शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
3
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
4
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
5
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
6
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
7
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
8
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
9
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
10
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
11
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
12
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
13
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
14
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
15
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
16
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
17
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
18
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
19
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना

पांढरं सोनं घरातच ! शेतकऱ्यांना दरवाढीची प्रतीक्षा; शेतकऱ्यांची झालीय पुरती आर्थिक कोंडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2025 17:19 IST

Vardha : त्वचेचा आजार; कमी भावात तरी कसा विकणार ?

लोकमत न्यूज नेटवर्क चिकणी (जामणी): अनेक शेतकऱ्यांनी भाववाढीच्या प्रतीक्षेत कापसाची विक्री केली नव्हती. मात्र, आता भाव वाढीची आशा धूसर होत आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी काढला आहे, साठवून ठेवलेल्या कापसामुळे आता अंगाला खाज सुटू लागली आहे, याशिवाय यावरील किड्यांचा त्रासही वाढला आहे, याशिवाय उंदीर, विस्तव, इलेक्ट्रिक आदींचा धोका निर्माण झाला आहे.

केंद्र शासनाने कापसाचे हमी दर जाहीर केले. मात्र, त्यापेक्षाही जास्त खर्च कापसाला आला आहे. सीसीआयकडून मिळणारा दर परवडणारा नसल्याने जिल्ह्यातील निम्म्या अधिक शेतकऱ्यांनी कापूस राखून ठेवला आहे. आतापर्यंत कापसाची जेवढी खरेदी करण्यात आली आहे. अजूनही त्याच्या निम्मा अधिक कापूस शेतकऱ्यांच्या घरात आहे. काही शेतकऱ्यांचा कल सीसीआयकडे वाढला आहे. मात्र, याचवेळी खुल्या बाजारात कापसाचे दर पडले आहेत. ६८०० ते ७००० रुपये क्विंटल दराने कापसाची खरेदी केली जात आहे, तर सीसीआय ७५२१ रुपये क्विंटल दराने कापसाची खरेदी करीत आहे.

दोन रूमचे घर; एक खोली झालीय कापसाने पॅक पूर्वी गावखेड्यात शेतकऱ्यांचे मोठमोठे घरे असायची, पण वाढत्या लोकसंख्येमुळे शेतासह घरांच्याही वाटण्या झाल्या. यामुळे आता घराच्या खोल्याही जेमतेम राहिल्या, दोन रूममधील एक रूम कापसाने पॅक झाली, तर वापर करायचा कसा, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

उंदीर अन् विस्तवापेक्षा विद्युतचा अधिक धोका... अनेक शेतकरी कापसाची साठवणूक करतात. साठविलेल्या कापसाला विविध प्रकारच्या संकटांचा थोका असतो, इलेक्ट्रिकच्या शॉर्ट सर्किटमुळे कापूस जळण्याच्या दरवर्षी घटना घडतात. यामुळे उंदीर अन् विस्तवापेक्षा विद्युतचा धोका अधिक असतो.

जेवणाच्या ताटापर्यंत कापसावरील किडे शेतकऱ्यांचे घर दोन-तीन रूमचे असल्याने व यातील एका रूममध्ये कापूस भरून ठेवावा लागतो. त्यामुळे कीडे जेवणाच्या ताटापर्यंत येतात.

लग्नसराईने चणचण, आता विकावाच लागणार आहे हल्ली लग्नसराई सुरू झाली आहे. मात्र, शेतकऱ्यांचा खिसा रिकामाच आहे. जिल्ह्यातील अनेक शेतकरी दरवर्षी जानेवारी ते मार्च महिन्यात कापसाची विक्री करतात. विक्रीनंतर दर वाढले, तर शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. पण, आता चणचण असल्याने कापूस विकल्या शिवाय दुसरा पर्याय शेतकऱ्याकडे उपलब्ध नाही.

अंगाला खाज; विविध आजार, लहान मुलं हैराण साठवून ठेवलेल्या कापसावर विविध प्रकारच्या किडे तयार होतात, एवढेच नव्हे, तर हवेत तरंगणारे तंतू ही होतात. यामुळे अंगाला खाज सुटून थामे येतात, अंग ठिकठिकाणी लाल होते, याचा लहान मुलांना अधिक त्रास होतो.

संक्रांत उलटली, कापसाने शेतकऱ्यांवर संक्रांत आली शेतकऱ्यांवर वर्षभरही संक्रांतच असते. प्रत्येक उत्पादनावर संक्रांत येतेच. आता संक्रात होऊन दहा दिवसहून अधिक लोटले, पण कापसावरील संक्रांत मात्र कायमच आहेत

७००० यापुढे भाव अद्यापही सरकला नाहीकेंद्र सरकारने कापसाचे हमीभाव ७५२१ रुपये जाहीर केले. मात्र, शेतकऱ्यांकडून व्यापान्यांनी सात हजारांच्या आतच कापसाची खरेदी केली आहे.

"जीव मुठीत धरून कापसाची साठवणूक करावी लागते. अनेक संकटांचा धोका पत्करून दरवाढीच्या प्रतीक्षेत कापूस ठेवावा लागतो. एवढे करूनही दर काही वाढले नाही. नाईलाजाने आता कापसाची विक्री करावीच लागणार आहे." - दिलीप पुनसे, शेतकरी पढेगाव.

"कापसाचे दर वाढतील, या आशेने कापूस ठेवला आहे. पण, दरवाढ होण्याचे चिन्ह दिसत नाही. वर्षाचा आर्थिक व्यवहार चालविण्यासाठी कापूस, तर विकावाच लागणार आहे."- अतुल घोडे, शेतकरी चिकणी.

टॅग्स :cottonकापूसfarmingशेतीFarmerशेतकरी