शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी बलात्काराचा आरोप असलेला PSI गोपाळ बदने अखेर पोलिसांना शरण
2
जर शांतता करार झाला नाही तर थेट युद्ध होईल; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांची अफगाणिस्तानला धमकी
3
ज्या सिरपनं घेतला २६ मुलांचा जीव, 'त्या' औषध कंपनीनं भाजपाला दिले ९४५ कोटी?; काँग्रेस नेत्याचा दावा
4
पूर्ववैमनस्यातून कराडच्या नांदलापूर येथे युवकाचा खून; ५ जणांनी केला तलवार, कोयत्याने वार
5
"रोहितसोबत फलंदाजी करणं सोपं गेलं, कारण..."; विराट कोहलीने सांगून टाकली 'मन की बात'
6
भारतासाठी धोका! 'चिकन नेक'जवळ चीन घुसण्याच्या तयारीत?; बांगलादेशी समर्थक रस्त्यावर उतरले
7
राज्यसभा निवडणुकीत भाजपा आमच्याकडे डील करायला आली होती, पण...; फारूख अब्दुल्लांचा गौप्यस्फोट
8
IND vs AUS: "आता घरचे लोक पण टोमणे मारतात..."; पत्रकाराच्या 'त्या' प्रश्नावर गिलचं उत्तर
9
Smartphones: १५ हजारांच्या बजेटमध्ये चांगला स्मार्टफोन शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन!
10
पोत्यातून निघाल्या नोटाच नोटा! भीक मागणाऱ्या महिलेकडे सापडला 'खजिना'; आतापर्यंत किती मोजल्या?
11
Viral Video: जुना, तुटलेल्या टीव्हीचा बनवला हेल्मेट; तरुणाचा जुगाड पाहून नेटकरी शॉक!
12
ICC Womens World Cup 2025 : ठरलं! नवी मुंबईत भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणार सेमीफायनल
13
काहींची व्यक्तिगत पातळीवर टीका; पण जैन बांधवांनी माझं एकदाही नाव घेतलं नाही - मुरलीधर मोहोळ
14
दोन शून्य, नंतर 'मॅचविनिंग' अर्धशतक! विजयावर विराट कोहली म्हणाला- "इतकी वर्ष खेळूनसुद्धा.."
15
ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटर्सची भररस्त्यात छेड काढणारा अकील खान ६ तासांत पोलिसांच्या ताब्यात
16
एकनाथ शिंदेंची अचानक 'दिल्ली'वारी, PM नरेंद्र मोदींची घेतली भेट; महायुतीतील मतभेदावर म्हणाले...
17
सतीश शाह यांच्या निधनानंतर आर माधवनची भावुक पोस्ट, 'या' विनोदी मालिकेत केलं होतं एकत्र काम
18
बलूच नेत्यानं केली पाक लष्करप्रमुख असीम मुनीरची पोलखोल; जगासमोर उघड झाला पाकिस्तानचा 'डबल गेम'
19
Virat Kohli: वनडे + टी-२० मध्ये सर्वाधिक धावा; कोहलीच्या डोक्यावर ताज, सचिन तेंडुलकरला टाकलं मागे
20
AUS W vs SA W : वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच असं घडलं; Alana King नं ७ विकेट्स घेत रचला इतिहास

कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग तर स्वामिनाथन आयोग केव्हा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2019 22:42 IST

महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागातील २० लाख कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू केला आहे. मात्र मागील १० वर्षापासून मागणी असूनही शेतकऱ्यांना स्वामीनाथन आयोग लागू केला नाही. तो केव्हा लागू करणार असा सवाल पं. शंकरप्रसाद अग्निहोत्री यांनी राज्याचे मुख्यमंत्री आणि देशाचे पंतप्रधान यांना निवेदनातून केला आहे.

ठळक मुद्देशंकरप्रसाद अग्निहोत्री यांचा सवाल

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागातील २० लाख कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू केला आहे. मात्र मागील १० वर्षापासून मागणी असूनही शेतकऱ्यांना स्वामीनाथन आयोग लागू केला नाही. तो केव्हा लागू करणार असा सवाल पं. शंकरप्रसाद अग्निहोत्री यांनी राज्याचे मुख्यमंत्री आणि देशाचे पंतप्रधान यांना निवेदनातून केला आहे.अग्निहोत्री यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्र शासनाचा शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतनावर १ लाख १४ हजार कोटीचा वार्षिक खर्च होतो. व तो आता १ लाख ४७ हजार कोटीचा होईल. महाराष्ट्र शासनाचे वार्षिक बजेट जवळपास ४ लाख कोटीचे आहे. त्यापैकी दीड लाख कोटी रुपये फक्त २० हजार परिवारातील म्हणजे ८ टक्के लोकांवर होणार आहे. आणि अडीच लाख कोटी रुपये म्हणजे ९२ टक्के शासनाच्या इतर विभागावर खर्च केल्या जाते. गेल्या १० वर्षापासून राज्यातील शेतकऱ्यांना स्वामिनाथन आयोग लागू करण्याची मागणी होत आहे. शेतकऱ्यांच्या शेती उत्पादन शुल्कावर आधारित हमी भाव मिळाला पाहिजे. शासनाने उत्पादन खर्चाच्या दीडपट हमी भाव घोषित केला परंतु कांदयाचा उत्पादन खर्च १० रुपये प्रती किलो आहे पण त्यांना एकही रुपया मिळत नाही. कापसाचे उत्पादन खर्च ७००० प्रती क्विंटल आहे त्याला भाव १००० रुपयाने कमी मिळतो. गव्हाचा उत्पादन खर्च २७०० रुपये प्रती क्विंटल असा आहे तो २२०० रुपये विकल्या जात आहे. शेतकऱ्यांना त्याच्या खर्चा एव्हढी भाव मिळत नाही. शासनाने कर्ज माफ केले ते १ -२ लाख रुपयापर्यंत परंतु शासकीय कर्मचारी ज्यांचे लाखाच्या वर वेतन आहे त्यांना १४००० चे वर वेतनवाढ आणि ज्यांना ३० हजारचे वर आहे त्यांना ४००० वेतनवाढ या सातव्या वेतन आयोगाद्वारे केली आहे. कर्मचारी हे संघटीत असल्यामुळे सरकारला वेठीस धरतात व आपल्या मागण्या पूर्ण करून घेतात, असे त्यांनी म्हटले आहे.

टॅग्स :7th Pay Commissionसातवा वेतन आयोगFarmerशेतकरी