शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
4
'त्या प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
5
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
6
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
7
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
8
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
9
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
10
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
11
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
12
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
13
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
14
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
15
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
16
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
17
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
18
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
19
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
20
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

भावांतर योजनेतील अनुदान कधी मिळणार? तांत्रिक अडचणींमुळे पैसे गेलेय परत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2025 18:05 IST

शेतकऱ्यांचा प्रश्न : अनेक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अद्यापही मदत जमा न झाल्याने शेतकरी प्रतीक्षेत

लोकमत न्यूज नेटवर्करोहणा : खरीप हंगामामध्ये कापूस व सोयाबीन उत्पादकांना बाजारभाव नसल्याने आर्थिक नुकसान सहन करावे लागले. त्यामुळे ते नुकसान काही प्रमाणात भरून काढण्यासाठी शासनाने सन २०२३-२४ मध्ये भावांतर योजना राबविली. या योजनेनुसार शेतकऱ्यांना प्रतिहेक्टर पाच हजार रुपये देऊन कमाल मर्यादा तीन हेक्टरनुसार आर्थिक मदत दिली. पण, काही शेतकऱ्यांचे बँक खाते आधार लिंक नव्हते व काहींचे आधार अपडेट व ई-केवायसी नसल्याने रक्कम खात्यात जमा झाली नाही. ती रक्कम शासनाकडे परत गेल्याने अद्यापही शेतकऱ्यांना मिळाली नाही. त्यासाठी शेतकरी शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजवत असून, अधिकारीही हात वर करीत आहे. त्यामुळे भावांतर योजनेचे पैसे मिळणार कधी, असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत. 

शासनाने भावांतर योजनेंतर्गत सप्टेंबर २०२४ मध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम वळती केली. परंतु, बहुतांश शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तांत्रिक अडचणींमुळे रक्कम जमा होऊ शकली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता केली तरीही सहा महिन्यांपासून शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा झाली नाही. काही शेतकऱ्यांना रक्कम मिळाली व काहींना अद्यापही प्रतीक्षा असल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. कृषी विभागाला विचारणा केल्यास शासनाला ती रक्कम परत गेली असून, शासनाकडून आता पुन्हा पैसे पाठविले नाही.

त्यामुळे जेव्हा शासन ते पैसे देतील तेव्हा खात्यात वळते करता येईल, असे अधिकारी सांगतात. शेतकऱ्यांनी त्रुटींची पूर्तता केल्यावरही संगणकावर त्या कायम दाखविल्या जात असून, कुणीही अधिकारी याबाबत सांगायला तयार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी कुणाकडे न्याय मागावा, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

इतकेच नाही तर आता इतरही योजनेचा लाभ या त्रुट्यांमुळे नाकारण्यात आला तर काय होईल, असाही प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा वाली कोणीही उरला नसल्याच्या संतप्त प्रतिक्रिया आता शेतकऱ्यांतून उमटत चालल्या असल्याचे चित्र शहरासह ग्रामीण भागातही दिसून येत आहे.

शेतकऱ्यांचा फुटबॉलच केला हो..!लाभापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांनी कृषी विभागातील अधिकाऱ्यांना विचारल्यास ते तुमच्या भागातील लोकप्रतिनिधींकडे जाण्याचा सल्ला देतात. तर, महसूल विभागातील अधिकाऱ्यांना विचारणा केल्यास आता ही जबाबदारी कृषी विभागाकडे गेली, त्यांनाच विचारा, असे सांगून जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करतात. गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून शेतकऱ्यांचे हेलपाटेच सुरू असून, या यंत्रणेने शेतकऱ्यांचा फटबॉलच केल्याची ओरड व्हायला लागली आहे.

ऑनलाइन प्रणालीतच शेतकऱ्याचे मरणशासनाने आता शेतकऱ्यांना कोणताही लाभदेण्याकरिता ऑनलाइन प्रणाली अंमलात आणली आहे. त्याकरिता शेतकऱ्यांना हातचे काम सोडून शहराच्या ठिकाणी चकरा माराव्या लागतात. बऱ्याच शेतकऱ्यांना आधार अपडेट व ई-केवायसी काय भानगड आहे, हेही कळत नाही. त्यामुळे आता यातच गुरफटून राहायचे की शेतीची कामे करायची, असाही सवाल शेतकरी करीत आहे. 

टॅग्स :farmingशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रwardha-acवर्धा