शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
3
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
4
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
5
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
6
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
7
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
8
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
9
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
10
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
11
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
12
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
13
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
14
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
15
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
16
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
17
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
18
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
19
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
20
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
Daily Top 2Weekly Top 5

गरिबांनी शिकायचे कोठे? शासन पैसा सोडेना, शाळांत मोफत प्रवेश मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2022 05:00 IST

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यानुसार वंचित व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना खासगी संस्थांच्या शाळांमध्ये २५ टक्के मोफत आरटीईअंतर्गत प्रवेश देणे बंधनकारक आहे. मात्र, गेल्या चार वर्षांपासून शासनाकडून आरटीई अंतर्गत थकीत फी परतावा शाळांना मिळाला नाही. त्यामुळे  संस्थाचालकांत रोष आहे.   

लोकमत न्यूज नेटवर्कदेऊरवाडा/आर्वी : शासनाने विद्यार्थ्यांना २५ टक्के मोफत प्रवेश देणे बंधनकारक आहे. मात्र, अशा शाळांना  शासनाकडून फी परतावा न मिळाल्याने शाळांनी आता प्रवेश देणे बंद केल्याचे चित्र आहे.  बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यानुसार वंचित व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना खासगी संस्थांच्या शाळांमध्ये २५ टक्के मोफत आरटीईअंतर्गत प्रवेश देणे बंधनकारक आहे. मात्र, गेल्या चार वर्षांपासून शासनाकडून आरटीई अंतर्गत थकीत फी परतावा शाळांना मिळाला नाही. त्यामुळे  संस्थाचालकांत रोष आहे.   

 १३५ खासगी शाळेत २५ टक्के मोफत प्रवेश

- अंदाजे १३५ खासगी शाळेत आरटीई कायद्यानुसार मोफत प्रवेश  २५ टक्के दिला जात आहे. एक ते आठच्या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण दिले जाते. अंदाजे दहा हजार विद्यार्थी या कायद्यानुसार शिक्षण घेत आहेत.

₹ २०,००,००,००० चा थकीत निधी कधी मिळणार

- शाळांना २०१७-१८ पासून २५ टक्के विद्यार्थी प्रवेशाचा फी परतावा अद्यापही शासनाने केला नाही. त्यामुळे  शाळा अडचणीत आल्या आहेत. २० ते २५ कोटींची रक्कम थकीत आहे. 

दोन वर्षापासून अनेकदा झाली आंदोलनnज्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश देण्यात आला. त्या शाळांना शासनाकडून रक्कम मिळाली नाही. ती मिळविण्यासाठी अनेकदा संस्थाचालकांनी आंदोलनाचा मार्ग स्विकारला परंतू अजूनही रक्कम मिळालेली नाही.

किती तोटा सहन करायचा?

२०१७ ते २०२१ पासून शाळांना आरटीई प्रवेशाची रक्कम दिलेली नाही. शासन फक्त ट्यूशन फी देते. मात्र  तीही चार वर्षांपासून मिळाली नाही. आणखी किती तोटा सहन करावा, समजायला मार्ग नाही.-नितीन वडणारे, संस्था सचिव.

अद्याप शासनाने ट्यूशन फीचे पैसे शाळांना दिले नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली. शासनाच्या आदेशान्वये आम्ही २५ टक्के मोफत प्रवेश विद्यार्थ्यांना दिले. आताही प्रवेश रजिस्टर केले असून पालक ऑनलाईन फॉर्म भरत आहेत. हे चौथे शैक्षणिक वर्ष लागले असूनही पैसे दिले नाहीत. -प्रशांत कांडलकर, संस्थाध्यक्ष.

शाळा फक्त श्रीमंतांसाठीच असतात का?

आरटीई अंतर्गत विद्यार्थ्यांच्या मोफत प्रवेशाचे अनुदान चार वर्षांपासून थकीत आहे. शाळांना फी परताव्याचे अनुदान वेळेत न दिल्याने विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा देणे जिकिरीचे होऊन शिक्षण संस्था बंद पडतील.   - अशोकराव कावरे, पालक.

श्रीमंतांची मुले या शाळेत शिकतात. ते फी भरून मोकळे होतात. पण गरिबांनी ती कुठून भरावी. २५ टक्क्यांतील विद्यार्थी म्हणून मुलीला  प्रवेश मिळाला आहे. पण, पैसे शासनाने शाळांना दिले नाही. यात विद्यार्थी व पालक दोषी कसे?  - प्रवीण शेगोकार, पालक.

 

टॅग्स :Educationशिक्षण