शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
4
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
5
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
6
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
7
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
8
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
9
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
10
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
11
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
12
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
13
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
14
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
15
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
16
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
17
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
18
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
19
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
20
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."

पाणी पुरवठा योजना जीवन प्राधिकरणकडे सोपवा

By admin | Updated: March 21, 2015 02:09 IST

स्थानिक नगर पालिकेचा पाणी पुरवठा विभाग अत्यंत कमकुवत आहे़ शिवाय नगर परिषदेला तोट्यात आणणारा व शहरातील नागरिकांना ...

वर्धा : स्थानिक नगर पालिकेचा पाणी पुरवठा विभाग अत्यंत कमकुवत आहे़ शिवाय नगर परिषदेला तोट्यात आणणारा व शहरातील नागरिकांना मनस्ताप देणारा ठरत आहे़ यामुळे सदर पाणी पुरवठा योजना जीवन प्राधिकरण विभागाला हस्तांतरित करण्यात यावा, अशी मागणी नागरिकांद्वारे करण्यात येत आहे़ याबाबत जिल्हाधिकारी, खासदार आणि नगर परिषदेलाही निवेदन सादर करण्यात आले़ येळाकेळी, पवनार व हनुमान टेकडी या तीनही ठिकाणावरून वर्धा शहरातील नागरिकांना पाणीपुरवठा होतो़ त्याचे महिन्याचे बिल १६ लाख रुपये वर्धा नगर परिषदेला भरावे लागत आहे़ बरेचदा येणारे प्रचंड बिल भरण्याकरिता नगर परिषद सक्षम नसते. यामुळे पाणी पुरवठा योजनेचा वीज पुरवठा खंडित केला जातो व नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतो़ नगर पालिकेत पाणी पुरवठा विभागात तांत्रिक कर्मचारी नाहीत़ १९६९ पासून पवनारच्या पंपिंग मशीन झीजल्या आहेत़ दररोज १८ तासांचे काम असते, एका वेळी दोन मशीनचे काम असते तसेच केबल वायरिंग वडली आहे़ पाणी शुद्धीकरणाकरिता क्लोरीन टाकले जाते़ ते संपले तर ब्लिचींग वा तुरटी टाकली जाते़ येळाकेळी येथे १८ एमएलडी असून एक्सप्रेस फिल्टर नाही. मेकॅनिकल इंजिनिअर नाही़ शिप्ट इंजिनिअर नाही़ वाटर सप्लायमध्ये कुली नाही. प्लंबर नाही, वॉलमॅन कमी आहेत. नगर परिषदेमध्ये १९९७ ते २०१५ पर्यंतच्या आस्थापना विभागाकडे चौकशी केल्यास कर्मचाऱ्यांचा तुटवडा जाणवतो़ नागरिकांना पाणी पुरवठा नगर परिषदेमार्फत एक दिवस आड होतो; पण पाण्याचे बिल पूर्ण एक वर्षाचे आकारले जाते़ पूर्वी पाणी बील ९०० रुपये होते ते आज १५०० रुपये झाले आहे़ पाईपलाईन फार जुन्या असून नालीमध्ये आहे़ सदर पाईप सडले असून अनेकदा दूषित पाण्याचा पुरवठा होतो़यामुळे पालिकेकडून पाणी पुरवठा योजना काढून जीवन प्राधिकरणकडे हस्तांतरित करावी आणि नागरिकांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करावा, अशी मागणी अखिल भारतीय बापू युवा संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे़ याबाबत खा़ रामदास तडस यांनाही निवेदन देण्यात आले़(कार्यालय प्रतिनिधी)