शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

घराघरांत नळ' केव्हा? ; जल जीवनची निम्मी कामे अपूर्णच

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2025 16:36 IST

Wardha : कंत्राटदारांची मनमर्जी, विभागाचे दुर्लक्ष

आनंद इंगोले लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : केंद्र शासनाच्या जल जीवन मिशन अंतर्गत 'हर घर नल से जल' या संकल्पनेतून ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला दररोज प्रतिव्यक्ती ५५ लीटर शुद्ध पाणी देण्याची योजना हाती घेण्यात आली आहे. जिल्ह्यात जिल्हा परिषदच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागांतर्गत ही योजना राबविली जात आहे. दोन ते अडीच वर्षानंतरही निम्मे कामे अपूर्ण असल्याने घरात नळ आहे पण पाणी नाही, अशी अवस्था दिसून येत आहे.

ग्रामीण भागातील नागरिकांना पुरसे व शुद्ध पाणी मिळावे, याकरिता जिल्ह्यातील आठही तालुक्यांत जल जीवन मिशन अंतर्गत सन २०२१-२२ मध्ये सर्व्हेक्षण करण्यात आले. त्यानंतर जिल्ह्यात ८२९ कामे मंजूर करण्यात आली. या कामांचा कंत्राट देताना कोणतीही स्पर्धा न करता मूळ किंमतीलाच कंत्राट दिला. सन २०२३-२४ पासून कामाला सुरुवात करण्यात आली. आता दोन ते अडीच वर्षांचा कालावधी लोटला तरीही निम्मी कामे अपूर्ण आहे. त्यामुळे आता अडीच महिन्यात ही कामे पूर्ण होणार का? असा प्रश्न असून या योजनेनंतरही गावकऱ्यांना उन्हाळ्यात टंचाईचा सामना करावा लागणार आहे. 

४१० कामे फिजिकली पूर्ण जिल्ह्यात सन २०२२-२३ पासून एकूण ८२९ कामांना सुरुवात करण्यात आली. तेव्हापासून तर जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत केवळ ४१० कामेच फिजिकली पूर्ण झाली आहे. उर्वरित कामे अपूर्णच असल्याने नागरिकांना अद्यापही शुद्ध व पुरेसे पाणी मिळत नाही. त्यामुळे घराघरांत नळ असून त्याला पाणी कधी येईल, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

कामातील तक्रारींचा खचया योजनेत कंत्राटदारांची मनमर्जी आणि संबंधित विभागाकडून होत असलेली पाठराखणच या योजनेच्या दिरंगाईत कारणीभूत ठरत आहे. झालेल्या कामांत अनेक तक्रारी असून खच पडला आहे.

तालुकानिहाय जलजीवनच्या कामांची माहितीतालुका                एकूण कामे             पूर्ण कामे आर्वी                         १३१                         ९८ आष्टी                         ७३                          ५६ देवळी                        ९६                          २७ हिंगणघाट                  ११४                          ३९ कारंजा                       ७४                          ४४ समुद्रपूर                     १५६                         ४८ सेलू                           १११                          ६२ वर्धा                            ८४                          ३६

 

टॅग्स :wardha-acवर्धाwater scarcityपाणी टंचाई