शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
3
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
4
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
5
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
6
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
7
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
8
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
9
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
10
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
11
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
12
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
13
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
14
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
15
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
16
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
17
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
18
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
19
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
20
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा

मुलांमध्ये राग वाढला तर अशावेळी पालकांनी नेमके करायचे तरी काय ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2025 18:09 IST

Wardha : ५ वर्षांपासूनच्या मुलांमध्येही राग लागला वाढीस

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : छोट्या-छोट्या गोष्टींवरून लहान मुलांमध्येही राग अनावर होत असल्याचे चित्र बरेचदा दिसून येते. अनेक मुले तर रागाच्या भरात चुकीचे पाऊल उचलतात. त्यामुळे मुलांना राग येत असेल तर पालकांनी त्यांना चिडवणे, रागावणे टाळावे आणि मारहाणही करू नये, तसे केल्यास त्याचे विपरीत परिणाम होऊ शकतात. त्याऐवजी त्यांच्या रागाची कारणे समजून घेऊन प्रेमाने बोलून त्यांचा राग शांत करावा, त्यांच्यासोबत वेळ घालवावा, असा सल्ला मानसिक रोग तज्ज्ञ डॉ. रूपाली सरोदे यांनी दिला.

शिवाय काही मुलं त्यांच्या पालकांना आयुष्यभर भांडताना पाहून मोठी होतात. ही मुले हिंसा आणि आक्रमकतेला बळी पडतात. सतत नकारात्मक गोष्टी बघणे, एकटे राहणे आदी कारणांमुळे मुले रागीट होतात. मुलांना टीव्ही, मोबाइल बघण्याचा छंद असतो. बऱ्याच चित्रपटांत हिंसक दृश्ये दाखविण्यात येत असतात, त्यांचाही परिणाम मुलांवर होतो. मुले अनुकरणातून व निरीक्षणातून शिकत असतात. त्यामुळे घरातील ज्येष्ठांनी, पालकांनी आपली वागणूक कशी आहे, यावरही लक्ष केंद्रीत करणे अत्यंत आवश्यक आहे.

मुले रागीट होण्याची कारणेआई-वडील मुलांना फारसा वेळ देत नसतील तर मुले स्वतःला एकटे समजतात. त्यामुळे त्यांचा स्वभाव रागीट अन् चिडचिडा होतो.मुलांना राग आला तर त्यांची प्रेमाने समजूत घालावी. मुलांवर हात उगारणे, त्यांना चिडवणे टाळावे, मुलांसोबत अधिकाधिक वेळ घालवणे गरजेचे आहे. त्यामुळे याचेही भान पालकांनी ठेवणे गरजेचे आहे.

दहापैकी आठ केसेस रागीटआजकाल मुलांचा हट्टीपणा, रागीट स्वभाव, चिडचिडेपणा, एकाकीपणा अशा विविध कारणांनी मानसोपचार तज्ज्ञांकडे जाण्याचे प्रमाण वाढले आहे. दहापैकी आठ केसेस तर रागीट स्वभावाच्या असल्याच्या दिसून येतात. त्यामुळे पालकांनी मुलांकडे लक्ष द्यावे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

दहापैकी आठ केसेस रागीटआजकाल मुलांचा हट्टीपणा, रागीट स्वभाव, चिडचिडेपणा, एकाकीपणा अशा विविध कारणांनी मानसोपचार तज्ज्ञांकडे जाण्याचे प्रमाण वाढले आहे. दहापैकी आठ केसेस तर रागीट स्वभावाच्या असल्याच्या दिसून येतात. त्यामुळे पालकांनी मुलांकडे लक्ष द्यावे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

"घरातील वातावरणाचा प्रभाव मुलांवर पडत असतो. त्यामुळे घरातील वातावरण खेळीमेळीचे असावे, आई-वडिलांनी मुलांना पुरेसा वेळ द्यावा, कधीकाळी त्याला राग आल्यास काही चुका झाल्यास त्याच्यावर न चिडता प्रेमाने समजूत घालावी, त्याच्या रागामागील कारणांचा शोध घ्यावा. मुले मोबाइलवर काय बघतात, याकडे लक्ष द्यावे. अधिकच चिडचिडेपणा, राग येत असेल तर मानसोपचार तज्ज्ञांना दाखवून तातडीने उपचार घ्यावा."- डॉ. रूपाली सरोदे, मानसोपचारतज्ज्ञ.

टॅग्स :wardha-acवर्धा