शहरं
Join us  
Trending Stories
1
विंडिजची 'मसल पॉवर' संपली! रसेलची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अचानक निवृत्ती, 'या' दिवशी शेवटची मॅच
2
व्वा रं पठ्ठ्या !! मगरीनं अचानक येऊन त्याचं डोकं जबड्यात धरलं, पण धाडसाने वाचवले स्वत:चे प्राण
3
विठुरायाच्या कृपेने अवचितराव पुन्हा स्वगृही! घर सोडून गेले अन् तब्बल २० वर्षांनी परतले मुळगावी...
4
पत्नीला पोटगी देण्यासाठी बेरोजगार बनला ‘चेनस्नॅचर’; नागपुरच्या पाच जबरी चोरीच्या गुन्ह्यांची उकल
5
धक्कादायक! नागपूर मध्यवर्ती कारागृहात अंडरविअरच्या इलॅस्टिकने कैद्याने घेतली फाशी
6
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
7
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
8
खापरी–गुमगावदरम्यान ऑटोमॅटिक ब्लॉक सिग्नलिंग सिस्टम; मध्य रेल्वेकडून तंत्रज्ञानाची कास
9
कौतुकास्पद! उद्योगांच्या मदतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ शिकवणार कार्पोरेट प्रशासन
10
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
11
विशेष मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन सहकार्य करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही
12
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
13
₹96 च्या IPO वर गुंतवणूकदारांच्या उड्या, 142 पट सब्सक्राइब झाला; GMP ला 43 रुपयांचा फायदा!
14
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
15
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
16
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
17
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
18
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
19
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
20
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 

गहू, चणा नुकसानीच्या अनुदान यादीत घोळ

By admin | Updated: September 4, 2015 02:11 IST

गतवर्षीच्या रबी हंगामात दर १५ दिवसांनी वादळी वारा, पाऊस व गारपीट झाल्याने शेतातील गहू व चना पिकांचे मोठे नुकसान झाले होते.

नुकसानग्रस्त शेतकरी वंचित : रबी हंगामात पेरणी न केलेल्या शेतकऱ्यांना मिळतोय लाभरोहणा : गतवर्षीच्या रबी हंगामात दर १५ दिवसांनी वादळी वारा, पाऊस व गारपीट झाल्याने शेतातील गहू व चना पिकांचे मोठे नुकसान झाले होते. शासनाने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून अनुदान वाटप सुरू केले. त्या यादीत तलाठी, कृषी सहायक व ग्रामसेवकांनी प्रचंड घोळ केला. यामुळे नुकसानग्रस्त शेतकरीही अनुदानापासून वंचित राहीले. पेरणीच नव्हती, अशा शेतकऱ्यांना मात्र अनुदानाचा लाभ मिळत आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते, तेव्हा त्यांना मदत म्हणून शासन अनुदानाच्या रूपात आर्थिक मदतीचे वितरण करते. नुकसानग्रस्त पिके व त्यांचा आराजीचा सर्व्हे तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायक संयुक्तरित्या करतात. यानंतर तयार यादीवर त्या कर्मचाऱ्यांनी सह्या करून अहवाल तहसील कार्यालयात सादर करायचा असतो; पण प्रत्येक सर्व्हेच्या वेळी प्रचंड घोळ केला जातो. नुकसानग्रस्तांना अनुदानापासून वंचित ठेवून नुकसान न झालेल्यांची नावे यादीत टाकली जातात. याबाबत प्रत्येकवेळी शेतकऱ्यांची ओरड होते. अनेकदा तक्रारी झाल्या, काही कर्मचाऱ्यांवर कारवाईही झाली; पण हात ओले करून घेण्याच्या सवयीत गुंतलेल्या कर्मचाऱ्यांमुळे यादीतील घोळ नेहमीचाच झाला आहे. २०१४-१५ च्या रबी हंगामात रोहणा परिसरात प्रत्येक १५ दिवसांनी शेतकऱ्यांना वादळी वारा, पाऊस व गारपीटीचा तडाखा बसला. यात गहू व चणा पिकांचे मोठे नुकसान झाले. हाता- तोंडाशी आलेले पीक जमीनदोस्त झाले. संत्रा उत्पादकांचे लाखोंचे नुकसान झाले. त्या नुकसान भरपाईचे वाटप नुकतेच सुरू झाले. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी उपरोक्त तिन्ही कर्मचाऱ्यांना आपल्या नुकसानीबाबत पुर्वसूचना दिली होती. कर्मचाऱ्यांनी देखील तुमचे नाव यादीत समाविष्ट केल्याचे सांगितले होते. प्रत्यक्ष वाटप झाल्यावर लक्षात आले की, यादीत अनेकांची नावे नसल्याने त्यांना अनुदानाचा लाभ मिळाला नाही. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याकरिता जिल्हाधिकाऱ्यांनीच लक्ष देत यादीत घोळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.