शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

नापिकीचे पैसे न मिळाल्यास जबाबदार कोण?

By admin | Updated: May 15, 2015 02:00 IST

तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना सोयाबीन नापिकीची नुकसान भरपाई मिळाली नाही़ या प्रकरणात जबाबदार कोण, ...

कारंजा (घा़) : तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना सोयाबीन नापिकीची नुकसान भरपाई मिळाली नाही़ या प्रकरणात जबाबदार कोण, तहसील कार्यालय की बँक प्रशासन, असा सवाल वंचित शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे़यंदा नापिकीचे पैसे वाटपाचे काम मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार लवकर झाले असले तरी बँकेत ती रक्कम जमा करताना खाते क्रमांकातील चुकांमुळे ते परत गेले़ स्टेट बँकेने प्रथम शेतकऱ्यांचे नाव व सोबत इतर शब्द लावून पाठविलेले अंदाजे तीन लाख रुपये तहसील कार्यालयाकडे परत गेले़ इतर बँकांनी मात्र अशा खातेदारांचे पैसे जमा केले़ स्टेट बँकेचे खाते क्रमांक अकरा आकडी तर बँक आॅफ इंडियाचे १५ आकडी आहेत. या १५ आकड्यांत शेवटचे ३ व ४ आकडे महत्त्वाचे आहे; पण त्यापूर्वी एक शून्य नसल्यास पैसे परत पाठविले जातात. धरती सोनेगाव येथील नत्थू नारायण डोंगरे या शेतकऱ्याचे १० हजार ५०० रुपये ठाणेगाव येथील बँक आॅफ इंडियाने खाते क्रमांक चुकीचा असल्याने परत पाठविले. यानंतर तलाठ्याने सुधारित खाते क्रमांक दिला. येथील बँक आॅफ इंडियाला तहसील कार्यालयाने ३० एप्रिल रोजी पाठविलेल्या धनादेशात शेतकऱ्याची रक्कम आहे; पण बारा दिवस होऊनही ती खात्यात जमा झाली नाही. बँकेच्या व्यवस्थापकांना विचारणा केली असता, बँकेला तहसील कार्यालयाकडून शेतकऱ्यांची यादी मिळाली नसल्याचे सांगण्यात आले़ तहसील कार्यालय मात्र यादीची गरज नसल्याचे सांगत आहे़ जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत शेतकऱ्यांना भरपाई मिळवून देणे गरजेचे झाले आहे़(शहर प्रतिनिधी)