शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

चार दिवसांपासून शहरात पाणीपुरवठा झाला ठप्प; नगर पंचायतीच्या बेताल कारभारामुळे नागरिक त्रस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 17:53 IST

Wardha : कामगारांचा तीन महिन्यांपासून पगार न झाल्याने १४ जानेवारीपासून काम बंद आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : येथील नगर पंचायत कोणत्या ना कोणत्या कारणाने वादग्रस्त ठरली आहे. तीन वर्षात नगर पंचायतीच्या बेताल कारभारामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. नागरिकांच्या समस्यांचे निरसन करण्याकडे कोणाचेही लक्ष नसल्याने त्यांच्यात असंतोष खदखदत आहे. मागील चार दिवसांपासून नळ योजना बंद असल्यामुळे पाणीपुरवठा ठप्प आहे. कामगारांचा गेल्या तीन महिन्यांपासून पगार न झाल्याने त्यांनी १४ जानेवारीपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे. परिणामी, शहरातील साफसफाई, कचऱ्याची विल्हेवाट लावणे आदी सर्व कामे ठप्प आहेत. चार दिवसांपासून पथदिवेही रात्रंदिवस सुरूच आहेत. कामगारांचे वेतन न दिल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. 

"पाणीपुरवठा करणारी मोटार बंद पडल्याने पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. लवकरच मोटारची दुरुस्ती करून पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येईल." - प्रदीप डगवार, सभापती, पाणीपुरवठा विभाग

"मी सहा महिन्यांपासून नगर पंचायतीत कामगार म्हणून कार्यरत आहे. मात्र, आम्हा कामगारांना मागील दोन महिन्यांपासून वेतनच दिलेले नाही. त्यामुळे आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे."- संतोष वानखेडे, कामगार

"मी रोज हिंघणघाटवरून कामासाठी नगर पंचायतीत येतो. माझ्या पत्नीला लकवा मारला असून, तिला उपचारासाठी माझ्याकडे पैसे नाहीत. घरी जेवणासाठीदेखील कवडी नाही. माझे तीन महिन्यांचे वेतन थकीत आहे. मुलांचे शिक्षण आणि अन्न पाण्यासाठी देखील पैसा नाही. याकडे लक्ष द्यावे." - विनायक सिडाम, कामगार

"कामगारांना त्यांचे वेतन न झाल्याची माहिती आहे. वेतन मिळण्यासाठी आम्ही पत्रव्यवहार केला आहे. येत्या सोमवारी कामगारांच्या पगाराची तरतूद करण्यात येणार आहे." - पौर्णिमा गावित, मुख्याधिकारी, नगर पंचायत

टॅग्स :wardha-acवर्धाwater shortageपाणीकपातwater transportजलवाहतूक