शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

पाणीपुरवठा होणार ठप्प? ; महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आलेय आर्थिक अडचणीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 16:31 IST

Wardha : नागरिकांनी थकविली जवळपास २९ कोटींची पाणीपट्टी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरालगतच्या पिपरी (मेघे) गावांसह इतर १३ गावांतील नागरिकांना शुद्ध आणि मुबलक पाणी देण्याचे काम प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतून केले जात आहे. या योजनेच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडे आहे.

या योजनेला आता दोन दशकाचा कालावधी झाला असून, ही योजना पुनर्जीवित करणे आवश्यक आहे. परंतु, या कालावधीत ग्राहकांनी तब्बल २९ कोटींचा पाणीकर थकविल्याने ही योजना आता आर्थिक अडचणीत सापडली आहे. त्यामुळे या १४ ही गावांतील पाणीपुरवठा ठप्प होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वर्धा शहरालगतच्या पिपरी (मेघे), कारला, सावंगी (मेघे), सिंदी (मेघे), बोरगाव (मेघे), उमरी (मेघे), साटोडा, आलोडी, दत्तपूर, नालवाडी, म्हसाळा, वरुड, वायगाव (निपाणी) व या गावांना पिपरी (मेघे) येथील प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतून पाणीपुरवठा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणद्वारे केला जातो.

सद्यःस्थितीत या सर्व गावांमध्ये जवळपास २५ हजार नळजोडण्या असून, त्याद्वारे नियमित पाणीपुरवठा केला जातो. परंतु, बहुतांश ग्राहकांनी अनेक वर्षापासून पाणीपट्टीच भरलेली नाही. परिणामी २९ कोटींचा कर थकला आहे. वारंवार सूचना देऊनही ग्राहकांकडून पाणीपट्टी भरली जात नसल्याने योजना चालवायची कशी ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

१४ गावे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या पाण्यावर अवलंबूनवर्धा शहरालगतच्या १४ मोठ्या गावांना जीवन प्राधिकरणव्दारे पाणीपुरवठा केला जातो. पण, त्यांनी पाणीपट्टी थकविल्याने आर्थिक कोंडी झाली आहे.

ऑनलाइन पाणीपट्टी भरण्याचीही सुविधापिपरी (मेघे) व सावंगी (मेघे) यासह महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या कार्यालयात येऊन पाणीपट्टी भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली होती. तेव्हा ग्राहक नियमित भरणा करीत होते. परंतु, काही दिवसांपासून नागरिकांनी पाणीपट्टी भरण्याकडे पाठ फिरविली आहे. त्यामुळे प्राधिकरणकडून ग्राहकांना पाणीपट्टी भरण्यासाठी ऑनलाइन सुविधाही उपलब्ध करून दिली आहे. देयकावरील क्यूआर कोड स्कॅन करूनही किंवा आरटीजीएसच्या माध्यमातूनही रक्कम अदा करू शकतो.

जलजीवन मिशनने अडचणीत भरजिल्ह्यात जलजीवन मिशन योजनेतून हर घर नल से जल देण्याचे काम सुरू आहे. परंतु, रामभरोसे कामकाज असल्याने अनेक गावांमध्ये जलवाहिनी टाकण्यात आली; परंतु एक ते दीड वर्षापासून नळजोडणीच झाली नाही. असाच काहीसा प्रकार शहरालगतच्या १४ गावांत असून, बहुतांश नळजोडण्यांची महाराष्ट्र जीवन प्राधिकरणला नोंदच नाही. परिणामी आधीच अडचणीत असलेल्या प्राधिकरणाला आणखी अडचणीत टाकले आहे. सध्या जलजीवन मिशन अंतर्गतही साडेपाच कोटींची जिल्हा परिषदेकडे थकबाकी आहे.

कुठे किती नळजोडण्या, किती थकबाकीगाव                      नळजोडणी                   थकबाकीपिपरी (मेघे)              ५४१६                       ४,९९,१७,३८९सिंदी (मेघे)                ३२२०                        ३,३५,५०,२५६बोरगाव (मेघे)            २४७०                       ३,७९,३७,३४७सावंगी (मेघे)              १६७०                       २,४६,८३,४८४साटोडा                    १४०७                        १,६३,४९,५३८आलोडी                    ५१३                          २५,२३,१४०म्हसाळा                    १४६९                        ६७,१९,१०२चितोडा                       ३२                          १,३९,७४१वरुड                         ६११                          ३८,३६,८१२नालवाडी                   २२३३                        १,९३,४७,८६१उमरी (मेघे)                 २३२                         २,१६,८७९वायंगाव (निपाणी)        १०१२                        ६,५२,४९,११५सेलू (काटे)                  ०३                           १,०३,४६३

"ग्राहकांकडे जवळपास २९ कोटींची थकबाकी आहे. वसुलीकरिता भरारी पथक तयार केले आहे. पथकाने दोन महिन्यांत १७ लाख वसूल केले असून, मार्चअखेरपर्यंत पाच कोटीचे उद्दिष्ट आहेत. नागरिकांकडून कराचा नियमित भरणा होणे अपेक्षित आहे, अन्यथा नळ जोडण्या तोडण्याचीही कार्यवाही करावी लागेल." - दीपक धोटे, उपविभागीय अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, वर्धा

टॅग्स :wardha-acवर्धा