शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
2
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
3
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
4
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
5
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
6
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
7
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
8
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
9
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
10
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
11
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
12
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
13
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
14
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
15
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
16
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
17
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
18
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
19
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
20
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!

वर्ध्यात पाणीबाणी; उसनवारीवर भागवितात तहान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2019 10:43 PM

शहराच्या सभोवताल ग्रामीण भागाची सीमा असून शहरातील आणि ग्रामीण भागातील पाणीपुरवठ्याची वेळ वेगवेगळी आहे. त्यामुळे सीमेवर राहणारे नागरिक शहरीभागातील नळ आले तर तेथून पाणी घेतात आणि ग्रामीण भागातील नळ आले, तर शहरी भागातील नागरिक त्यांच्याकडून पाणी घेत आहे.

ठळक मुद्देआता हातपंपच ठरताहेत आधार : पाच दिवसांआड पाणीपुरवठा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहराच्या सभोवताल ग्रामीण भागाची सीमा असून शहरातील आणि ग्रामीण भागातील पाणीपुरवठ्याची वेळ वेगवेगळी आहे. त्यामुळे सीमेवर राहणारे नागरिक शहरीभागातील नळ आले तर तेथून पाणी घेतात आणि ग्रामीण भागातील नळ आले, तर शहरी भागातील नागरिक त्यांच्याकडून पाणी घेत आहे. अशा प्रकारे पाण्याच्या उसणवारीवर वर्धेकर सध्या तहान भागविताना दिसून येत आहेत.मार्च महिना उलटताच पाणीटंचाईच्या झळा तीव्र होत आहे. वर्धा शहरासह लगतच्या तेरा गावांना धामनदीतून येळाकेळी आणि पवनार या ठिकाणाहून पाणीपुरवठा केला जातो. अर्ध्या शहराला पवनार तर अर्ध्या शहराला येळाकेळी येथून नगरपालिकेमार्फत पाणीपुरवठा होतो. तसेच लगतच्या तेरा गावांना येळाकेळी येथूनच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाद्वारे पाणीपुरवठा होतो. सर्वाधिक पाण्याची उचल ही येळाकेळी येथूनच केली जाते. अल्प पर्जन्यमानामुळे धामनदीपात्रातच ठणठणाट असल्याने पाटबंधारे विभागाद्वारे महिन्यातून एकदाच पाणी सोडले जात आहे. ते पाणी पवनार व येळाकेळीपर्यंत पोहोचण्याकरिता एक दिवसाचा कालावधी लागतो. हे पाणी शहरासह तेरा गावांना महिनाभर पुरवायचे असल्यामुळे शहरात पाच ते सहा दिवसांआड पाणीपुरवठा केला जातो.लगतच्या गावांमध्ये तर पंधरा दिवसांआड पाणीपुरवठा करण्यात येत होता. सध्या पाच दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. अशा स्थितीत शहरासह लगतच्या गावातही पाणीबाणी निर्माण झाली असून ही तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे. या दिवसात पाण्याअभावी नागरिकांची दाहीदिशा भटकंती सुरू असून सध्या हातपंपाचा आधार मिळत आहे. परंतु, दिवसभर हातपंपावर घालविणे शक्यता नसल्याने शहरासह लगतच्या गावातील नागरिकांनी आता पाण्याकरिता ‘एकमेका सहाय्य करू’ अशी भूमिका घेतली आहे.अशी चालतेय देवाण-घेवाणवर्धा शहरालगतच्या पिपरी (मेघे), कारला, साटोडा, आलोडी, नालवाडी, मसाळा, वरुड, सिंदी (मेघे), बोरगाव (मेघे), सावंगी (मेघे), वायगाव, दत्तपूर व सालोड (हि.) या गावांना जीवन प्राधिकरणाद्वारे पाणी पुरवठा होतो; तर वर्धा शहरात नगरपालिकेद्वारे पाणीपुरवठा केला जातो. वर्धा शहरालगत प्रामुख्याने पिपरी (मेघे), कारला, साटोडा, आलोडी, नालवाडी, सिंदी (मेघे) ही गावे आहेत. त्यामुळे सीमेवरील काही नागरिकांनी आपल्या घरातील पाणी साठविण्याचे साहित्य सीमेच्या अल्याडपल्याड नेऊन ठेवले आहे. शहरीभागातील नळ आले की, ग्रामीण भागातील नागरिक पाणी नेतात तसेच ग्रामीण भागातील नळ आले तर शहरी भागातील नागरिक पाणी घेतात. अशा प्रकारे पाण्याची देवाण-घेवाण करून तहान भागविण्याचा खटाटोप सुरू आहे.नागरिकांच्या खिशालाही झळाउन्हाळ्याची चाहूल लागताच पाणीटंचाई सुरू झाल्याने बहुतांश नागरिकांनी नळयोजनेवर अवलंबून न राहता भूगर्भ पोखरून बोअरवेल करण्यावर भर दिला. तसेच काहींना पाण्याची साठवणूक करण्याकरिता प्लास्टिकचे ड्रम किंवा इतर भांडी घेण्यासाठी खिसा खाली करावा लागला. शहरासह लगतच्या ग्रामीण भागात सध्या अशुद्ध पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांनी पिण्याकरिता मिनरल वॉटरचा वापर सुरू केला आहे. त्यामुळे पाण्याकरिता नागरिकांच्या खिशालाही झळ सोसावी लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई