शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मुलांमध्ये राग वाढला तर अशावेळी पालकांनी नेमके करायचे तरी काय ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2025 18:09 IST

Wardha : ५ वर्षांपासूनच्या मुलांमध्येही राग लागला वाढीस

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : छोट्या-छोट्या गोष्टींवरून लहान मुलांमध्येही राग अनावर होत असल्याचे चित्र बरेचदा दिसून येते. अनेक मुले तर रागाच्या भरात चुकीचे पाऊल उचलतात. त्यामुळे मुलांना राग येत असेल तर पालकांनी त्यांना चिडवणे, रागावणे टाळावे आणि मारहाणही करू नये, तसे केल्यास त्याचे विपरीत परिणाम होऊ शकतात. त्याऐवजी त्यांच्या रागाची कारणे समजून घेऊन प्रेमाने बोलून त्यांचा राग शांत करावा, त्यांच्यासोबत वेळ घालवावा, असा सल्ला मानसिक रोग तज्ज्ञ डॉ. रूपाली सरोदे यांनी दिला.

शिवाय काही मुलं त्यांच्या पालकांना आयुष्यभर भांडताना पाहून मोठी होतात. ही मुले हिंसा आणि आक्रमकतेला बळी पडतात. सतत नकारात्मक गोष्टी बघणे, एकटे राहणे आदी कारणांमुळे मुले रागीट होतात. मुलांना टीव्ही, मोबाइल बघण्याचा छंद असतो. बऱ्याच चित्रपटांत हिंसक दृश्ये दाखविण्यात येत असतात, त्यांचाही परिणाम मुलांवर होतो. मुले अनुकरणातून व निरीक्षणातून शिकत असतात. त्यामुळे घरातील ज्येष्ठांनी, पालकांनी आपली वागणूक कशी आहे, यावरही लक्ष केंद्रीत करणे अत्यंत आवश्यक आहे.

मुले रागीट होण्याची कारणेआई-वडील मुलांना फारसा वेळ देत नसतील तर मुले स्वतःला एकटे समजतात. त्यामुळे त्यांचा स्वभाव रागीट अन् चिडचिडा होतो.मुलांना राग आला तर त्यांची प्रेमाने समजूत घालावी. मुलांवर हात उगारणे, त्यांना चिडवणे टाळावे, मुलांसोबत अधिकाधिक वेळ घालवणे गरजेचे आहे. त्यामुळे याचेही भान पालकांनी ठेवणे गरजेचे आहे.

दहापैकी आठ केसेस रागीटआजकाल मुलांचा हट्टीपणा, रागीट स्वभाव, चिडचिडेपणा, एकाकीपणा अशा विविध कारणांनी मानसोपचार तज्ज्ञांकडे जाण्याचे प्रमाण वाढले आहे. दहापैकी आठ केसेस तर रागीट स्वभावाच्या असल्याच्या दिसून येतात. त्यामुळे पालकांनी मुलांकडे लक्ष द्यावे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

दहापैकी आठ केसेस रागीटआजकाल मुलांचा हट्टीपणा, रागीट स्वभाव, चिडचिडेपणा, एकाकीपणा अशा विविध कारणांनी मानसोपचार तज्ज्ञांकडे जाण्याचे प्रमाण वाढले आहे. दहापैकी आठ केसेस तर रागीट स्वभावाच्या असल्याच्या दिसून येतात. त्यामुळे पालकांनी मुलांकडे लक्ष द्यावे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

"घरातील वातावरणाचा प्रभाव मुलांवर पडत असतो. त्यामुळे घरातील वातावरण खेळीमेळीचे असावे, आई-वडिलांनी मुलांना पुरेसा वेळ द्यावा, कधीकाळी त्याला राग आल्यास काही चुका झाल्यास त्याच्यावर न चिडता प्रेमाने समजूत घालावी, त्याच्या रागामागील कारणांचा शोध घ्यावा. मुले मोबाइलवर काय बघतात, याकडे लक्ष द्यावे. अधिकच चिडचिडेपणा, राग येत असेल तर मानसोपचार तज्ज्ञांना दाखवून तातडीने उपचार घ्यावा."- डॉ. रूपाली सरोदे, मानसोपचारतज्ज्ञ.

टॅग्स :wardha-acवर्धा