शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

अर्धवट कामामुळे घरात शिरले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2020 05:00 IST

पाईपलाईन टाकण्यासाठी परिसरातील सिमेंट रस्ते फोडण्यात येत आहे. पण, अद्यापही योजनेचे काम पूर्णत्त्वास न गेल्याने याचा नाहक त्रास नागरिकांना सोसावा लागतो आहे. ग्रामपंचायत समोरील रस्त्यावर गिट्टी तशीच पडून आहे. त्यामुळे रस्त्याने ये-जा करताना नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. कुठे नळजोडणीचे काम अपूर्ण आहे.

ठळक मुद्देजीवन प्राधिकरणची नियोजनशून्यता : सिंदी (मेघे) येथील वॉर्ड तीनमधील प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सिंदी (मेघे) ग्रामपंचायतीच्या अंतर्गत जीवन प्राधिकरणतर्फे नळ जोडणीचे काम सुरू आहे. त्यासाठी रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे तर कुठे रस्ताच पोखरण्यात आला आहे. जीवन प्राधिकरणच्या अपूर्ण कामामुळे शनिवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे नालीतील सांडपाणी परिसरातील नागरिकांच्या घरात शिरले. त्यामुळे संपूर्ण रात्र नागरिकांना जागून काढावी लागली. या प्रकारामुळे प्राधिकरणाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.सिंदी (मेघे) परिसरातील वॉर्ड तीनमध्ये प्राधिकरणाच्यावतीने मागील सहा महिन्यांपासून नळयोजनेचे कासवगतीने काम सुरू आहे.पाईपलाईन टाकण्यासाठी परिसरातील सिमेंट रस्ते फोडण्यात येत आहे. पण, अद्यापही योजनेचे काम पूर्णत्त्वास न गेल्याने याचा नाहक त्रास नागरिकांना सोसावा लागतो आहे. ग्रामपंचायत समोरील रस्त्यावर गिट्टी तशीच पडून आहे. त्यामुळे रस्त्याने ये-जा करताना नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.कुठे नळजोडणीचे काम अपूर्ण आहे. नळाचे पाणी रस्त्यावर येत असून चिखल तयार होत रस्त्यावर पसरत आहे. रस्त्याच्या कडेला खोदलेल्या नाल्यांमुळे तसेच जीवन प्राधिकरणाच्या अपूर्ण कामामुळे पावसाचे पाणी थेट नागरिकांच्या घरात शिरले.त्यामुळे घरातील जीवनावश्यक वस्तूंची नासाडी झाली. मात्र, याकडे जीवन प्राधिकरणचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.घरातील धान्यसाठा भिजलाशनिवारी झालेल्या पावसाचे पाणी नागरिकांच्या घरात शिरले. पावसाचा जोर कायम असल्याने मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याने घरातील धान्यसाठा तसेच इतर महत्त्वाचे कागदपत्रं ओले झाले.रस्त्याच्या मधात खड्डे करण्यात आले. नळ जोडणी केल्यानंतर खड्डे बुजविण्यास मात्र विसर पडला. अग्निहोत्री कॉलेजच्या बाजूच्या रस्त्यावर गिट्टी पसरली असून रस्त्याकडेची कामे पूर्ण केलेली नाही. प्रशासनाने लक्ष देत तत्काळ काम पूर्ण करावे, अन्यथा आंदोलन करावे लागणार.- कोमल प्रमोद खंडारेसदस्य, ग्रामपंचायत, सिंदी (मेघे)मागील सहा महिन्यांपासून नळ योजनेचे काम सुरू आहे. प्राथमिक शाळा ते ग्रामपंचायतपर्यंतच्या रस्त्याचे खोदकाम करण्यात आले. हे काम संथगतीने सुरू आहे. कुठे नळजोडणीचे काम अपूर्ण आहे. तर रस्त्यावर नळजोडणीकरीता करण्यात आलेले खड्डे बुजविण्याचा विसर पडला आहे. अपूर्ण काम तत्काळ पूर्ण करण्यात यावे.- धर्मराज वैद्य,ग्रामपंचायत, सिंदी (मेघे)अपूर्ण कामामुळे दररोज अपघाताची मालिका सुरूच आहे. शनिवारी झालेल्या पावसामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरले. पण, प्राधिकरणाचे याकडे लक्ष नाही. तत्काळ योजनेचे काम पूर्ण करण्यात यावे.- उत्कर्ष देशमुख,ग्रामपंचायत, सिंदी (मेघे)प्राधिकरणचे काम सुरु झाल्यापासून रस्त्यावरील तसेच नालीचे पूर्ण पाणी घरात शिरत आहे. शनिवारी झालेल्या पावसाचे पाणी घरात शिरले. त्यामुळे रात्र जागून पाणी काढावे लागले. घरातील जीवनावश्यक साहित्य ओले झाले.- किशोर लेंडे, सिंदी (मेघे) येथील रहिवासी.पावसाच्या पाण्यात सिमेंट पोती ओलीनळयोजनेच्या कामसाठी सिमेंटच्या थैल्या रस्त्यावर उतरविल्या होत्या. पण, संथ गतीने कामकाज सुरू असल्याने काही पोती रस्त्याकडेलाच ठेवून होती. शनिवारी झालेल्या पावसाने संपूर्ण पोती भिजली. याचा भुर्दंड कोण भरणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

टॅग्स :Rainपाऊस