शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग तर स्वामिनाथन आयोग केव्हा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2019 22:42 IST

महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागातील २० लाख कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू केला आहे. मात्र मागील १० वर्षापासून मागणी असूनही शेतकऱ्यांना स्वामीनाथन आयोग लागू केला नाही. तो केव्हा लागू करणार असा सवाल पं. शंकरप्रसाद अग्निहोत्री यांनी राज्याचे मुख्यमंत्री आणि देशाचे पंतप्रधान यांना निवेदनातून केला आहे.

ठळक मुद्देशंकरप्रसाद अग्निहोत्री यांचा सवाल

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागातील २० लाख कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू केला आहे. मात्र मागील १० वर्षापासून मागणी असूनही शेतकऱ्यांना स्वामीनाथन आयोग लागू केला नाही. तो केव्हा लागू करणार असा सवाल पं. शंकरप्रसाद अग्निहोत्री यांनी राज्याचे मुख्यमंत्री आणि देशाचे पंतप्रधान यांना निवेदनातून केला आहे.अग्निहोत्री यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्र शासनाचा शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतनावर १ लाख १४ हजार कोटीचा वार्षिक खर्च होतो. व तो आता १ लाख ४७ हजार कोटीचा होईल. महाराष्ट्र शासनाचे वार्षिक बजेट जवळपास ४ लाख कोटीचे आहे. त्यापैकी दीड लाख कोटी रुपये फक्त २० हजार परिवारातील म्हणजे ८ टक्के लोकांवर होणार आहे. आणि अडीच लाख कोटी रुपये म्हणजे ९२ टक्के शासनाच्या इतर विभागावर खर्च केल्या जाते. गेल्या १० वर्षापासून राज्यातील शेतकऱ्यांना स्वामिनाथन आयोग लागू करण्याची मागणी होत आहे. शेतकऱ्यांच्या शेती उत्पादन शुल्कावर आधारित हमी भाव मिळाला पाहिजे. शासनाने उत्पादन खर्चाच्या दीडपट हमी भाव घोषित केला परंतु कांदयाचा उत्पादन खर्च १० रुपये प्रती किलो आहे पण त्यांना एकही रुपया मिळत नाही. कापसाचे उत्पादन खर्च ७००० प्रती क्विंटल आहे त्याला भाव १००० रुपयाने कमी मिळतो. गव्हाचा उत्पादन खर्च २७०० रुपये प्रती क्विंटल असा आहे तो २२०० रुपये विकल्या जात आहे. शेतकऱ्यांना त्याच्या खर्चा एव्हढी भाव मिळत नाही. शासनाने कर्ज माफ केले ते १ -२ लाख रुपयापर्यंत परंतु शासकीय कर्मचारी ज्यांचे लाखाच्या वर वेतन आहे त्यांना १४००० चे वर वेतनवाढ आणि ज्यांना ३० हजारचे वर आहे त्यांना ४००० वेतनवाढ या सातव्या वेतन आयोगाद्वारे केली आहे. कर्मचारी हे संघटीत असल्यामुळे सरकारला वेठीस धरतात व आपल्या मागण्या पूर्ण करून घेतात, असे त्यांनी म्हटले आहे.

टॅग्स :7th Pay Commissionसातवा वेतन आयोगFarmerशेतकरी