शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

दोन शाळेत नाव असलेल्या अडीच हजार विद्यार्थ्यांचे अन् शिक्षकांचे काय होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2021 22:38 IST

जिल्ह्यातील एकूण २,१०,०९३ विद्यार्थ्यांपैकी १,९९,९७९ विद्यार्थ्यांनी पोर्टलवर आधार नोंदणी केली आहे. त्यापैकी २,५७५ विद्यार्थ्यांचे आधार दोन ठिकाणी अपलोड केल्याचे दर्शविले जात आहेत, तर ४८,८२५ विद्यार्थ्यांचे आधार कार्ड मिसमॅच दाखवित आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांसह शिक्षकांच्याही अडचणी वाढल्या असून, विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अपडेट करून तातडीने नव्याने अपलोड करण्याची गरज निर्माण झाली आहे.

आनंद इंगोलेलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शासनाकडून विद्यार्थ्यांच्या पटसंख्येनुसार शिक्षकांची संचमान्यता दिली जाते. याकरिता शाळेमध्ये प्रवेशित सर्व विद्यार्थ्यांची पोर्टलवर नोंदणी करणे अनिवार्य असून, त्या विद्यार्थ्यांचे आधार कार्ड बंधनकारक केले आहे. विशेषत: संचमान्यतेकरिता आता आधार अपडेट असलेल्या विद्यार्थ्यांचीच पटसंख्या गृहीत धरली जाणार आहे. त्यानुसार जिल्ह्यातील एकूण २,१०,०९३ विद्यार्थ्यांपैकी १,९९,९७९ विद्यार्थ्यांनी पोर्टलवर आधार नोंदणी केली आहे. त्यापैकी २,५७५ विद्यार्थ्यांचे आधार दोन ठिकाणी अपलोड केल्याचे दर्शविले जात आहेत, तर ४८,८२५ विद्यार्थ्यांचे आधार कार्ड मिसमॅच दाखवित आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांसह शिक्षकांच्याही अडचणी वाढल्या असून, विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अपडेट करून तातडीने नव्याने अपलोड करण्याची गरज निर्माण झाली आहे.

शिक्षकांच्या संच मान्यतेकरिता पोर्टलवर आधार नोंदणी असलेली विद्यार्थी संख्याच ग्राह्य धरली जाणार आहे.  परंतु शाळेमध्ये प्रत्यक्ष विद्यार्थी प्रवेशित असताना आधार मिसमॅट्च होत असल्याने शिक्षकांच्या अडचणी वाढणार आहे. यासंदर्भात सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांना सूचना करुन डुप्लिकेट अन् मिसमॅट्च विद्यार्थ्यांचे आधारकार्ड अपडेट करुन नव्याने अपलोड करण्यास सांगितले आहे. लिंबाजी सोनवणे,  शिक्षणाधिकारी, प्राथमिक़ 

शिक्षक संघटनांचे पदाधिकारी म्हणतात...

संचमान्यता अंतिम करण्यासाठी आधार लिंक आवश्यक आहे. याबाबत कोणतीही शंका नाही. खोटी पटसंख्या नोंदणीला निर्बंध करणेही गरजेचे आहे. मात्र, आधारवरील नोंदी अपडेट करण्यात अनंत अडचणी येत आहे. यासाठी शिक्षक, मुख्याध्यापकांना जबाबदार धरून माहिती मिसमॅट्च असल्यास पटनोंदणी खोटी ठरवून शिक्षकांना अतिरिक्त ठरविणे म्हणजे दुखणे दुर्लक्षित करून जालीम उपाय वारणे होईल. - विजय कोंबे, राज्य सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती

संचमान्यता निर्धारित करण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत असलेली पटसंख्या ग्राह्य धरली जाते. त्यामुळे शासनाने यापूर्वीच आधार नोंदणी करण्याकरिता विशेष शिबिर आयोजित करुन प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक होते. आता तारीख उलटून गेल्यानंतर विद्यार्थ्यांची आधार नोंदणी करण्यासाठी खटाटोप केला जात आहे. शासनाची ही कृती शिक्षकांकरिता अन्यायकारक आहे. त्यामुळे ३० सप्टेंबरपर्यंतच्या पटसंख्येनुसारच संचमान्यता द्यावी.- अजय भोयर, कार्यालय मंत्री, शिक्षक परिषद.

 

टॅग्स :Adhar Cardआधार कार्डStudentविद्यार्थी