शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

नापिकीचे पैसे न मिळाल्यास जबाबदार कोण?

By admin | Updated: May 15, 2015 02:00 IST

तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना सोयाबीन नापिकीची नुकसान भरपाई मिळाली नाही़ या प्रकरणात जबाबदार कोण, ...

कारंजा (घा़) : तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना सोयाबीन नापिकीची नुकसान भरपाई मिळाली नाही़ या प्रकरणात जबाबदार कोण, तहसील कार्यालय की बँक प्रशासन, असा सवाल वंचित शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे़यंदा नापिकीचे पैसे वाटपाचे काम मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार लवकर झाले असले तरी बँकेत ती रक्कम जमा करताना खाते क्रमांकातील चुकांमुळे ते परत गेले़ स्टेट बँकेने प्रथम शेतकऱ्यांचे नाव व सोबत इतर शब्द लावून पाठविलेले अंदाजे तीन लाख रुपये तहसील कार्यालयाकडे परत गेले़ इतर बँकांनी मात्र अशा खातेदारांचे पैसे जमा केले़ स्टेट बँकेचे खाते क्रमांक अकरा आकडी तर बँक आॅफ इंडियाचे १५ आकडी आहेत. या १५ आकड्यांत शेवटचे ३ व ४ आकडे महत्त्वाचे आहे; पण त्यापूर्वी एक शून्य नसल्यास पैसे परत पाठविले जातात. धरती सोनेगाव येथील नत्थू नारायण डोंगरे या शेतकऱ्याचे १० हजार ५०० रुपये ठाणेगाव येथील बँक आॅफ इंडियाने खाते क्रमांक चुकीचा असल्याने परत पाठविले. यानंतर तलाठ्याने सुधारित खाते क्रमांक दिला. येथील बँक आॅफ इंडियाला तहसील कार्यालयाने ३० एप्रिल रोजी पाठविलेल्या धनादेशात शेतकऱ्याची रक्कम आहे; पण बारा दिवस होऊनही ती खात्यात जमा झाली नाही. बँकेच्या व्यवस्थापकांना विचारणा केली असता, बँकेला तहसील कार्यालयाकडून शेतकऱ्यांची यादी मिळाली नसल्याचे सांगण्यात आले़ तहसील कार्यालय मात्र यादीची गरज नसल्याचे सांगत आहे़ जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत शेतकऱ्यांना भरपाई मिळवून देणे गरजेचे झाले आहे़(शहर प्रतिनिधी)