शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
2
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
3
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
4
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
5
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
6
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
7
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
8
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
9
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
10
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक
11
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सायबर हल्ल्यांचा आकडा १५ लाखांवर; फक्त १५० यशस्वी, सायबर विभागाचा तपास
12
दहावीचा निकाल आज... मित्रांनो, मनासारखे नाही झाले, तरी हार मानू नका 
13
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा; पिकांनी टाकल्या माना, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
14
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील जखमी म्हणतात, आजही तेथून जाताना हृदयात चर्रर्र होतं
15
नवीन होर्डिंग धोरण वर्षभरानंतरही कागदावरच! घाटकोपर दुर्घटनेला वर्ष होऊनही महापालिका गप्पच
16
शाहरुख खानच्या ‘त्या’ कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला ६२ लाखांची भरपाई योग्यच; हायकोर्टाचे आदेश
17
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
18
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
19
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
20
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती

गरिबांनी शिकायचे कोठे? शासन पैसा सोडेना, शाळांत मोफत प्रवेश मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2022 05:00 IST

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यानुसार वंचित व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना खासगी संस्थांच्या शाळांमध्ये २५ टक्के मोफत आरटीईअंतर्गत प्रवेश देणे बंधनकारक आहे. मात्र, गेल्या चार वर्षांपासून शासनाकडून आरटीई अंतर्गत थकीत फी परतावा शाळांना मिळाला नाही. त्यामुळे  संस्थाचालकांत रोष आहे.   

लोकमत न्यूज नेटवर्कदेऊरवाडा/आर्वी : शासनाने विद्यार्थ्यांना २५ टक्के मोफत प्रवेश देणे बंधनकारक आहे. मात्र, अशा शाळांना  शासनाकडून फी परतावा न मिळाल्याने शाळांनी आता प्रवेश देणे बंद केल्याचे चित्र आहे.  बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यानुसार वंचित व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना खासगी संस्थांच्या शाळांमध्ये २५ टक्के मोफत आरटीईअंतर्गत प्रवेश देणे बंधनकारक आहे. मात्र, गेल्या चार वर्षांपासून शासनाकडून आरटीई अंतर्गत थकीत फी परतावा शाळांना मिळाला नाही. त्यामुळे  संस्थाचालकांत रोष आहे.   

 १३५ खासगी शाळेत २५ टक्के मोफत प्रवेश

- अंदाजे १३५ खासगी शाळेत आरटीई कायद्यानुसार मोफत प्रवेश  २५ टक्के दिला जात आहे. एक ते आठच्या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण दिले जाते. अंदाजे दहा हजार विद्यार्थी या कायद्यानुसार शिक्षण घेत आहेत.

₹ २०,००,००,००० चा थकीत निधी कधी मिळणार

- शाळांना २०१७-१८ पासून २५ टक्के विद्यार्थी प्रवेशाचा फी परतावा अद्यापही शासनाने केला नाही. त्यामुळे  शाळा अडचणीत आल्या आहेत. २० ते २५ कोटींची रक्कम थकीत आहे. 

दोन वर्षापासून अनेकदा झाली आंदोलनnज्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश देण्यात आला. त्या शाळांना शासनाकडून रक्कम मिळाली नाही. ती मिळविण्यासाठी अनेकदा संस्थाचालकांनी आंदोलनाचा मार्ग स्विकारला परंतू अजूनही रक्कम मिळालेली नाही.

किती तोटा सहन करायचा?

२०१७ ते २०२१ पासून शाळांना आरटीई प्रवेशाची रक्कम दिलेली नाही. शासन फक्त ट्यूशन फी देते. मात्र  तीही चार वर्षांपासून मिळाली नाही. आणखी किती तोटा सहन करावा, समजायला मार्ग नाही.-नितीन वडणारे, संस्था सचिव.

अद्याप शासनाने ट्यूशन फीचे पैसे शाळांना दिले नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली. शासनाच्या आदेशान्वये आम्ही २५ टक्के मोफत प्रवेश विद्यार्थ्यांना दिले. आताही प्रवेश रजिस्टर केले असून पालक ऑनलाईन फॉर्म भरत आहेत. हे चौथे शैक्षणिक वर्ष लागले असूनही पैसे दिले नाहीत. -प्रशांत कांडलकर, संस्थाध्यक्ष.

शाळा फक्त श्रीमंतांसाठीच असतात का?

आरटीई अंतर्गत विद्यार्थ्यांच्या मोफत प्रवेशाचे अनुदान चार वर्षांपासून थकीत आहे. शाळांना फी परताव्याचे अनुदान वेळेत न दिल्याने विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा देणे जिकिरीचे होऊन शिक्षण संस्था बंद पडतील.   - अशोकराव कावरे, पालक.

श्रीमंतांची मुले या शाळेत शिकतात. ते फी भरून मोकळे होतात. पण गरिबांनी ती कुठून भरावी. २५ टक्क्यांतील विद्यार्थी म्हणून मुलीला  प्रवेश मिळाला आहे. पण, पैसे शासनाने शाळांना दिले नाही. यात विद्यार्थी व पालक दोषी कसे?  - प्रवीण शेगोकार, पालक.

 

टॅग्स :Educationशिक्षण