शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
2
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
3
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
4
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
5
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
6
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
7
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."
8
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
9
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
10
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
11
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
12
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
13
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
14
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
15
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
16
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
17
Surya Grahan 2025: ग्रहण सूर्याला मात्र 'या' राशींचे भाग्य येईल फळाला; १०० वर्षांनी जुळून आलाय अपूर्व योग!
18
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
19
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
20
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!

वर्धेकरांनो, बचत करा; तीन दिवस पाणीपुरवठा ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2022 13:08 IST

नगरपालिकेचे आवाहन : पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटली

वर्धा : वर्धा शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी फुटल्याने शहराला होणारा पाणीपुरवठा खंडित झाला आहे. पुढील तीन दिवस पाणीपुरवठा खंडित राहणार असल्याने नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन नगर पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

पवनार येथील धाम नदीपात्रावरील जलशुद्धिकरण केंद्रातून येणारी आणि वर्धा शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी आरती चौक परिसरात रविवारी रात्रीच्या सुमारास फुटली. सोमवारी सकाळपासूनच जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम युद्धस्तरावर सुरू होते. दरम्यान, शहराचा पाणीपुरवठा पुढील तीन दिवस ठप्प राहणार असल्याची माहिती नगर पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे.

रात्रीच्या सुमारास जलवाहिनी फुटल्याने रस्त्यावर पाण्याचे लोट पसरले होते. लाखो लिटर पाणी वाया गेले. सकाळच्या सुमारास जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम पालिकेकडून केले जात होते. त्यामुळे पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.

अर्ध्याअधिक शहराचा पाणीपुरवठा राहणार बंद

मुख्य जलवाहिनी फुटल्याने साधारणतः सात ते आठ हजार नळजोडणीधारकांना फटका बसणार आहे. यामुळे गांधीनगर, सुदामपुरी, यशवंत कॉलनी, पुलफैल, तारफैल, महादेवपुरा, आनंदनगर, सिव्हील लाईन, मुख्य मार्केटचा काही भाग, इतवारा परिसर, लक्ष्मीनगर, स्नेहलनगर, सेवाग्राम रोड परिसर तसेच नागपूर रोड परिसरातील काही भागातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

पवनार येथून शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी फुटल्याने शहराचा पाणीपुरवठा प्रभावित झाला आहे. पुढील तीन दिवस शहरातील काही भागांमध्ये पाणीपुरवठा होणार नसल्याने नागरिकांनी पाण्याची बचत करावी. ६० वर्षे जुनी ही जलवाहिनी असून त्याचे सुटे भाग उपलब्ध होत नाही. त्यामुळे दुरुस्तीला वेळ लागतो. लवकरात लवकर दुरुस्ती केली जाईल.

नीलेश नंदनवार, अभियंता, पाणीपुरवठा विभाग, नगरपालिका वर्धा

टॅग्स :Waterपाणीwardha-acवर्धा