती रेल्वे विभागाने दिली आहे.

रेल्वेचा प्रवास परवडेना !

कोरोनापूर्वी रेल्वेने नागपूर येथून अपडाऊन करायचो. मात्र, पॅसेंजर रेल्वे बंद झाल्याने मोठे हाल झाले. सध्या केवळ स्पेशल रेल्वेगाड्या धावत असून त्यातही आरक्षणाची अट असल्याने दुप्पट पैसे मोजावे लागत असल्याने खासगी वाहनाने किंवा एसटी महामंडळाच्या गाड्यांनी जाणे येणे करावे लागत आहे. पॅसेंजर गाड्या कधी सुुरु होईल, याकडे लक्ष लागले आहे.प्रणय राऊत, रेल्वे प्रवासी

पॅसेंजर बंद असल्याने प्रवासासाठी अतिरिक्त पैसे मोजावे लागत आहे. विना आरक्षण प्रवास करण्यास प्रतिबंध असल्याने अवघ्या कमी अंतरावर जाण्यासाठीही जास्त पैसे मोजावे लागत आहे. आता तर हॉटेल्स, मॉल्स यांना देखील परवानगी मिळाली आहे. मात्र, पॅसेंजर गाड्या बंद असल्याने हाल होत आहे. रेल्वे विभागाने प्रवाशांच्या होणाऱ्या समस्येची दखल घेण्याची गरज आहे.प्रवीण खांडपासोळे, रेल्वे प्रवासी. 

 

टॅग्स :railwayरेल्वे