शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

दोन शाळेत नाव असलेल्या अडीच हजार विद्यार्थ्यांचे अन् शिक्षकांचे काय होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2021 22:38 IST

जिल्ह्यातील एकूण २,१०,०९३ विद्यार्थ्यांपैकी १,९९,९७९ विद्यार्थ्यांनी पोर्टलवर आधार नोंदणी केली आहे. त्यापैकी २,५७५ विद्यार्थ्यांचे आधार दोन ठिकाणी अपलोड केल्याचे दर्शविले जात आहेत, तर ४८,८२५ विद्यार्थ्यांचे आधार कार्ड मिसमॅच दाखवित आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांसह शिक्षकांच्याही अडचणी वाढल्या असून, विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अपडेट करून तातडीने नव्याने अपलोड करण्याची गरज निर्माण झाली आहे.

आनंद इंगोलेलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शासनाकडून विद्यार्थ्यांच्या पटसंख्येनुसार शिक्षकांची संचमान्यता दिली जाते. याकरिता शाळेमध्ये प्रवेशित सर्व विद्यार्थ्यांची पोर्टलवर नोंदणी करणे अनिवार्य असून, त्या विद्यार्थ्यांचे आधार कार्ड बंधनकारक केले आहे. विशेषत: संचमान्यतेकरिता आता आधार अपडेट असलेल्या विद्यार्थ्यांचीच पटसंख्या गृहीत धरली जाणार आहे. त्यानुसार जिल्ह्यातील एकूण २,१०,०९३ विद्यार्थ्यांपैकी १,९९,९७९ विद्यार्थ्यांनी पोर्टलवर आधार नोंदणी केली आहे. त्यापैकी २,५७५ विद्यार्थ्यांचे आधार दोन ठिकाणी अपलोड केल्याचे दर्शविले जात आहेत, तर ४८,८२५ विद्यार्थ्यांचे आधार कार्ड मिसमॅच दाखवित आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांसह शिक्षकांच्याही अडचणी वाढल्या असून, विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अपडेट करून तातडीने नव्याने अपलोड करण्याची गरज निर्माण झाली आहे.

शिक्षकांच्या संच मान्यतेकरिता पोर्टलवर आधार नोंदणी असलेली विद्यार्थी संख्याच ग्राह्य धरली जाणार आहे.  परंतु शाळेमध्ये प्रत्यक्ष विद्यार्थी प्रवेशित असताना आधार मिसमॅट्च होत असल्याने शिक्षकांच्या अडचणी वाढणार आहे. यासंदर्भात सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांना सूचना करुन डुप्लिकेट अन् मिसमॅट्च विद्यार्थ्यांचे आधारकार्ड अपडेट करुन नव्याने अपलोड करण्यास सांगितले आहे. लिंबाजी सोनवणे,  शिक्षणाधिकारी, प्राथमिक़ 

शिक्षक संघटनांचे पदाधिकारी म्हणतात...

संचमान्यता अंतिम करण्यासाठी आधार लिंक आवश्यक आहे. याबाबत कोणतीही शंका नाही. खोटी पटसंख्या नोंदणीला निर्बंध करणेही गरजेचे आहे. मात्र, आधारवरील नोंदी अपडेट करण्यात अनंत अडचणी येत आहे. यासाठी शिक्षक, मुख्याध्यापकांना जबाबदार धरून माहिती मिसमॅट्च असल्यास पटनोंदणी खोटी ठरवून शिक्षकांना अतिरिक्त ठरविणे म्हणजे दुखणे दुर्लक्षित करून जालीम उपाय वारणे होईल. - विजय कोंबे, राज्य सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती

संचमान्यता निर्धारित करण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत असलेली पटसंख्या ग्राह्य धरली जाते. त्यामुळे शासनाने यापूर्वीच आधार नोंदणी करण्याकरिता विशेष शिबिर आयोजित करुन प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक होते. आता तारीख उलटून गेल्यानंतर विद्यार्थ्यांची आधार नोंदणी करण्यासाठी खटाटोप केला जात आहे. शासनाची ही कृती शिक्षकांकरिता अन्यायकारक आहे. त्यामुळे ३० सप्टेंबरपर्यंतच्या पटसंख्येनुसारच संचमान्यता द्यावी.- अजय भोयर, कार्यालय मंत्री, शिक्षक परिषद.

 

टॅग्स :Adhar Cardआधार कार्डStudentविद्यार्थी