शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
3
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
4
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
5
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
6
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
7
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
8
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
9
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
10
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
11
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
12
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
13
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...
14
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
15
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
16
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
17
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
18
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
19
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
20
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली

पाण्याअभावी चाराटंचाईच्या झळा; विदर्भातील गोपालक अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 11:55 IST

जिल्ह्यातील बैलबाजारांचा महाराष्ट्रात नावलौकिक होता. मात्र, सध्या पाणी व चारा टंचाईच्या झळांमुळे बैलांसह इतर जनावरांचा बाजार चांगलाच फुलताना दिसून येत आहे.

ठळक मुद्देबैलजोडींची किंमत पोहोचली अडीच लाखांवर

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यातील बैलबाजारांचा महाराष्ट्रात नावलौकिक होता. कालांतराने आधुनिकतेमुळे बैलांची मागणी कमी झाल्यामुळे बैलबाजारातील बैलजोड्यांचीही संख्या रोडावत गेली. मात्र, सध्या पाणी व चारा टंचाईच्या झळांमुळे बैलांसह इतर जनावरांचा बाजार चांगलाच फुलताना दिसून येत आहे. हीच स्थिती विदर्भातील यवतमाळ, अमरावती, चंद्रपूर आदी जिल्ह्यांतही दिसून येत आहे.वर्धा जिल्ह्यातील देवळी, आंजी, आर्वी, समुद्रपूर, सिंदी व सेलू या भागात नियमित बैलबाजार भरतो. यातील देवळी, समुद्रपूर व सेलूचा बाजार महाराष्ट्रात परिचित होता. शेतकऱ्यांसह बैल व्यापाऱ्याचे देखणे बैल या बाजारातील दावणीला बांधलेले दिसायचे. महागाई वाढतगेल्याने बैलांच्या किमतीही चांगल्याच वाढल्या. ५० हजार रुपयांपासून २ लाख ५० हजार रुपयांपर्यंत बैलजोड्या या बाजारात विक्रीकरिता असतात. शेतात तांत्रिक वापर वाढल्याने आणि मजुरांचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे शेतकऱ्यांनी बैलजोडी कमी करीत यंत्राद्वारे शेती करण्यावर भर दिला. त्यामुळे बैलजोडीची मागणी कमी होत गेली आहे. याचाच परिणाम बैलबाजारावरही झाल्याने या भागातील बैलबाजारही नावापुरतेच शिल्लक राहिले. त्यात यावर्षी पाणी व चाराटंचाईचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याने शेतकऱ्यांपुढे मोठा प्रश्न उभा ठाकला आहे. शेतकºयांनी आता बैलांची आवश्यकता असल्याने बैलजोडी ठेवून इतर गोधन विकायला सुरुवात केली आहे. इच्छा नसतानाही गोठ्यातील जनावरांना परिस्थितीमुळे विकावे लागत आहे. काहींनी तर आपली जनावरे इतरत्र नातेवाईकांकडे किंवा चारा असलेल्या ठिकाणी हलविली आहेत. दुभत्या जनावरांव्यतिरिक्त इतर गोधन बाजाराची वाट धरत आहे. ही स्थिती आता कमी दिसत असली तरी येत्या दिवसात ही वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

वैरणाचा खर्च अन मजुरीचे दरही वाढलेजिल्ह्यात प्रारंभी मोठ्या प्रमाणात ज्वारीचा पेरा व्हायचा. त्यामुळे जनावरांना कडबा (वैरण) मिळायचा. सोबतच सोयाबीन, चणा व तुरीचे कुटारही सहजगत्या उपलब्ध व्हायचे म्हणून जनावरांच्या चाºयाचा प्रश्न नव्हता. मात्र, आता ज्वारीच्या पेºयाकडे दुर्लक्ष झाले. सोयाबीनचे कुटारही १ हजार बंडी तर तुरीचे कुटार २ हजार रुपये बंडीवर पोहोचले आहे. आधीच अत्यल्प उत्पादनामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना हा वैरणावरील खर्च परवडणारा नाही. ज्यांच्याकडे दुधाळ जनावरे आहेत, त्यांना ओला चारा व सरकी, ढेप खरेदी करावी लागते. सोबतच ही जनावरे चारण्याकरिता वेगळा गुराखीही ठेवावा लागतो. ढेप सध्या २ हजार ८०० रुपये क्विंटल झाली असून गुराख्याला वार्षिक ९० हजार रुपये वेतन द्यावे लागते. यामुळे शेतकऱ्यांना आता जनावरांचा पसारा सांभाळणे कठीण होत आहे

जनावरे विक्रीची कारणेजिल्ह्यात यावर्षी जलाशयाने तळ गाठल्याने कधी नव्हे, इतकी पाणी संमस्या गंभीर झाली आहे. यावर्षी २७ टक्क्यांपेक्षाही कमी जलसाठा असल्याने गावागावांत पाणी प्रश्न निर्माण झाला आहे. शेतशिवारातही पाणी नसल्याने जनावरांना पुरेसे पाणी मिळणे कठीण झाले आहे.यावर्षी सुरुवातीपासून पावसाने हुलकावणी दिल्याने जंगल परिसरात चारा उपलब्ध नाही. दरवर्षी शेतात चाऱ्याची पेरणी केली जायची. मात्र, यावर्षी विहिरींनाही पाणी नसल्याने चाऱ्यांची पेरणी कमी झाली आहे.ग्रामीण भागात शेतकरी व गोपालक महिनेवारी जनावरे चराईकरिता सोडतात. परंतु, यावर्षी जंगलात चारा नसल्याने गाई चारणाºयाने गायगोहण चारण्यास नकार दिला आहे.

जनावरे शेतकऱ्यांचे वैभव आहे; परंतु पाणी आणि चारा टंचाईमुळे मोठी समस्या निर्माण झाली आहे. वैरणाचाही खर्च वाढला असून जनावरांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध होत नाही. अशा परिस्थितीत जनावरांचा सांभाळ करणे कठीण होत आहे. त्यामुळे जनावरांची संख्या कमी केल्याशिवाय दुसरा पर्याय नाही.संजय कुटे, शेतकरी

यांत्रिकीकरणाचा फटका बैलबाजाराला बसला आहे. तरीही काही शेतकरी दरवर्षी बैलजोडी बदलविल्याशिवाय राहात नाही. बैलांची मागणी शेतकरी करीत असतो. त्यामुळे बाजारात देखणे बैल विक्रीकरिता आणले जातात. यावर्षी पाणीटंचाईची तीव्रता जाणवत असल्याने शेतकऱ्यांचे गोधनही विक्रीकरिता बाजारात येताना दिसून येत आहे. ही स्थिती पुढेही वाढण्याची शक्यता आहे.विठ्ठल सुरकार, व्यापारी

टॅग्स :Farmerशेतकरीwater shortageपाणीटंचाई