शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

पाण्याअभावी चाराटंचाईच्या झळा; विदर्भातील गोपालक अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 11:55 IST

जिल्ह्यातील बैलबाजारांचा महाराष्ट्रात नावलौकिक होता. मात्र, सध्या पाणी व चारा टंचाईच्या झळांमुळे बैलांसह इतर जनावरांचा बाजार चांगलाच फुलताना दिसून येत आहे.

ठळक मुद्देबैलजोडींची किंमत पोहोचली अडीच लाखांवर

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यातील बैलबाजारांचा महाराष्ट्रात नावलौकिक होता. कालांतराने आधुनिकतेमुळे बैलांची मागणी कमी झाल्यामुळे बैलबाजारातील बैलजोड्यांचीही संख्या रोडावत गेली. मात्र, सध्या पाणी व चारा टंचाईच्या झळांमुळे बैलांसह इतर जनावरांचा बाजार चांगलाच फुलताना दिसून येत आहे. हीच स्थिती विदर्भातील यवतमाळ, अमरावती, चंद्रपूर आदी जिल्ह्यांतही दिसून येत आहे.वर्धा जिल्ह्यातील देवळी, आंजी, आर्वी, समुद्रपूर, सिंदी व सेलू या भागात नियमित बैलबाजार भरतो. यातील देवळी, समुद्रपूर व सेलूचा बाजार महाराष्ट्रात परिचित होता. शेतकऱ्यांसह बैल व्यापाऱ्याचे देखणे बैल या बाजारातील दावणीला बांधलेले दिसायचे. महागाई वाढतगेल्याने बैलांच्या किमतीही चांगल्याच वाढल्या. ५० हजार रुपयांपासून २ लाख ५० हजार रुपयांपर्यंत बैलजोड्या या बाजारात विक्रीकरिता असतात. शेतात तांत्रिक वापर वाढल्याने आणि मजुरांचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे शेतकऱ्यांनी बैलजोडी कमी करीत यंत्राद्वारे शेती करण्यावर भर दिला. त्यामुळे बैलजोडीची मागणी कमी होत गेली आहे. याचाच परिणाम बैलबाजारावरही झाल्याने या भागातील बैलबाजारही नावापुरतेच शिल्लक राहिले. त्यात यावर्षी पाणी व चाराटंचाईचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याने शेतकऱ्यांपुढे मोठा प्रश्न उभा ठाकला आहे. शेतकºयांनी आता बैलांची आवश्यकता असल्याने बैलजोडी ठेवून इतर गोधन विकायला सुरुवात केली आहे. इच्छा नसतानाही गोठ्यातील जनावरांना परिस्थितीमुळे विकावे लागत आहे. काहींनी तर आपली जनावरे इतरत्र नातेवाईकांकडे किंवा चारा असलेल्या ठिकाणी हलविली आहेत. दुभत्या जनावरांव्यतिरिक्त इतर गोधन बाजाराची वाट धरत आहे. ही स्थिती आता कमी दिसत असली तरी येत्या दिवसात ही वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

वैरणाचा खर्च अन मजुरीचे दरही वाढलेजिल्ह्यात प्रारंभी मोठ्या प्रमाणात ज्वारीचा पेरा व्हायचा. त्यामुळे जनावरांना कडबा (वैरण) मिळायचा. सोबतच सोयाबीन, चणा व तुरीचे कुटारही सहजगत्या उपलब्ध व्हायचे म्हणून जनावरांच्या चाºयाचा प्रश्न नव्हता. मात्र, आता ज्वारीच्या पेºयाकडे दुर्लक्ष झाले. सोयाबीनचे कुटारही १ हजार बंडी तर तुरीचे कुटार २ हजार रुपये बंडीवर पोहोचले आहे. आधीच अत्यल्प उत्पादनामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना हा वैरणावरील खर्च परवडणारा नाही. ज्यांच्याकडे दुधाळ जनावरे आहेत, त्यांना ओला चारा व सरकी, ढेप खरेदी करावी लागते. सोबतच ही जनावरे चारण्याकरिता वेगळा गुराखीही ठेवावा लागतो. ढेप सध्या २ हजार ८०० रुपये क्विंटल झाली असून गुराख्याला वार्षिक ९० हजार रुपये वेतन द्यावे लागते. यामुळे शेतकऱ्यांना आता जनावरांचा पसारा सांभाळणे कठीण होत आहे

जनावरे विक्रीची कारणेजिल्ह्यात यावर्षी जलाशयाने तळ गाठल्याने कधी नव्हे, इतकी पाणी संमस्या गंभीर झाली आहे. यावर्षी २७ टक्क्यांपेक्षाही कमी जलसाठा असल्याने गावागावांत पाणी प्रश्न निर्माण झाला आहे. शेतशिवारातही पाणी नसल्याने जनावरांना पुरेसे पाणी मिळणे कठीण झाले आहे.यावर्षी सुरुवातीपासून पावसाने हुलकावणी दिल्याने जंगल परिसरात चारा उपलब्ध नाही. दरवर्षी शेतात चाऱ्याची पेरणी केली जायची. मात्र, यावर्षी विहिरींनाही पाणी नसल्याने चाऱ्यांची पेरणी कमी झाली आहे.ग्रामीण भागात शेतकरी व गोपालक महिनेवारी जनावरे चराईकरिता सोडतात. परंतु, यावर्षी जंगलात चारा नसल्याने गाई चारणाºयाने गायगोहण चारण्यास नकार दिला आहे.

जनावरे शेतकऱ्यांचे वैभव आहे; परंतु पाणी आणि चारा टंचाईमुळे मोठी समस्या निर्माण झाली आहे. वैरणाचाही खर्च वाढला असून जनावरांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध होत नाही. अशा परिस्थितीत जनावरांचा सांभाळ करणे कठीण होत आहे. त्यामुळे जनावरांची संख्या कमी केल्याशिवाय दुसरा पर्याय नाही.संजय कुटे, शेतकरी

यांत्रिकीकरणाचा फटका बैलबाजाराला बसला आहे. तरीही काही शेतकरी दरवर्षी बैलजोडी बदलविल्याशिवाय राहात नाही. बैलांची मागणी शेतकरी करीत असतो. त्यामुळे बाजारात देखणे बैल विक्रीकरिता आणले जातात. यावर्षी पाणीटंचाईची तीव्रता जाणवत असल्याने शेतकऱ्यांचे गोधनही विक्रीकरिता बाजारात येताना दिसून येत आहे. ही स्थिती पुढेही वाढण्याची शक्यता आहे.विठ्ठल सुरकार, व्यापारी

टॅग्स :Farmerशेतकरीwater shortageपाणीटंचाई