शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

गर्भाशय पिशवीच्या आजाराची कारणे काय? महिलांनी काय काळजी घ्यावी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 17:36 IST

Wardha : गर्भाशय पिशवीचे आजार कोणते?

वर्धा : बदललेली जीवनशैली, तणाव, अनुवांशिकता आदी कारणांमुळे महिलांमधील आजाराचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. यामध्ये गर्भाशय पिशवीच्या आजाराची संख्या अधिक आहे. अनेकांना तर ऐन चाळिशीमध्ये गर्भाशय काढून टाकावे लागत आहे. अनेकदा अनियमित मासिक पाळी, ओटीपोटातील दुखणे याकडे दुर्लक्ष करतात. मात्र, यामुळे गर्भाशयाचा कर्करोग होण्याचा धोका असतो. महिला घरातील कामांमध्ये व कुटुंबांचा साभाळ करण्यातच अधिक वेळ घालवतात. त्यामुळे आजाराकडे सहाजिकच दुर्लक्ष होते. आता वेळीच काळजी घ्यावी, असे आवाहन स्त्रीरोग तज्ज्ञांकडून करण्यात आले आहे.

गर्भाशय पिशवीचे आजार कोणते? पिशवीला गोळा येणे, एंडोमेट्रिओसिस, एडेनोमायोसिस, गर्भाशयाच्या अस्तराची जाळी वाढणे, गर्भाशयाचा कर्करोग आदी आजाराचा धोका असतो.

लक्षणे काय? गर्भाशयात वेदना, रक्तस्त्राव होणे, अनियमित मासिक पाळी, खालच्या ओटीपोटात किंवा गुदाशय क्षेत्रात वेदना, लघवी वाढणे, संभोगादरम्यान वेदना आदी लक्षणे असू शकतात.

काय काळजी घ्यायला हवी? अनियमित मासिक पाळीकडे दुर्लक्ष करू नये. मासिक पाळीदरम्यान जास्त रक्तस्त्राव होत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. शरीराची योग्य स्वच्छता ठेवावी, नियमित व्यायाम करावा व सुदृढ आहार घ्यावा.

तपासणी कधी करावी?वयाची चाळिशी ओलांडल्यानंतर महिलांनी आपली नियमित तपासणी करावी. आपल्या प्रकृतीकडे लक्ष द्यावे. आजारपण अंगावर काढू नये. प्रकृतीमध्ये काही बिघाड झाल्याचे लक्षात येताच तातडीने आरोग्य तंज्ज्ञाचा सल्ला घेण्याची गरज आहे.

कारणे काय? गर्भाशयाचा आजार होण्यामागे अनुवांशिकता, हार्मोनल असंतुलन, थायरॉइड समस्या, सतत तणावग्रस्त जीवनशैली, शरीराकडे दुर्लक्ष करणे, व्यायामाचा अभाव आदी कारणांमुळे गर्भाशयाच्या समस्या उद्भवण्याचा धोका अधिक असतो.

स्त्रीरोग तज्ज्ञ काय म्हणतात... "महिलांमध्ये गर्भायशाचे वाढलेले आजार ही एक मोठी समस्या बनली आहे. त्यामुळे महिलांनी अनियमित पाळी, रक्तस्त्राव आदी लक्षणे दिसून आल्यास लगेच स्त्रीरोग तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. यासोबतच शरीर स्वच्छतेकडे प्राधान्याने लक्ष द्यावे. सुदृढ आहार घ्यावा आणि नियमित व्यायाम करावा." - डॉ. स्मिता पावडे, स्त्रीरोगतज्ज्ञ, वर्धा.

टॅग्स :Healthआरोग्यLifestyleलाइफस्टाइलwardha-acवर्धा