शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

फुटलेल्या जलवाहिनीतून पाण्याचा अपव्यय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 21:47 IST

शहरालगतच्या १३ ग्रामपंचायतीला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाव्दारे पाणीपुरवठा केल्या जातो. त्यात शहरालगतच्या साटोडा-आलोडी ग्रामपंचायतचाही समावेश असून या परिसरातील जलवाहिनी तीन दिवसापासून फुटली आहे. त्यातून लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत असताना जीवन प्राधिकरण किंवा ग्रामपंचायत प्रशासनाने अद्यापही लक्ष दिले नाही.

ठळक मुद्देआलोडीतील प्रकार । पंधरा दिवसापासून नागरिक मात्र तहानलेले

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरालगतच्या १३ ग्रामपंचायतीला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाव्दारे पाणीपुरवठा केल्या जातो. त्यात शहरालगतच्या साटोडा-आलोडी ग्रामपंचायतचाही समावेश असून या परिसरातील जलवाहिनी तीन दिवसापासून फुटली आहे. त्यातून लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत असताना जीवन प्राधिकरण किंवा ग्रामपंचायत प्रशासनाने अद्यापही लक्ष दिले नाही.जिल्ह्यात सर्वत्रच पाणी टंचाईच्या झळा सहन कराव्या लागत आहे. शहरात पाचव्या दिवशी तर लगतच्या ग्रामपंचायत परिसरात पाच ते आठ दिवसादरम्यान पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे नगरपालिका, ग्रामपंचायत व जिल्हा प्रशासनातर्फे नागरिकांना पाणीबचतीचे आवाहन केले जात आहे. असे असतानाही यंत्रणेच्या दुर्लक्षितपणामुळेच वारंवार फुटणाऱ्या जलवाहिनीतून पाण्याचा अपव्यय होत आहे. शहरालगतच्या साटोडा ग्रामपंचायतच्या हद्दीतील आलोडी परिसरातील वॉर्ड क्रमांक ४ मध्ये पंधरादिवसापासून पाणीपुरवठा झाला नसल्याने पाण्याकरिता हाहाकार आहे.पाण्यासाठी नागरिक दहादिशा भटकत असतानाच याच परिसरातील पाणीपुरवठ्याची जलवाहिनी मागील तीन दिवसापासून फुटलेली आहे. त्यातून दररोज लाखो लिटर पाणी वाहत असून मोठे डबके साचले आहे. याबाबत नागरिकांनी ग्रामपंचायतीला कळविले असता अद्यापही दुरुस्ती केली नाही. तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचेही लक्ष गेले नाही. शनिवार आणि रविवार दोन दिवस शासकीय सुटी असल्याने या दिवशी पाण्याचा उपव्यय कायमच राहणार असल्याचे चित्र आहे. एकीकडे नागरिकांच्या घशाला कोरड पडली असताना दुसरीकडे यंत्रणेच्या दुर्लक्षामुळे पाणी वाया जात असल्याने तीव्र रोष व्यक्त होत आहे.पूर्वीच पाणीटंचाईपूर्वीच या भागातील नागरिकांना भीषण जलसंकटाला सामोरे जावे लागत आहे. अशातच जलवाहिनी फुटून स्वच्छ पाण्याचा अपव्यय होत असल्याने सुजान नागरिकांकडून कार्यवाहीची जबाबदारी असलेल्यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित केले जात आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई