शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

घराघरांत नळ' केव्हा? ; जल जीवनची निम्मी कामे अपूर्णच

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2025 16:36 IST

Wardha : कंत्राटदारांची मनमर्जी, विभागाचे दुर्लक्ष

आनंद इंगोले लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : केंद्र शासनाच्या जल जीवन मिशन अंतर्गत 'हर घर नल से जल' या संकल्पनेतून ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला दररोज प्रतिव्यक्ती ५५ लीटर शुद्ध पाणी देण्याची योजना हाती घेण्यात आली आहे. जिल्ह्यात जिल्हा परिषदच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागांतर्गत ही योजना राबविली जात आहे. दोन ते अडीच वर्षानंतरही निम्मे कामे अपूर्ण असल्याने घरात नळ आहे पण पाणी नाही, अशी अवस्था दिसून येत आहे.

ग्रामीण भागातील नागरिकांना पुरसे व शुद्ध पाणी मिळावे, याकरिता जिल्ह्यातील आठही तालुक्यांत जल जीवन मिशन अंतर्गत सन २०२१-२२ मध्ये सर्व्हेक्षण करण्यात आले. त्यानंतर जिल्ह्यात ८२९ कामे मंजूर करण्यात आली. या कामांचा कंत्राट देताना कोणतीही स्पर्धा न करता मूळ किंमतीलाच कंत्राट दिला. सन २०२३-२४ पासून कामाला सुरुवात करण्यात आली. आता दोन ते अडीच वर्षांचा कालावधी लोटला तरीही निम्मी कामे अपूर्ण आहे. त्यामुळे आता अडीच महिन्यात ही कामे पूर्ण होणार का? असा प्रश्न असून या योजनेनंतरही गावकऱ्यांना उन्हाळ्यात टंचाईचा सामना करावा लागणार आहे. 

४१० कामे फिजिकली पूर्ण जिल्ह्यात सन २०२२-२३ पासून एकूण ८२९ कामांना सुरुवात करण्यात आली. तेव्हापासून तर जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत केवळ ४१० कामेच फिजिकली पूर्ण झाली आहे. उर्वरित कामे अपूर्णच असल्याने नागरिकांना अद्यापही शुद्ध व पुरेसे पाणी मिळत नाही. त्यामुळे घराघरांत नळ असून त्याला पाणी कधी येईल, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

कामातील तक्रारींचा खचया योजनेत कंत्राटदारांची मनमर्जी आणि संबंधित विभागाकडून होत असलेली पाठराखणच या योजनेच्या दिरंगाईत कारणीभूत ठरत आहे. झालेल्या कामांत अनेक तक्रारी असून खच पडला आहे.

तालुकानिहाय जलजीवनच्या कामांची माहितीतालुका                एकूण कामे             पूर्ण कामे आर्वी                         १३१                         ९८ आष्टी                         ७३                          ५६ देवळी                        ९६                          २७ हिंगणघाट                  ११४                          ३९ कारंजा                       ७४                          ४४ समुद्रपूर                     १५६                         ४८ सेलू                           १११                          ६२ वर्धा                            ८४                          ३६

 

टॅग्स :wardha-acवर्धाwater scarcityपाणी टंचाई