शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
2
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
3
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
4
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
5
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
6
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
7
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
8
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
9
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
10
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
11
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
12
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
13
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
14
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
15
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
16
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
17
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
18
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
19
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
20
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?

विहिरींनी तळ गाठला

By admin | Updated: April 20, 2016 02:18 IST

शहरातील मास्टर कॉलनी क्रमांक १ व मास्टर कॉलनी क्रमांक २ तसेच नगराध्यक्षांचा वॉर्ड क्रमांक १३, गट नेता ...

नागरिकांची भटकंती : नळयोजना कुचकामीसमुद्रपूर : शहरातील मास्टर कॉलनी क्रमांक १ व मास्टर कॉलनी क्रमांक २ तसेच नगराध्यक्षांचा वॉर्ड क्रमांक १३, गट नेता मधुकर कामडी यांचा वॉर्ड क्रमांक ८ यासह वॉड क्रमांक १४, वॉर्ड क्रमांक १५ व वॉर्ड क्रमांक ३ या भागातील विहिरींनी तळ गाठला आहे. यामुळे नागरिकांची पाण्याकरिता फजिती होती आहे. यावर उपाययोजना आखण्याची मागणी आहे. गावात १९७२ मध्ये तत्कालीन सरपंच स्व. नथ्थूजी काकडे, ग्रामसेवक गजानन कळसकर यांनी गावात नळयोजना अस्तित्त्वात आणली. यावेळी गावाची लोकसंख्या २५०० होती. त्यावेळी ५००० लोकसंख्याचा आराखडा ठेवून ही योजना कार्यान्वित केली होती. आता ४४ वर्षांत समुद्रपूरची लोकसंख्या १२ हजारांवर पोहोचली आहे. येथील वॉर्ड क्र. ८, १३, १४, १५ मध्ये योजना पोहोचली नसल्याने नागरिकांनी विहिरी खोदल्या. या विहिरींचा आता वाढत्या तापमानामुळे पाझर कोरडा झाला आहे. असलेले पाणी गाळयुक्त असल्याने नागरिकांच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे.ले-आऊट मालकानी १० वर्षांपूर्वी ज्या विहिरी निर्माण केल्या होत्या त्याही कोरड्या झाल्या. त्यांची आशा आता शासनाकडे आहे. नगरसेविका कांबळे यांच्या स्वामी विवेकानंद कॉलनीतील सार्वजनिक विहिरीत बारस्कर यांच्या विहिरीतील पाणी नगर पंचायत प्रशासनाने पाईपद्वारे सोडले असल्याने तेथील नागरिकांची तात्पुरती व्यवस्था झाली आहे. यावर कायमस्वरूपी उपाययोजना आखण्याची गरज आहे. न.पं. प्रशासनाने पुढील १० वर्षांचा आरखडा घेवून किमान २५ हजार लोकसंख्येचा अंदाज घेत पाणी पुरवठा योजना आखण्याची गरज व्यक्त होत आहे.(ताुलका प्रतिनिधी)पाणी टंचाईकरिता नागरिकही जबाबदारसार्वजनिक विहिरीवर प्रत्येक घरमालकाने मोटारपंप लावून बेसुमार उपसा केला. यामुळे आज ही वेळ आल्याचे बोलले जात आहे. या परिसरातील पाणी टंचाईकरिता नागरिकच जबाबदार आहे. त्यांनी कधी पाण्याचे महत्त्व समजूनच घेतले नाही. यामुळे या भागात आता पाणी वाचविण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे.