लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: जिल्ह्यात पोलिस विभागात कार्यरत असलेल्या पोलिस शिपायांपासून तर सहायक पोलिस उपनिरीक्षकांपर्यंतची सर्वसाधारण आणि विनंती बदली प्रक्रिया पार पडली. जिल्हा पोलिस अधीक्षक अनुराग जैन यांनी घेतलेल्या आस्थापना मंडळाच्या बैठकीत एकमताने ही बदली प्रक्रिया राबविण्यात आली. या बदली प्रक्रियेमध्ये शिपाई ते सहायक पोलिस उपनिरीक्षकांपर्यंत तब्बल १९४ कर्मचाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्या करण्यात आल्या. तर तब्बल २४२ कर्मचाऱ्यांनी विनंती बदलीकरिता अर्ज दाखल केले होते; परंतु त्यांची कारणे आणि इतर सर्व बाबींची चौकशी करून निम्म्यापेक्षा अधिक कर्मचाऱ्यांची विनंती अमान्य करण्यात आली.
तीन दिवसांच्या आत कार्यमुक्त करासर्वसाधारण बदली झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांच्या पोलिस ठाण्यातून किंवा शाखेतून नवीन नेमणुकीच्या ठिकाणी हजर होण्यासाठी तीन दिवसांच्या आत कार्यमुक्त करावे. त्याचा अहवाल कार्यालयास तत्काळ सादर करावा. तसेच पोलिस स्टेशन प्रभारी अधिकारी / शाखा प्रमुख यांनी बदली झालेल्या पोलिस अंमलदार यांना कार्यमुक्त करण्यापूर्वी त्यांच्याकडील गुन्हे तपास, अर्ज चौकशी, अकस्मात मृत्यू चौकशी, तसेच इतर प्रलंबित प्रकरणे व अन्य चार्ज उर्वरित पोलिस अंमलदाराकडे तत्काळ हस्तांतरित करून कार्यमुक्त करावे. जर कोणी अंमलदार उपलब्ध नसल्यास अन्य प्रभारी अधिकारी यांनी स्वतःचे ताब्यात घ्यावीत, तसेच यासंबंधिचा सविस्तर अहवाल कार्यालयास सादर करावा, असे निर्देश पोलिस अधीक्षक अनुराग जैन यांनी दिलेत.
असा आहे पोलिसांच्या बदल्यांचा तपशीलपद सर्वसाधारण विनंती मान्य अमान्यसहा. उपनिरीक्षक २९ १० १८पोलिस हवालदार ४९ ३० ५१पोलिस नाईक २५ १० १८पोलिस शिपाई ९१ ४० ७२