शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

भाववाढीच्या अपेक्षेनं पांढरं सोनं घरातच ‘लॉक’; दहा हजारांचा भाव मिळण्याची आशा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2021 07:31 IST

आवक मंदावली; दहा हजारांचा भाव मिळण्याची आशा

वर्धा : अतिवृष्टीमुळे या वर्षी सोयाबीनपाठोपाठ कपाशीचे उत्पन्न घटल्याने बाजारपेठेत सध्या कपाशीला समाधानकारक भाव मिळत आहे. सध्या साडेआठ हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे. हा भाव दहा हजार रुपयांचा पल्ला गाठण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांनी कापूसविक्रीला ‘ब्रेक’ लावल्याने बाजारपेठेतील आवकही मंदावली आहे.

बोंडअळी आणि बोंडसडीमुळे कपाशीचे उत्पादनही निम्म्यावरच आले. सध्या एकरी चार ते पाच क्विंटलचा उतारा असून दोनच वेच्यांत कापसाची उलंगवाडी झाली आहे. त्यामुळे लागवडीचा खर्चही भरून निघणार की नाही, अशी भीती शेतकऱ्यांना होती; परंतु  आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही कपाशीला चांगली मागणी असल्याने राज्यातही कपाशीचे भाव सध्या ८ हजार ५०० रुपयांवर पोहोचले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. दिवाळीचा सण आणि रब्बीच्या तयारीकरिता लागणारा खर्च भागविण्यासाठी शेतकऱ्यांनी काही कापूस विकला. आता मात्र शेतकऱ्यांनी भाववाढीच्या प्रतीक्षेत कापूस घरातच साठवून ठेवला आहे. 

रब्बीच्या तयारीला वेग

खरीप हंगामात शेतकऱ्यांना जेमतेम उत्पन्न झाल्याने त्यातून खर्चही भरून निघाला नाही. त्यामुळे दोन वेच्यांत कापसाची उलंगवाडी होताच ट्रॅक्टर फिरवून रब्बीची तयारी सुरू केली आहे. शेतातील मशागतीची कामे अंतिम टप्प्यात आली, तर काही शेतकऱ्यांच्या पेरण्याही आटोपल्या आहेत.