शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

कुठे गार, कुठे कोसळधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2020 06:00 IST

नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येसह पहिला व दुसऱ्या दिवशीही अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे वातावरण चांगलेच गारठले आहे. बुधवारी दुपारच्या सुमारास आणि रात्रीच्या सुमारासही जिल्ह्यातील काही भागामध्ये अवकाळी पावसाच्या चांगल्याच सरी बरसल्या. त्यात आर्वी आणि कारंजा तालुक्यात चांगलीच गारपीट झाल्याने शेतशिवारात पांढरे झाले होते.

ठळक मुद्देआर्वी, कारंजा तालुक्याला गारपिटीचा तडाखा : संत्रा, केळीच्या बागा उद्ध्वस्त

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मागील वर्षीच्या निसर्गकोपातून शेतकरी सावरला नसतानाच नवीन वर्षही शेतकऱ्यांसाठी संकट घेऊनच आले आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवसापासून जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली. यातच गारपिटीनेही झोडपून काढल्याने आर्वी व कारंजा तालुक्यातील केळी, संत्राच्या बागा उद्धवस्त झाल्या असून कापूस, चना, तूर व गव्हाच्या पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे.नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येसह पहिला व दुसऱ्या दिवशीही अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे वातावरण चांगलेच गारठले आहे. बुधवारी दुपारच्या सुमारास आणि रात्रीच्या सुमारासही जिल्ह्यातील काही भागामध्ये अवकाळी पावसाच्या चांगल्याच सरी बरसल्या. त्यात आर्वी आणि कारंजा तालुक्यात चांगलीच गारपीट झाल्याने शेतशिवारात पांढरे झाले होते. गुरुवारी सकाळपासूनच जिल्ह्यातील वर्धा, सेलू, हिंगणघाट, देवळी, समुद्रपूर, हिंगणघाट, आर्वी, आष्टी व कारंजा या आठही तालुक्यात पावसाचा कमी अधिक जोर कायमच होता. या अवकाळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून नागरिकांना उबदार कपड्यांसह पावसापासून बचाव करणारे कपडे एकसाथ घालूनच घराबाहेर पडावे लागले. इतका गारठा वातावरणात तयार झाल्याने याचा परिणाम शेती पीक, पशुपक्षी व नागरिकांच्या आरोग्यावरही होताना दिसून येत आहे.आर्वी तालुक्यात २० मिनिटे गारांचा माराआर्वी : गुरुवारी पहाटे आर्वी तालुक्यामध्ये तब्बल वीस मिनिटे अवकाळी पावसासह गारपिटीने हजेरी लावली. यामुळे तालुक्यातील देऊरवाडा, नांदपूर, अहिरवाडा, सर्कसपूर, टोणा, दहेगाव, शिरपूर, लाडेगाव, जळगाव, वर्धमनेरी, टाकरखेडा, सावळापूर, मांडला, गुमगाव, पिंपळखुटा, पाचेगाव, नांदोरा, रोहणा, वडगाव, वाढोणा, वागदा, निंबोली, पिपरी, खुबगांव, शिरपूर, बेलोरा, खडकी, परतोडा, नादंपूर, एकलारा, राजापूर, इठलापूर, खडका, सावलापूर, पाचोड, चिंचोली, हिवरा, हर्राशी, निंबोली व वाठोडा यासह ४० गावातील ३० हेक्टरमधील कापूस, हरभरा, तूर, गहू, हळद व केळी या पिकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. काही भागात लिंबाच्या आकाराची गार पडल्याने घरावरील टिनांनाही खड्डे पडले आहे तर वादळामुळे काहींचे छतही उडाले आहे. नांदपूर येथील केळी उत्पादक शेतकरी बाळा जगताप यांच्या २४ एकर शेतातील ४० हजार केळीच्या झाडांपैकी २० हजारांपेक्षा झाडे जमिनदोस्त झाल्याने जवळपास २५ लाख रुपयांच्या नुकसानीचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. एकंदरीत अवकाळी पाऊस आणि गारपिटीने शेतकऱ्यांना संकटाच्या खाईत लोटले.कारंजात संत्रा उत्पादकांचे मोठे नुकसानकारंजा (घा.)- तालुक्यात मागील तीन दिवसांपासून अवकाळी पावसांच्या सरी कोसळत आहेत. बुधवारी रात्री जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यासोबतच गुरुवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास बोराच्या आकाराची गार पडल्याने तालुक्यातील संत्रा उत्पादकांला मोठा फटका बसला आहे. यासोबतच कापुसही भिजला असून शेतकऱ्यांच्या संकटात आणखीच भर पडली आहे. तालुक्यातील कारंजा, ठाणेगाव, कन्नमवारग्राम, बांगडापूर, रहाटी, काजळी, सेलगाव (ल), परसोडी, बोंदरठाणा या परिसरात गारपीट झाले. या अवकाळी पावसात जनावरांसाठी शेतात राखून ठेवलेला जनावरांचा चाराही ओला झाला आहे. यावर्षी कापूस उत्पादकांचे हाल झाल्याने संत्रा उत्पादकांनी मेहनत घेऊन बागा फुलविल्या. संत्रा बागा बहरल्या असतानाच गारपीटाने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिसकावला आहे. शेतकऱ्यांनी चना व गव्हाला नुकताच ओलीत केले होते आता या अवकाळी पावसाच्या तडाख्याने हे दोन्ही पिके जळण्याची भिती निर्माण झाली असून तुरीचे पिकही हातचे जाण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Rainपाऊस