शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
3
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
4
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
5
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
6
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
7
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
8
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
9
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
10
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
11
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
12
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
13
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
14
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
15
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
16
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
17
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
18
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
19
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
20
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO

अर्धवट कामामुळे घरात शिरले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2020 05:00 IST

पाईपलाईन टाकण्यासाठी परिसरातील सिमेंट रस्ते फोडण्यात येत आहे. पण, अद्यापही योजनेचे काम पूर्णत्त्वास न गेल्याने याचा नाहक त्रास नागरिकांना सोसावा लागतो आहे. ग्रामपंचायत समोरील रस्त्यावर गिट्टी तशीच पडून आहे. त्यामुळे रस्त्याने ये-जा करताना नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. कुठे नळजोडणीचे काम अपूर्ण आहे.

ठळक मुद्देजीवन प्राधिकरणची नियोजनशून्यता : सिंदी (मेघे) येथील वॉर्ड तीनमधील प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सिंदी (मेघे) ग्रामपंचायतीच्या अंतर्गत जीवन प्राधिकरणतर्फे नळ जोडणीचे काम सुरू आहे. त्यासाठी रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे तर कुठे रस्ताच पोखरण्यात आला आहे. जीवन प्राधिकरणच्या अपूर्ण कामामुळे शनिवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे नालीतील सांडपाणी परिसरातील नागरिकांच्या घरात शिरले. त्यामुळे संपूर्ण रात्र नागरिकांना जागून काढावी लागली. या प्रकारामुळे प्राधिकरणाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.सिंदी (मेघे) परिसरातील वॉर्ड तीनमध्ये प्राधिकरणाच्यावतीने मागील सहा महिन्यांपासून नळयोजनेचे कासवगतीने काम सुरू आहे.पाईपलाईन टाकण्यासाठी परिसरातील सिमेंट रस्ते फोडण्यात येत आहे. पण, अद्यापही योजनेचे काम पूर्णत्त्वास न गेल्याने याचा नाहक त्रास नागरिकांना सोसावा लागतो आहे. ग्रामपंचायत समोरील रस्त्यावर गिट्टी तशीच पडून आहे. त्यामुळे रस्त्याने ये-जा करताना नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.कुठे नळजोडणीचे काम अपूर्ण आहे. नळाचे पाणी रस्त्यावर येत असून चिखल तयार होत रस्त्यावर पसरत आहे. रस्त्याच्या कडेला खोदलेल्या नाल्यांमुळे तसेच जीवन प्राधिकरणाच्या अपूर्ण कामामुळे पावसाचे पाणी थेट नागरिकांच्या घरात शिरले.त्यामुळे घरातील जीवनावश्यक वस्तूंची नासाडी झाली. मात्र, याकडे जीवन प्राधिकरणचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.घरातील धान्यसाठा भिजलाशनिवारी झालेल्या पावसाचे पाणी नागरिकांच्या घरात शिरले. पावसाचा जोर कायम असल्याने मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याने घरातील धान्यसाठा तसेच इतर महत्त्वाचे कागदपत्रं ओले झाले.रस्त्याच्या मधात खड्डे करण्यात आले. नळ जोडणी केल्यानंतर खड्डे बुजविण्यास मात्र विसर पडला. अग्निहोत्री कॉलेजच्या बाजूच्या रस्त्यावर गिट्टी पसरली असून रस्त्याकडेची कामे पूर्ण केलेली नाही. प्रशासनाने लक्ष देत तत्काळ काम पूर्ण करावे, अन्यथा आंदोलन करावे लागणार.- कोमल प्रमोद खंडारेसदस्य, ग्रामपंचायत, सिंदी (मेघे)मागील सहा महिन्यांपासून नळ योजनेचे काम सुरू आहे. प्राथमिक शाळा ते ग्रामपंचायतपर्यंतच्या रस्त्याचे खोदकाम करण्यात आले. हे काम संथगतीने सुरू आहे. कुठे नळजोडणीचे काम अपूर्ण आहे. तर रस्त्यावर नळजोडणीकरीता करण्यात आलेले खड्डे बुजविण्याचा विसर पडला आहे. अपूर्ण काम तत्काळ पूर्ण करण्यात यावे.- धर्मराज वैद्य,ग्रामपंचायत, सिंदी (मेघे)अपूर्ण कामामुळे दररोज अपघाताची मालिका सुरूच आहे. शनिवारी झालेल्या पावसामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरले. पण, प्राधिकरणाचे याकडे लक्ष नाही. तत्काळ योजनेचे काम पूर्ण करण्यात यावे.- उत्कर्ष देशमुख,ग्रामपंचायत, सिंदी (मेघे)प्राधिकरणचे काम सुरु झाल्यापासून रस्त्यावरील तसेच नालीचे पूर्ण पाणी घरात शिरत आहे. शनिवारी झालेल्या पावसाचे पाणी घरात शिरले. त्यामुळे रात्र जागून पाणी काढावे लागले. घरातील जीवनावश्यक साहित्य ओले झाले.- किशोर लेंडे, सिंदी (मेघे) येथील रहिवासी.पावसाच्या पाण्यात सिमेंट पोती ओलीनळयोजनेच्या कामसाठी सिमेंटच्या थैल्या रस्त्यावर उतरविल्या होत्या. पण, संथ गतीने कामकाज सुरू असल्याने काही पोती रस्त्याकडेलाच ठेवून होती. शनिवारी झालेल्या पावसाने संपूर्ण पोती भिजली. याचा भुर्दंड कोण भरणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

टॅग्स :Rainपाऊस