शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

आम्ही तुम्हाला सहकार्य करतो, तुम्ही आमचे काम न करता चपराक हाणा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2021 05:00 IST

सभेला सुरुवात होताच मागील सभेत बांधकाम विभागातील निविदा शाखेतील भ्रष्टाचार करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांना निलंबित करा तसेच एकाच टेबलवर तीन वर्षापेक्षा अधिक काळापासून काम करणाऱ्यांचा टेबल बदलवा, असा ठराव घेण्यात आला. त्याची अंमलबजावणी न झाल्याने सदस्यांनी आक्षेप घेतला. यासोबतच कामांना प्रशासकीय मान्यता न दिल्याने कोट्यवधीचा निधी अखर्चित असून विकास कामांना खीळ बसल्याने सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनी  आक्रमक भूमिका घेऊन सभागृहातून बाहेर पडले.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मिनी मंत्रालयातील पदाधिकाऱ्यांना अधिकारी जुमानत नसल्याची खदखद बऱ्याच दिवसापासून सुरू होती. परंतु, दरवेळी त्यातून मार्ग काढत काम पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न होत होता. आता पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ संपायला मोजकेच दिवस राहिले असताना ‘आम्ही तुम्हाला सहकार्य करतो आणि तुम्ही आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करून चपराक हाणा’ असा रोष सदस्यांनी व्यक्त करीत सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनी एकत्र येत सभात्याग केला.जिल्हा परिषदेच्या सभागृहात जिल्हा परिषद अध्यक्ष सरिता गाखरे यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीची सभा आयोजित होती. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, उपाध्यक्ष वैशाली येरावार, सभापती माधव चंदनखेडे, विजय आगलावे, सरस्वती मडावी, मृणाल माटे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे व उपमुख्य कार्यकारी अधिकारी विपुल जाधव यांच्यासह सर्व सदस्य व विभागप्रमुख उपस्थित होते. सभेला सुरुवात होताच मागील सभेत बांधकाम विभागातील निविदा शाखेतील भ्रष्टाचार करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांना निलंबित करा तसेच एकाच टेबलवर तीन वर्षापेक्षा अधिक काळापासून काम करणाऱ्यांचा टेबल बदलवा, असा ठराव घेण्यात आला. त्याची अंमलबजावणी न झाल्याने सदस्यांनी आक्षेप घेतला. यासोबतच कामांना प्रशासकीय मान्यता न दिल्याने कोट्यवधीचा निधी अखर्चित असून विकास कामांना खीळ बसल्याने सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनी  आक्रमक भूमिका घेऊन सभागृहातून बाहेर पडले. त्यामुळे महिला सदस्य आणि अधिकारी सभागृहात तर पुरुष सदस्य मंडळी सभापतीच्या दालनात, असे चित्र निर्माण झाले होते. अखेर सभागृहातून बाहेर पडलेल्या सदस्यांना समजाविण्याकरिता सभापती, उपाध्यक्ष तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारीही सभापतीच्या दालनात गेले. अखेर सर्वांची अध्यक्षांच्या दालनात चर्चा होऊन ही सभा तहकूब करून पुन्हा सभा आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. 

प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे अनेक कामे प्रलंबित राहत आहेत. अधिकाऱ्यांना वारंवार सूचना करूनही कामाची पूर्तता केली जात नाही, असा आरोप करीत सदस्यांनी सभात्याग केला. त्यामुळे आजची स्थायी समितीची सभा तहकूब करण्यात आली आहे. येत्या २९ डिसेंबरला या सभेचे आयोजन होणार आहे.सरिता विजय गाखरे, अध्यक्ष, जि.प.वर्धा 

दीड महिनाच, कशी करणार कामे? 

जिल्हा परिषदेत मनमानी कारभार सुरू आहे. अध्यक्ष व उपाध्यक्ष आपल्याच कामांना प्रशासकीय मान्यता मिळवून घेत आहेत. इतर सदस्यांच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळत नाही. अधिकाऱ्यांना सूचना करूनही ते दुर्लक्ष करतात. आता दीड महिन्याचा कालावधी राहिला असून प्रशासकीय मान्यताच मिळाली नाही तर कामे कशी करावी? त्यामुळे भाजपा आणि काँग्रेसच्याही सदस्यांनी सभात्याग केला.संजय शिंदे, गटनेता, काँग्रेस 

लोकप्रतिनिधीने कधीच भीक घालू नये

बांधकाम विभागातील दोन कर्मचाऱ्यांच्या निलंबनाचा ठराव घेण्यात आला होता. पण, अद्यापही अधिकाऱ्यांनी त्यावर कोणतीही कार्यवाही केली नाही. यामुळे आम्ही सभात्याग केला असून सोमवारपर्यंत वेळ दिला आहे. येथील अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे कोट्यवधींचा निधी अखर्चित आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधीने प्रशासनाला भीक घालू नये.राणा रणनवरे, सदस्य, जि.प.वर्धा 

म्हणून केला सभात्याग

जिल्हा परिषदेच्या सभागृहात झालेल्या ठरावाची अंमलबजावणी करणे हे अधिकाऱ्यांचे काम आहे. परंतु गेल्या काही दिवसांपासून अधिकारी पदाधिकाऱ्यांच्या सूचनांकडे कानाडोळा करीत आहेत. त्यामुळे बरीच कामे प्रलंबित असून कर्मचारीही मनमर्जी वागायला लागले. ही बाब सभागृहाच्या दृष्टीने योग्य नसल्याने आम्हांला सत्तेत असूनही सभात्यागाचे पाऊल उचलावे लागले.नितीन मडावी, गटनेता, भाजप 

 

टॅग्स :zpजिल्हा परिषद