शहरं
Join us  
Trending Stories
1
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
2
VIDEO: क्लासिक!! धोनीने रांचीच्या रस्त्यावर चालवली व्हिंटेज आलिशान 'रॉल्स-रॉयस'; चाहते खुश
3
जाळपोळ, तोडफोडीसह नेपाळ पेटलं! हजारो युवक रस्त्यावर उतरले; गोळीबारात आतापर्यंत ९ मृत्यू ८० जखमी
4
हॉटेल आणि रेस्टॉरंटमधील जेवणावरचा GST दरात कपात! १ लाखाचे पॅकेज मिळणार ८०,००० हजारात
5
रॉकेट बनला 'हा' शेअर, रणबीर कपूर-दामानींसह अनेक दिग्गजांची खरेदी
6
जीव तुटला...! हजारो नव्या कोऱ्या गाड्यांचा कचरा झाला; पुरात बुडाल्या मारुती, ह्युंदाईच्या कार
7
लालबागचा राजा विसर्जन मिरवणुकीत चोरांनी १०० मोबाईल अन् सोन्याच्या चेन केल्या लंपास; चार आरोपींना अटक
8
पूरग्रस्त भागात गेलेल्या काँग्रेस खासदाराला ग्रामस्थांनी खांद्यावर घेतलं, भाजपाने Video वरुन घेरलं
9
समृद्धी महामार्गावर अडीच कोटींची वॅक्सीन चोरी, आंतरराज्य टोळीला वाशिम पोलिसांनी केली अटक
10
मेहुल चोक्सीला जेलमध्ये स्वच्छ पाणी अन् टॉयलेट देणार; भारताने बेल्जियमला दिली १४ सुविधांची यादी
11
सरकारे उलथवून टाकण्यात तरुणाई सर्वात पुढे; आतापर्यंत 'या' देशांमध्ये झाले सत्तापालट
12
पतीला सोडून प्रियकरासोबत पळून गेली ५ मुलांची आई, लग्न केलं पण...; गावात रंगला हाय वोल्टेज ड्रामा!
13
विमा स्वस्त होणार म्हणून आनंद झाला होता? आता प्रीमियम वाढण्याच्या शक्यतेने वाढली चिंता
14
"क्षमतेपेक्षा जास्त हुंडा दिला तरीही..."; लेकीने लग्नाच्या ९ महिन्यांतच संपवलं जीवन, आईचा टाहो
15
नेपाळमध्ये सोशल मीडिया Appsवर बंदी; Gen-Z आक्रमक, सरकारविरोधात तीव्र निदर्शने
16
एक लाख व्ह्यूज मिळाल्यावर इंस्टाग्राम किती पैसे देते? जाणून व्हाल हैराण!
17
"विरोधकांच्या ठिकऱ्या उडणार, बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी करणाऱ्यांनी..."; भाजपाचा टोला
18
धक्कादायक! जिथे CCTV तिथेच सामान तपासा; रेल्वे प्रवाशांचं साहित्य तपासणारे पोलीसच करतायेत लूट
19
लाल किल्ल्यावरून १ कोटी रुपयांचा कलश चोरणारा पकडला गेला अन् धक्कादायक खुलासा झाला!
20
Asia Cup 2025 : संजू सॅमसन संदर्भात रवी शास्त्रींचं मोठं वक्तव्य; गंभीरला त्यातील गांभीर्य कळणार का?

गहू, चणा नुकसानीच्या अनुदान यादीत घोळ

By admin | Updated: September 4, 2015 02:11 IST

गतवर्षीच्या रबी हंगामात दर १५ दिवसांनी वादळी वारा, पाऊस व गारपीट झाल्याने शेतातील गहू व चना पिकांचे मोठे नुकसान झाले होते.

नुकसानग्रस्त शेतकरी वंचित : रबी हंगामात पेरणी न केलेल्या शेतकऱ्यांना मिळतोय लाभरोहणा : गतवर्षीच्या रबी हंगामात दर १५ दिवसांनी वादळी वारा, पाऊस व गारपीट झाल्याने शेतातील गहू व चना पिकांचे मोठे नुकसान झाले होते. शासनाने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून अनुदान वाटप सुरू केले. त्या यादीत तलाठी, कृषी सहायक व ग्रामसेवकांनी प्रचंड घोळ केला. यामुळे नुकसानग्रस्त शेतकरीही अनुदानापासून वंचित राहीले. पेरणीच नव्हती, अशा शेतकऱ्यांना मात्र अनुदानाचा लाभ मिळत आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते, तेव्हा त्यांना मदत म्हणून शासन अनुदानाच्या रूपात आर्थिक मदतीचे वितरण करते. नुकसानग्रस्त पिके व त्यांचा आराजीचा सर्व्हे तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायक संयुक्तरित्या करतात. यानंतर तयार यादीवर त्या कर्मचाऱ्यांनी सह्या करून अहवाल तहसील कार्यालयात सादर करायचा असतो; पण प्रत्येक सर्व्हेच्या वेळी प्रचंड घोळ केला जातो. नुकसानग्रस्तांना अनुदानापासून वंचित ठेवून नुकसान न झालेल्यांची नावे यादीत टाकली जातात. याबाबत प्रत्येकवेळी शेतकऱ्यांची ओरड होते. अनेकदा तक्रारी झाल्या, काही कर्मचाऱ्यांवर कारवाईही झाली; पण हात ओले करून घेण्याच्या सवयीत गुंतलेल्या कर्मचाऱ्यांमुळे यादीतील घोळ नेहमीचाच झाला आहे. २०१४-१५ च्या रबी हंगामात रोहणा परिसरात प्रत्येक १५ दिवसांनी शेतकऱ्यांना वादळी वारा, पाऊस व गारपीटीचा तडाखा बसला. यात गहू व चणा पिकांचे मोठे नुकसान झाले. हाता- तोंडाशी आलेले पीक जमीनदोस्त झाले. संत्रा उत्पादकांचे लाखोंचे नुकसान झाले. त्या नुकसान भरपाईचे वाटप नुकतेच सुरू झाले. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी उपरोक्त तिन्ही कर्मचाऱ्यांना आपल्या नुकसानीबाबत पुर्वसूचना दिली होती. कर्मचाऱ्यांनी देखील तुमचे नाव यादीत समाविष्ट केल्याचे सांगितले होते. प्रत्यक्ष वाटप झाल्यावर लक्षात आले की, यादीत अनेकांची नावे नसल्याने त्यांना अनुदानाचा लाभ मिळाला नाही. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याकरिता जिल्हाधिकाऱ्यांनीच लक्ष देत यादीत घोळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.