शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत अर्थव्यवस्था? मग हा वाढीचा ७% वेग कोणाचा हो राष्ट्राध्यक्ष ट्रम्प? अरविंद पनगढियांचा पलटवार
2
राहुल गांधी, आव्हान स्वीकारा! ...जेणेकरून ‘दूध का दूध, और पानी का पानी’ होईल.
3
उत्तरकाशीतून ६५० लोकांना बाहेर काढण्यात यश; ३०० लोक अजूनही अडकल्याची भीती, धरालीमध्ये बचावकार्य सुरू
4
Raksha Bandhan Shubh Muhurt: राखी बांधण्यासाठी साडेसात तासांचा शुभ मुहूर्त; सुरु झाला, कधी संपणार... अख्खा दिवस नाहीय...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आणखी एक युद्ध संपवल्याचा दावा! ३७ वर्षांच्या युद्धाला मिळाला पूर्णविराम
6
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
7
सावत्र आईसुद्धा 'आई'च! तिलाही पेन्शनचा हक्क हवा : सर्वोच्च न्यायालय
8
स्टॅलिन म्हणाले, आम्ही केवळ तामिळ, इंग्रजी भाषा सुरू ठेवणार; केंद्राच्या एनईपीविरोधात राज्याचे नवे शैक्षणिक धोरण 
9
आजचे राशीभविष्य, ०९ ऑगस्ट २०२५:सुखद बातमी मिळेल, आनंदी राहाल! असा जाईल आजचा दिवस
10
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
11
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
12
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
13
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
14
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
15
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
16
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
17
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
18
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
19
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
20
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 

पाणी पुरवठा योजना जीवन प्राधिकरणकडे सोपवा

By admin | Updated: March 21, 2015 02:09 IST

स्थानिक नगर पालिकेचा पाणी पुरवठा विभाग अत्यंत कमकुवत आहे़ शिवाय नगर परिषदेला तोट्यात आणणारा व शहरातील नागरिकांना ...

वर्धा : स्थानिक नगर पालिकेचा पाणी पुरवठा विभाग अत्यंत कमकुवत आहे़ शिवाय नगर परिषदेला तोट्यात आणणारा व शहरातील नागरिकांना मनस्ताप देणारा ठरत आहे़ यामुळे सदर पाणी पुरवठा योजना जीवन प्राधिकरण विभागाला हस्तांतरित करण्यात यावा, अशी मागणी नागरिकांद्वारे करण्यात येत आहे़ याबाबत जिल्हाधिकारी, खासदार आणि नगर परिषदेलाही निवेदन सादर करण्यात आले़ येळाकेळी, पवनार व हनुमान टेकडी या तीनही ठिकाणावरून वर्धा शहरातील नागरिकांना पाणीपुरवठा होतो़ त्याचे महिन्याचे बिल १६ लाख रुपये वर्धा नगर परिषदेला भरावे लागत आहे़ बरेचदा येणारे प्रचंड बिल भरण्याकरिता नगर परिषद सक्षम नसते. यामुळे पाणी पुरवठा योजनेचा वीज पुरवठा खंडित केला जातो व नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतो़ नगर पालिकेत पाणी पुरवठा विभागात तांत्रिक कर्मचारी नाहीत़ १९६९ पासून पवनारच्या पंपिंग मशीन झीजल्या आहेत़ दररोज १८ तासांचे काम असते, एका वेळी दोन मशीनचे काम असते तसेच केबल वायरिंग वडली आहे़ पाणी शुद्धीकरणाकरिता क्लोरीन टाकले जाते़ ते संपले तर ब्लिचींग वा तुरटी टाकली जाते़ येळाकेळी येथे १८ एमएलडी असून एक्सप्रेस फिल्टर नाही. मेकॅनिकल इंजिनिअर नाही़ शिप्ट इंजिनिअर नाही़ वाटर सप्लायमध्ये कुली नाही. प्लंबर नाही, वॉलमॅन कमी आहेत. नगर परिषदेमध्ये १९९७ ते २०१५ पर्यंतच्या आस्थापना विभागाकडे चौकशी केल्यास कर्मचाऱ्यांचा तुटवडा जाणवतो़ नागरिकांना पाणी पुरवठा नगर परिषदेमार्फत एक दिवस आड होतो; पण पाण्याचे बिल पूर्ण एक वर्षाचे आकारले जाते़ पूर्वी पाणी बील ९०० रुपये होते ते आज १५०० रुपये झाले आहे़ पाईपलाईन फार जुन्या असून नालीमध्ये आहे़ सदर पाईप सडले असून अनेकदा दूषित पाण्याचा पुरवठा होतो़यामुळे पालिकेकडून पाणी पुरवठा योजना काढून जीवन प्राधिकरणकडे हस्तांतरित करावी आणि नागरिकांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करावा, अशी मागणी अखिल भारतीय बापू युवा संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे़ याबाबत खा़ रामदास तडस यांनाही निवेदन देण्यात आले़(कार्यालय प्रतिनिधी)