शहरं
Join us  
Trending Stories
1
तुर्कीनं फक्त मैत्रीसाठी केली नाही भारताविरोधात पाकिस्तानची मदत; खरा हेतू तर भलताच...
2
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सुप्रीम कोर्टाला विचारले १४ प्रश्न; नेमकं काय घडलं?
3
लष्करी जवानाकडे हेरॉईन सापडले; श्रीनगरहून पंजाबला करत होता तस्करी, अटकेमुळे खळबळ
4
हृदयद्रावक! डोक्यावरती अक्षता पडल्या अन् दुसऱ्याच दिवशी सकाळी नववधूला मृत्यूने गाठलं
5
पाकिस्तानी गर्लफ्रेंडला भेटणं भारतीय बॉयफ्रेंडच्या अंगाशी आलं! तुरुंगात कैद होऊन आता म्हणतोय...
6
शिखर धवनची कर्नल सोफिया कुरेशी यांच्यासाठी खास पोस्ट, म्हणाला- 'भारतीय मुस्लिमांना...'
7
तुम्ही भारतातूनही ऑनलाइन स्विस बँकेत खाते उघडू शकता; कशी असते प्रक्रिया? कोणते कागदपत्रे हवीत?
8
"आंबेडकर मालिकेच्या वेळेस साताऱ्यातून एक माणूस भेटायला आला अन्.." अभिनेत्याने सांगितला अंगावर काटा आणणारा किस्सा
9
Maharashtra Politics :'फडणवीसांनी डोनाल्ड ट्रम्प यांनाच कुलदैवत मानावं', संजय राऊतांची भाजपावर टीका
10
Mumbai: मेट्रो-३ च्या प्रवासात मोबाइलला 'नो नेटवर्क', प्रवाशांची उडते तारांबळ, तिकीट काढण्यासाठी मार्गदर्शक सूचना...
11
वेळ काय, तुम्ही बोलता काय...; कर्नल सोफिया यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या विजय शाहंना कोर्टाने फटकारलं
12
४० हजारांचं पॅकेज, ५ तासांची सर्जरी... हेअर ट्रान्सप्लांट करणाऱ्या अनुष्काबद्दल धक्कादायक खुलासे
13
तुर्कीच्या सफरचंदावर घातलेली बंदी पाकिस्तानींना झोंबली; पुण्याच्या सुयोग झेंडेंना धमक्यांचे फोनवर फोन
14
हेअर ट्रांसप्लांटमुळे दोघांचा मृत्यू; ही सर्जरी खरंच सुरक्षित आहे का? जाणून घ्या सविस्तर माहिती...
15
दोन्ही मुलांना मैदानात उतरवलं, भारताचंही नाव घेतलं! इम्रान खानच्या खेळीनं पाकच्या राजकारणात खळबळ  
16
रोहित शर्मा 'भलतेच काहीतरी' वाटावे असे बोलून गेला, मग लगेच असं दिलं स्पष्टीकरण (VIDEO)
17
ट्रम्प यांचं टॅरिफ लागून अवघा काही वेळही झाला नाही आणि भरला सरकारचा खजिना, कुठून आला पैसा?
18
जर एखाद्या देशाने 'Nuclear' हल्ल्याचा निर्णय घेतला तर त्याची प्रक्रिया काय, वेळ किती लागतो? 
19
कोंकणा सेन शर्मा घटस्फोटानंतर पुन्हा प्रेमात? ७ वर्ष लहान अभिनेत्याला डेट करत असल्याच्या चर्चा
20
Datta Upasana: जगातील एकमेव दत्तहस्त पूजास्थान; जिथे दत्त महाराजांच्या हाताचे छाप उमटले!

पाणी पुरवठा योजना जीवन प्राधिकरणकडे सोपवा

By admin | Updated: March 21, 2015 02:09 IST

स्थानिक नगर पालिकेचा पाणी पुरवठा विभाग अत्यंत कमकुवत आहे़ शिवाय नगर परिषदेला तोट्यात आणणारा व शहरातील नागरिकांना ...

वर्धा : स्थानिक नगर पालिकेचा पाणी पुरवठा विभाग अत्यंत कमकुवत आहे़ शिवाय नगर परिषदेला तोट्यात आणणारा व शहरातील नागरिकांना मनस्ताप देणारा ठरत आहे़ यामुळे सदर पाणी पुरवठा योजना जीवन प्राधिकरण विभागाला हस्तांतरित करण्यात यावा, अशी मागणी नागरिकांद्वारे करण्यात येत आहे़ याबाबत जिल्हाधिकारी, खासदार आणि नगर परिषदेलाही निवेदन सादर करण्यात आले़ येळाकेळी, पवनार व हनुमान टेकडी या तीनही ठिकाणावरून वर्धा शहरातील नागरिकांना पाणीपुरवठा होतो़ त्याचे महिन्याचे बिल १६ लाख रुपये वर्धा नगर परिषदेला भरावे लागत आहे़ बरेचदा येणारे प्रचंड बिल भरण्याकरिता नगर परिषद सक्षम नसते. यामुळे पाणी पुरवठा योजनेचा वीज पुरवठा खंडित केला जातो व नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतो़ नगर पालिकेत पाणी पुरवठा विभागात तांत्रिक कर्मचारी नाहीत़ १९६९ पासून पवनारच्या पंपिंग मशीन झीजल्या आहेत़ दररोज १८ तासांचे काम असते, एका वेळी दोन मशीनचे काम असते तसेच केबल वायरिंग वडली आहे़ पाणी शुद्धीकरणाकरिता क्लोरीन टाकले जाते़ ते संपले तर ब्लिचींग वा तुरटी टाकली जाते़ येळाकेळी येथे १८ एमएलडी असून एक्सप्रेस फिल्टर नाही. मेकॅनिकल इंजिनिअर नाही़ शिप्ट इंजिनिअर नाही़ वाटर सप्लायमध्ये कुली नाही. प्लंबर नाही, वॉलमॅन कमी आहेत. नगर परिषदेमध्ये १९९७ ते २०१५ पर्यंतच्या आस्थापना विभागाकडे चौकशी केल्यास कर्मचाऱ्यांचा तुटवडा जाणवतो़ नागरिकांना पाणी पुरवठा नगर परिषदेमार्फत एक दिवस आड होतो; पण पाण्याचे बिल पूर्ण एक वर्षाचे आकारले जाते़ पूर्वी पाणी बील ९०० रुपये होते ते आज १५०० रुपये झाले आहे़ पाईपलाईन फार जुन्या असून नालीमध्ये आहे़ सदर पाईप सडले असून अनेकदा दूषित पाण्याचा पुरवठा होतो़यामुळे पालिकेकडून पाणी पुरवठा योजना काढून जीवन प्राधिकरणकडे हस्तांतरित करावी आणि नागरिकांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करावा, अशी मागणी अखिल भारतीय बापू युवा संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे़ याबाबत खा़ रामदास तडस यांनाही निवेदन देण्यात आले़(कार्यालय प्रतिनिधी)