शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

घराघरांत नळ' केव्हा? ; जल जीवनची निम्मी कामे अपूर्णच

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2025 16:36 IST

Wardha : कंत्राटदारांची मनमर्जी, विभागाचे दुर्लक्ष

आनंद इंगोले लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : केंद्र शासनाच्या जल जीवन मिशन अंतर्गत 'हर घर नल से जल' या संकल्पनेतून ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला दररोज प्रतिव्यक्ती ५५ लीटर शुद्ध पाणी देण्याची योजना हाती घेण्यात आली आहे. जिल्ह्यात जिल्हा परिषदच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागांतर्गत ही योजना राबविली जात आहे. दोन ते अडीच वर्षानंतरही निम्मे कामे अपूर्ण असल्याने घरात नळ आहे पण पाणी नाही, अशी अवस्था दिसून येत आहे.

ग्रामीण भागातील नागरिकांना पुरसे व शुद्ध पाणी मिळावे, याकरिता जिल्ह्यातील आठही तालुक्यांत जल जीवन मिशन अंतर्गत सन २०२१-२२ मध्ये सर्व्हेक्षण करण्यात आले. त्यानंतर जिल्ह्यात ८२९ कामे मंजूर करण्यात आली. या कामांचा कंत्राट देताना कोणतीही स्पर्धा न करता मूळ किंमतीलाच कंत्राट दिला. सन २०२३-२४ पासून कामाला सुरुवात करण्यात आली. आता दोन ते अडीच वर्षांचा कालावधी लोटला तरीही निम्मी कामे अपूर्ण आहे. त्यामुळे आता अडीच महिन्यात ही कामे पूर्ण होणार का? असा प्रश्न असून या योजनेनंतरही गावकऱ्यांना उन्हाळ्यात टंचाईचा सामना करावा लागणार आहे. 

४१० कामे फिजिकली पूर्ण जिल्ह्यात सन २०२२-२३ पासून एकूण ८२९ कामांना सुरुवात करण्यात आली. तेव्हापासून तर जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत केवळ ४१० कामेच फिजिकली पूर्ण झाली आहे. उर्वरित कामे अपूर्णच असल्याने नागरिकांना अद्यापही शुद्ध व पुरेसे पाणी मिळत नाही. त्यामुळे घराघरांत नळ असून त्याला पाणी कधी येईल, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

कामातील तक्रारींचा खचया योजनेत कंत्राटदारांची मनमर्जी आणि संबंधित विभागाकडून होत असलेली पाठराखणच या योजनेच्या दिरंगाईत कारणीभूत ठरत आहे. झालेल्या कामांत अनेक तक्रारी असून खच पडला आहे.

तालुकानिहाय जलजीवनच्या कामांची माहितीतालुका                एकूण कामे             पूर्ण कामे आर्वी                         १३१                         ९८ आष्टी                         ७३                          ५६ देवळी                        ९६                          २७ हिंगणघाट                  ११४                          ३९ कारंजा                       ७४                          ४४ समुद्रपूर                     १५६                         ४८ सेलू                           १११                          ६२ वर्धा                            ८४                          ३६

 

टॅग्स :wardha-acवर्धाwater scarcityपाणी टंचाई