शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs WI: भारताचा कसोटी संघ जाहीर! पडीक्कलला संधी; श्रेयस अय्यर, करूण नायरला वगळले
2
पंतप्रधान मोदी आणि नेतन्याहू यांच्या मैत्रीवरून सोनिया गांधींनी उपस्थित केला सवाल, म्हणाल्या...
3
कोळशांच्या खाणीतून काय बाहेर पडले? भारतीय शास्त्रज्ञही चकीत झाले...! युरेनियमचा अजस्त्र साठा सापडला
4
डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार हवा, पण अर्धी अमेरिकाच नाखूश! सर्वेक्षणात झाला धक्कादायक खुलासा 
5
IND vs PAK: 'इतका राग होता तर खेळलाच कशाला?' हस्तांदोलन न करण्यावर शशी थरूर संतापले!
6
शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना योग्य भाव का मिळत नाही? नितीन गडकरी यांनी कारण सांगितले
7
वाढीव मदतीचा प्रस्ताव कॅबिनेटसमोर मांडू; मंत्री मकरंद पाटील यांचे शेतकऱ्यांना आश्वासन
8
भाजपाच्या अध्यक्षपदासाठी नाव आघाडीवर, कशी असेल पुढची वाटचाल? फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
9
भगवा कुर्ता, कपाळी भस्म; संजय दत्तने घेतलं महाकालेश्वरचं दर्शन, भक्तीत तल्लीन झाला अभिनेता
10
'रशियाचे लष्कर कागदी वाघासारखेच'; डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना डिवचले, रशियानेही केला पलटवार
11
कारगिल युद्धावेळीही आपण पाकिस्तानसोबत..., हस्तांदोलन वादावरून शशी थरूर यांनी दिला टीम इंडियाला सल्ला
12
Pune Crime: विजयने ११व्या मजल्यावरून मारली उडी, ससून रुग्णालयातील धक्कादायक घटना
13
अखेर बीएसएनएल नेटवर्क बदलणार, देशभरात या तारखेला 4G सेवा सुरु करण्याची घोषणा
14
महाराष्ट्रातल्या मनगटात इतका दम आहे म्हणून.., प्रणित मोरेची खिल्ली उडवणाऱ्यांवर भडकला डीपी
15
"मला स्वातंत्र्य हवंय"; बॉयफ्रेंडच्या मदतीने बायकोने काढला नवऱ्याचा काटा, लोकेशन सांगितलं अन्...
16
TATA Motors ला ₹२,३८,६१,६६,००,००० चं मोठं नुकसान! JLR वर सायबर हल्ला; उत्पादन थांबलं, शेअर्समध्ये मोठी घसरण
17
हृदयद्रावक! नवरात्रीत मोठी दुर्घटना; देवीच्या मंडपात अचानक पसरला करंट; २ मुलांचा मृत्यू
18
मूलबाळ नसलेल्या हिंदू महिलेच्या मृत्यूनंतर तिची संपत्ती कुणाला मिळणार?; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
19
३०० पानांमध्ये लिहिलेत बाबाचे काळे कारनामे; इंस्टिट्यूटमध्ये होता टॉर्चर चेंबर! दिल्लीत खळबळ
20
GST मध्ये आणखी कपातीचे पंतप्रधान मोदींचे संकेत; म्हणाले, "आम्ही इकडेच थांबवणार नाही..."

फुटलेल्या जलवाहिनीतून पाण्याचा अपव्यय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 21:47 IST

शहरालगतच्या १३ ग्रामपंचायतीला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाव्दारे पाणीपुरवठा केल्या जातो. त्यात शहरालगतच्या साटोडा-आलोडी ग्रामपंचायतचाही समावेश असून या परिसरातील जलवाहिनी तीन दिवसापासून फुटली आहे. त्यातून लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत असताना जीवन प्राधिकरण किंवा ग्रामपंचायत प्रशासनाने अद्यापही लक्ष दिले नाही.

ठळक मुद्देआलोडीतील प्रकार । पंधरा दिवसापासून नागरिक मात्र तहानलेले

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरालगतच्या १३ ग्रामपंचायतीला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाव्दारे पाणीपुरवठा केल्या जातो. त्यात शहरालगतच्या साटोडा-आलोडी ग्रामपंचायतचाही समावेश असून या परिसरातील जलवाहिनी तीन दिवसापासून फुटली आहे. त्यातून लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत असताना जीवन प्राधिकरण किंवा ग्रामपंचायत प्रशासनाने अद्यापही लक्ष दिले नाही.जिल्ह्यात सर्वत्रच पाणी टंचाईच्या झळा सहन कराव्या लागत आहे. शहरात पाचव्या दिवशी तर लगतच्या ग्रामपंचायत परिसरात पाच ते आठ दिवसादरम्यान पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे नगरपालिका, ग्रामपंचायत व जिल्हा प्रशासनातर्फे नागरिकांना पाणीबचतीचे आवाहन केले जात आहे. असे असतानाही यंत्रणेच्या दुर्लक्षितपणामुळेच वारंवार फुटणाऱ्या जलवाहिनीतून पाण्याचा अपव्यय होत आहे. शहरालगतच्या साटोडा ग्रामपंचायतच्या हद्दीतील आलोडी परिसरातील वॉर्ड क्रमांक ४ मध्ये पंधरादिवसापासून पाणीपुरवठा झाला नसल्याने पाण्याकरिता हाहाकार आहे.पाण्यासाठी नागरिक दहादिशा भटकत असतानाच याच परिसरातील पाणीपुरवठ्याची जलवाहिनी मागील तीन दिवसापासून फुटलेली आहे. त्यातून दररोज लाखो लिटर पाणी वाहत असून मोठे डबके साचले आहे. याबाबत नागरिकांनी ग्रामपंचायतीला कळविले असता अद्यापही दुरुस्ती केली नाही. तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचेही लक्ष गेले नाही. शनिवार आणि रविवार दोन दिवस शासकीय सुटी असल्याने या दिवशी पाण्याचा उपव्यय कायमच राहणार असल्याचे चित्र आहे. एकीकडे नागरिकांच्या घशाला कोरड पडली असताना दुसरीकडे यंत्रणेच्या दुर्लक्षामुळे पाणी वाया जात असल्याने तीव्र रोष व्यक्त होत आहे.पूर्वीच पाणीटंचाईपूर्वीच या भागातील नागरिकांना भीषण जलसंकटाला सामोरे जावे लागत आहे. अशातच जलवाहिनी फुटून स्वच्छ पाण्याचा अपव्यय होत असल्याने सुजान नागरिकांकडून कार्यवाहीची जबाबदारी असलेल्यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित केले जात आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई