शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

पांढरं सोनं घरातच ! शेतकऱ्यांना दरवाढीची प्रतीक्षा; शेतकऱ्यांची झालीय पुरती आर्थिक कोंडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2025 17:19 IST

Vardha : त्वचेचा आजार; कमी भावात तरी कसा विकणार ?

लोकमत न्यूज नेटवर्क चिकणी (जामणी): अनेक शेतकऱ्यांनी भाववाढीच्या प्रतीक्षेत कापसाची विक्री केली नव्हती. मात्र, आता भाव वाढीची आशा धूसर होत आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी काढला आहे, साठवून ठेवलेल्या कापसामुळे आता अंगाला खाज सुटू लागली आहे, याशिवाय यावरील किड्यांचा त्रासही वाढला आहे, याशिवाय उंदीर, विस्तव, इलेक्ट्रिक आदींचा धोका निर्माण झाला आहे.

केंद्र शासनाने कापसाचे हमी दर जाहीर केले. मात्र, त्यापेक्षाही जास्त खर्च कापसाला आला आहे. सीसीआयकडून मिळणारा दर परवडणारा नसल्याने जिल्ह्यातील निम्म्या अधिक शेतकऱ्यांनी कापूस राखून ठेवला आहे. आतापर्यंत कापसाची जेवढी खरेदी करण्यात आली आहे. अजूनही त्याच्या निम्मा अधिक कापूस शेतकऱ्यांच्या घरात आहे. काही शेतकऱ्यांचा कल सीसीआयकडे वाढला आहे. मात्र, याचवेळी खुल्या बाजारात कापसाचे दर पडले आहेत. ६८०० ते ७००० रुपये क्विंटल दराने कापसाची खरेदी केली जात आहे, तर सीसीआय ७५२१ रुपये क्विंटल दराने कापसाची खरेदी करीत आहे.

दोन रूमचे घर; एक खोली झालीय कापसाने पॅक पूर्वी गावखेड्यात शेतकऱ्यांचे मोठमोठे घरे असायची, पण वाढत्या लोकसंख्येमुळे शेतासह घरांच्याही वाटण्या झाल्या. यामुळे आता घराच्या खोल्याही जेमतेम राहिल्या, दोन रूममधील एक रूम कापसाने पॅक झाली, तर वापर करायचा कसा, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

उंदीर अन् विस्तवापेक्षा विद्युतचा अधिक धोका... अनेक शेतकरी कापसाची साठवणूक करतात. साठविलेल्या कापसाला विविध प्रकारच्या संकटांचा थोका असतो, इलेक्ट्रिकच्या शॉर्ट सर्किटमुळे कापूस जळण्याच्या दरवर्षी घटना घडतात. यामुळे उंदीर अन् विस्तवापेक्षा विद्युतचा धोका अधिक असतो.

जेवणाच्या ताटापर्यंत कापसावरील किडे शेतकऱ्यांचे घर दोन-तीन रूमचे असल्याने व यातील एका रूममध्ये कापूस भरून ठेवावा लागतो. त्यामुळे कीडे जेवणाच्या ताटापर्यंत येतात.

लग्नसराईने चणचण, आता विकावाच लागणार आहे हल्ली लग्नसराई सुरू झाली आहे. मात्र, शेतकऱ्यांचा खिसा रिकामाच आहे. जिल्ह्यातील अनेक शेतकरी दरवर्षी जानेवारी ते मार्च महिन्यात कापसाची विक्री करतात. विक्रीनंतर दर वाढले, तर शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. पण, आता चणचण असल्याने कापूस विकल्या शिवाय दुसरा पर्याय शेतकऱ्याकडे उपलब्ध नाही.

अंगाला खाज; विविध आजार, लहान मुलं हैराण साठवून ठेवलेल्या कापसावर विविध प्रकारच्या किडे तयार होतात, एवढेच नव्हे, तर हवेत तरंगणारे तंतू ही होतात. यामुळे अंगाला खाज सुटून थामे येतात, अंग ठिकठिकाणी लाल होते, याचा लहान मुलांना अधिक त्रास होतो.

संक्रांत उलटली, कापसाने शेतकऱ्यांवर संक्रांत आली शेतकऱ्यांवर वर्षभरही संक्रांतच असते. प्रत्येक उत्पादनावर संक्रांत येतेच. आता संक्रात होऊन दहा दिवसहून अधिक लोटले, पण कापसावरील संक्रांत मात्र कायमच आहेत

७००० यापुढे भाव अद्यापही सरकला नाहीकेंद्र सरकारने कापसाचे हमीभाव ७५२१ रुपये जाहीर केले. मात्र, शेतकऱ्यांकडून व्यापान्यांनी सात हजारांच्या आतच कापसाची खरेदी केली आहे.

"जीव मुठीत धरून कापसाची साठवणूक करावी लागते. अनेक संकटांचा धोका पत्करून दरवाढीच्या प्रतीक्षेत कापूस ठेवावा लागतो. एवढे करूनही दर काही वाढले नाही. नाईलाजाने आता कापसाची विक्री करावीच लागणार आहे." - दिलीप पुनसे, शेतकरी पढेगाव.

"कापसाचे दर वाढतील, या आशेने कापूस ठेवला आहे. पण, दरवाढ होण्याचे चिन्ह दिसत नाही. वर्षाचा आर्थिक व्यवहार चालविण्यासाठी कापूस, तर विकावाच लागणार आहे."- अतुल घोडे, शेतकरी चिकणी.

टॅग्स :cottonकापूसfarmingशेतीFarmerशेतकरी