शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

कुठे गार, कुठे कोसळधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2020 06:00 IST

नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येसह पहिला व दुसऱ्या दिवशीही अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे वातावरण चांगलेच गारठले आहे. बुधवारी दुपारच्या सुमारास आणि रात्रीच्या सुमारासही जिल्ह्यातील काही भागामध्ये अवकाळी पावसाच्या चांगल्याच सरी बरसल्या. त्यात आर्वी आणि कारंजा तालुक्यात चांगलीच गारपीट झाल्याने शेतशिवारात पांढरे झाले होते.

ठळक मुद्देआर्वी, कारंजा तालुक्याला गारपिटीचा तडाखा : संत्रा, केळीच्या बागा उद्ध्वस्त

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मागील वर्षीच्या निसर्गकोपातून शेतकरी सावरला नसतानाच नवीन वर्षही शेतकऱ्यांसाठी संकट घेऊनच आले आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवसापासून जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली. यातच गारपिटीनेही झोडपून काढल्याने आर्वी व कारंजा तालुक्यातील केळी, संत्राच्या बागा उद्धवस्त झाल्या असून कापूस, चना, तूर व गव्हाच्या पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे.नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येसह पहिला व दुसऱ्या दिवशीही अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे वातावरण चांगलेच गारठले आहे. बुधवारी दुपारच्या सुमारास आणि रात्रीच्या सुमारासही जिल्ह्यातील काही भागामध्ये अवकाळी पावसाच्या चांगल्याच सरी बरसल्या. त्यात आर्वी आणि कारंजा तालुक्यात चांगलीच गारपीट झाल्याने शेतशिवारात पांढरे झाले होते. गुरुवारी सकाळपासूनच जिल्ह्यातील वर्धा, सेलू, हिंगणघाट, देवळी, समुद्रपूर, हिंगणघाट, आर्वी, आष्टी व कारंजा या आठही तालुक्यात पावसाचा कमी अधिक जोर कायमच होता. या अवकाळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून नागरिकांना उबदार कपड्यांसह पावसापासून बचाव करणारे कपडे एकसाथ घालूनच घराबाहेर पडावे लागले. इतका गारठा वातावरणात तयार झाल्याने याचा परिणाम शेती पीक, पशुपक्षी व नागरिकांच्या आरोग्यावरही होताना दिसून येत आहे.आर्वी तालुक्यात २० मिनिटे गारांचा माराआर्वी : गुरुवारी पहाटे आर्वी तालुक्यामध्ये तब्बल वीस मिनिटे अवकाळी पावसासह गारपिटीने हजेरी लावली. यामुळे तालुक्यातील देऊरवाडा, नांदपूर, अहिरवाडा, सर्कसपूर, टोणा, दहेगाव, शिरपूर, लाडेगाव, जळगाव, वर्धमनेरी, टाकरखेडा, सावळापूर, मांडला, गुमगाव, पिंपळखुटा, पाचेगाव, नांदोरा, रोहणा, वडगाव, वाढोणा, वागदा, निंबोली, पिपरी, खुबगांव, शिरपूर, बेलोरा, खडकी, परतोडा, नादंपूर, एकलारा, राजापूर, इठलापूर, खडका, सावलापूर, पाचोड, चिंचोली, हिवरा, हर्राशी, निंबोली व वाठोडा यासह ४० गावातील ३० हेक्टरमधील कापूस, हरभरा, तूर, गहू, हळद व केळी या पिकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. काही भागात लिंबाच्या आकाराची गार पडल्याने घरावरील टिनांनाही खड्डे पडले आहे तर वादळामुळे काहींचे छतही उडाले आहे. नांदपूर येथील केळी उत्पादक शेतकरी बाळा जगताप यांच्या २४ एकर शेतातील ४० हजार केळीच्या झाडांपैकी २० हजारांपेक्षा झाडे जमिनदोस्त झाल्याने जवळपास २५ लाख रुपयांच्या नुकसानीचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. एकंदरीत अवकाळी पाऊस आणि गारपिटीने शेतकऱ्यांना संकटाच्या खाईत लोटले.कारंजात संत्रा उत्पादकांचे मोठे नुकसानकारंजा (घा.)- तालुक्यात मागील तीन दिवसांपासून अवकाळी पावसांच्या सरी कोसळत आहेत. बुधवारी रात्री जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यासोबतच गुरुवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास बोराच्या आकाराची गार पडल्याने तालुक्यातील संत्रा उत्पादकांला मोठा फटका बसला आहे. यासोबतच कापुसही भिजला असून शेतकऱ्यांच्या संकटात आणखीच भर पडली आहे. तालुक्यातील कारंजा, ठाणेगाव, कन्नमवारग्राम, बांगडापूर, रहाटी, काजळी, सेलगाव (ल), परसोडी, बोंदरठाणा या परिसरात गारपीट झाले. या अवकाळी पावसात जनावरांसाठी शेतात राखून ठेवलेला जनावरांचा चाराही ओला झाला आहे. यावर्षी कापूस उत्पादकांचे हाल झाल्याने संत्रा उत्पादकांनी मेहनत घेऊन बागा फुलविल्या. संत्रा बागा बहरल्या असतानाच गारपीटाने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिसकावला आहे. शेतकऱ्यांनी चना व गव्हाला नुकताच ओलीत केले होते आता या अवकाळी पावसाच्या तडाख्याने हे दोन्ही पिके जळण्याची भिती निर्माण झाली असून तुरीचे पिकही हातचे जाण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Rainपाऊस