शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

पाणीपुरवठा होणार ठप्प? ; महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आलेय आर्थिक अडचणीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 16:31 IST

Wardha : नागरिकांनी थकविली जवळपास २९ कोटींची पाणीपट्टी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरालगतच्या पिपरी (मेघे) गावांसह इतर १३ गावांतील नागरिकांना शुद्ध आणि मुबलक पाणी देण्याचे काम प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतून केले जात आहे. या योजनेच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडे आहे.

या योजनेला आता दोन दशकाचा कालावधी झाला असून, ही योजना पुनर्जीवित करणे आवश्यक आहे. परंतु, या कालावधीत ग्राहकांनी तब्बल २९ कोटींचा पाणीकर थकविल्याने ही योजना आता आर्थिक अडचणीत सापडली आहे. त्यामुळे या १४ ही गावांतील पाणीपुरवठा ठप्प होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वर्धा शहरालगतच्या पिपरी (मेघे), कारला, सावंगी (मेघे), सिंदी (मेघे), बोरगाव (मेघे), उमरी (मेघे), साटोडा, आलोडी, दत्तपूर, नालवाडी, म्हसाळा, वरुड, वायगाव (निपाणी) व या गावांना पिपरी (मेघे) येथील प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतून पाणीपुरवठा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणद्वारे केला जातो.

सद्यःस्थितीत या सर्व गावांमध्ये जवळपास २५ हजार नळजोडण्या असून, त्याद्वारे नियमित पाणीपुरवठा केला जातो. परंतु, बहुतांश ग्राहकांनी अनेक वर्षापासून पाणीपट्टीच भरलेली नाही. परिणामी २९ कोटींचा कर थकला आहे. वारंवार सूचना देऊनही ग्राहकांकडून पाणीपट्टी भरली जात नसल्याने योजना चालवायची कशी ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

१४ गावे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या पाण्यावर अवलंबूनवर्धा शहरालगतच्या १४ मोठ्या गावांना जीवन प्राधिकरणव्दारे पाणीपुरवठा केला जातो. पण, त्यांनी पाणीपट्टी थकविल्याने आर्थिक कोंडी झाली आहे.

ऑनलाइन पाणीपट्टी भरण्याचीही सुविधापिपरी (मेघे) व सावंगी (मेघे) यासह महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या कार्यालयात येऊन पाणीपट्टी भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली होती. तेव्हा ग्राहक नियमित भरणा करीत होते. परंतु, काही दिवसांपासून नागरिकांनी पाणीपट्टी भरण्याकडे पाठ फिरविली आहे. त्यामुळे प्राधिकरणकडून ग्राहकांना पाणीपट्टी भरण्यासाठी ऑनलाइन सुविधाही उपलब्ध करून दिली आहे. देयकावरील क्यूआर कोड स्कॅन करूनही किंवा आरटीजीएसच्या माध्यमातूनही रक्कम अदा करू शकतो.

जलजीवन मिशनने अडचणीत भरजिल्ह्यात जलजीवन मिशन योजनेतून हर घर नल से जल देण्याचे काम सुरू आहे. परंतु, रामभरोसे कामकाज असल्याने अनेक गावांमध्ये जलवाहिनी टाकण्यात आली; परंतु एक ते दीड वर्षापासून नळजोडणीच झाली नाही. असाच काहीसा प्रकार शहरालगतच्या १४ गावांत असून, बहुतांश नळजोडण्यांची महाराष्ट्र जीवन प्राधिकरणला नोंदच नाही. परिणामी आधीच अडचणीत असलेल्या प्राधिकरणाला आणखी अडचणीत टाकले आहे. सध्या जलजीवन मिशन अंतर्गतही साडेपाच कोटींची जिल्हा परिषदेकडे थकबाकी आहे.

कुठे किती नळजोडण्या, किती थकबाकीगाव                      नळजोडणी                   थकबाकीपिपरी (मेघे)              ५४१६                       ४,९९,१७,३८९सिंदी (मेघे)                ३२२०                        ३,३५,५०,२५६बोरगाव (मेघे)            २४७०                       ३,७९,३७,३४७सावंगी (मेघे)              १६७०                       २,४६,८३,४८४साटोडा                    १४०७                        १,६३,४९,५३८आलोडी                    ५१३                          २५,२३,१४०म्हसाळा                    १४६९                        ६७,१९,१०२चितोडा                       ३२                          १,३९,७४१वरुड                         ६११                          ३८,३६,८१२नालवाडी                   २२३३                        १,९३,४७,८६१उमरी (मेघे)                 २३२                         २,१६,८७९वायंगाव (निपाणी)        १०१२                        ६,५२,४९,११५सेलू (काटे)                  ०३                           १,०३,४६३

"ग्राहकांकडे जवळपास २९ कोटींची थकबाकी आहे. वसुलीकरिता भरारी पथक तयार केले आहे. पथकाने दोन महिन्यांत १७ लाख वसूल केले असून, मार्चअखेरपर्यंत पाच कोटीचे उद्दिष्ट आहेत. नागरिकांकडून कराचा नियमित भरणा होणे अपेक्षित आहे, अन्यथा नळ जोडण्या तोडण्याचीही कार्यवाही करावी लागेल." - दीपक धोटे, उपविभागीय अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, वर्धा

टॅग्स :wardha-acवर्धा