शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर काँग्रेस पक्षाला थेट आरोपी बनवता येईल"; नॅशनल हेराल्ड प्रकरणात EDचा न्यायालयात दावा
2
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मोठा धक्का, सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा!
3
"माझ्यासमोरच त्याने तिघांना मारलंय"; वाल्मिक कराडच्या जुन्या सहकाऱ्याचा धक्कादायक दावा; म्हणाले, "त्याला बीडचा..."
4
"लग्न करुन येऊ? घर देणार का मग?", अ‍ॅक्टर असल्यामुळे मिळत नाहीये घर, पूजा कार्तुडे संतापली!
5
इन्स्टाग्रामवर सूत जुळलं, कोर्ट मॅरेजनंतर मुलाला दिला जन्म; २२ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य
6
...तर अशी भागणार पाकिस्तानची तहान; सिंधू जल करार रद्द केल्यानंतर शहबाज शरीफ मोठं पाऊल उचलणार!
7
२०२७ पर्यंत ३ राशींना साडेसाती कायम, २ राशींवर शनि दृष्टी; अशुभ प्रभाव वाढेल? ‘हे’ उपाय कराच
8
“उद्धव ठाकरे ‘मातोश्री’चा एक हिस्सा काढून राज ठाकरेंना देणार का?”; नारायण राणेंचा सवाल
9
ENG vs IND : यशस्वी जैस्वाल इंग्लंडला नडला अन् कॅप्टन बेन स्टोक्सलाही भिडला; नेमकं काय घडलं?
10
५ जुलैच्या ठाकरे बंधूंच्या विजयी सभेत सहभागी होणार का? काँग्रेस नेत्यांचे सूचक विधान, म्हणाले...
11
काँग्रेस मजबूत करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष सपकाळांचा पुढाकार; ८३ तालुकाध्यक्षांच्या नियुक्त्या
12
KL राहुलला विश्वासच बसेना! क्रिस वोक्सनं अप्रतिम चेंडूवर उडवला त्रिफळा (VIDEO)
13
मुसळधार पावसात AC सुरू ठेवणं योग्य आहे का? बहुतेक लोक करतात 'ही' चूक
14
राहुल आणि सोनिया गांधींनी केलेला २००० कोटी रुपये लाटण्याचा प्रयत्न; ईडीचा मोठा आरोप
15
भयंकर! कुत्रा चावल्यामुळे कबड्डीपटूचा तडफडून मृत्यू; अँटी रेबीज इंजेक्शन न घेणं बेतलं जीवावर
16
लग्नाआधीच अनेकदा तुझ्या रूममध्ये का दिसायची रितिका? भज्जीच्या प्रश्नावर रोहित शर्माचं भन्नाट उत्तर
17
कोलकाता: 'तो' बलात्कार होता तर आरोपीच्या अंगावर 'लव्ह बाईट्स' कसे? वकिलाचा धक्कादायक सवाल
18
काय वाटले असेल...? एनआयटी टॉपरला ४५ लाखांचे पॅकेज मिळाले अन् अचानक नोकरीवरून काढले...
19
Pitru Paksha 2025: यंदा पितृपक्षावर दोन ग्रहणांचे सावट; श्राद्धविधीत होणार अडचण? 
20
अवघी दिल्ली एवढी लोकसंख्या, तरीही भारताच्या दृष्टीने 'घाना' देश महत्त्वाचा! कारण तरी काय?

मुलांमध्ये राग वाढला तर अशावेळी पालकांनी नेमके करायचे तरी काय ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2025 18:09 IST

Wardha : ५ वर्षांपासूनच्या मुलांमध्येही राग लागला वाढीस

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : छोट्या-छोट्या गोष्टींवरून लहान मुलांमध्येही राग अनावर होत असल्याचे चित्र बरेचदा दिसून येते. अनेक मुले तर रागाच्या भरात चुकीचे पाऊल उचलतात. त्यामुळे मुलांना राग येत असेल तर पालकांनी त्यांना चिडवणे, रागावणे टाळावे आणि मारहाणही करू नये, तसे केल्यास त्याचे विपरीत परिणाम होऊ शकतात. त्याऐवजी त्यांच्या रागाची कारणे समजून घेऊन प्रेमाने बोलून त्यांचा राग शांत करावा, त्यांच्यासोबत वेळ घालवावा, असा सल्ला मानसिक रोग तज्ज्ञ डॉ. रूपाली सरोदे यांनी दिला.

शिवाय काही मुलं त्यांच्या पालकांना आयुष्यभर भांडताना पाहून मोठी होतात. ही मुले हिंसा आणि आक्रमकतेला बळी पडतात. सतत नकारात्मक गोष्टी बघणे, एकटे राहणे आदी कारणांमुळे मुले रागीट होतात. मुलांना टीव्ही, मोबाइल बघण्याचा छंद असतो. बऱ्याच चित्रपटांत हिंसक दृश्ये दाखविण्यात येत असतात, त्यांचाही परिणाम मुलांवर होतो. मुले अनुकरणातून व निरीक्षणातून शिकत असतात. त्यामुळे घरातील ज्येष्ठांनी, पालकांनी आपली वागणूक कशी आहे, यावरही लक्ष केंद्रीत करणे अत्यंत आवश्यक आहे.

मुले रागीट होण्याची कारणेआई-वडील मुलांना फारसा वेळ देत नसतील तर मुले स्वतःला एकटे समजतात. त्यामुळे त्यांचा स्वभाव रागीट अन् चिडचिडा होतो.मुलांना राग आला तर त्यांची प्रेमाने समजूत घालावी. मुलांवर हात उगारणे, त्यांना चिडवणे टाळावे, मुलांसोबत अधिकाधिक वेळ घालवणे गरजेचे आहे. त्यामुळे याचेही भान पालकांनी ठेवणे गरजेचे आहे.

दहापैकी आठ केसेस रागीटआजकाल मुलांचा हट्टीपणा, रागीट स्वभाव, चिडचिडेपणा, एकाकीपणा अशा विविध कारणांनी मानसोपचार तज्ज्ञांकडे जाण्याचे प्रमाण वाढले आहे. दहापैकी आठ केसेस तर रागीट स्वभावाच्या असल्याच्या दिसून येतात. त्यामुळे पालकांनी मुलांकडे लक्ष द्यावे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

दहापैकी आठ केसेस रागीटआजकाल मुलांचा हट्टीपणा, रागीट स्वभाव, चिडचिडेपणा, एकाकीपणा अशा विविध कारणांनी मानसोपचार तज्ज्ञांकडे जाण्याचे प्रमाण वाढले आहे. दहापैकी आठ केसेस तर रागीट स्वभावाच्या असल्याच्या दिसून येतात. त्यामुळे पालकांनी मुलांकडे लक्ष द्यावे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

"घरातील वातावरणाचा प्रभाव मुलांवर पडत असतो. त्यामुळे घरातील वातावरण खेळीमेळीचे असावे, आई-वडिलांनी मुलांना पुरेसा वेळ द्यावा, कधीकाळी त्याला राग आल्यास काही चुका झाल्यास त्याच्यावर न चिडता प्रेमाने समजूत घालावी, त्याच्या रागामागील कारणांचा शोध घ्यावा. मुले मोबाइलवर काय बघतात, याकडे लक्ष द्यावे. अधिकच चिडचिडेपणा, राग येत असेल तर मानसोपचार तज्ज्ञांना दाखवून तातडीने उपचार घ्यावा."- डॉ. रूपाली सरोदे, मानसोपचारतज्ज्ञ.

टॅग्स :wardha-acवर्धा