शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

जलशुद्धीकरण केंद्रच पडले आजारी

By admin | Updated: May 12, 2017 00:54 IST

चार गावांसाठी तयार करण्यात आलेली द्रुगवाडा नळयोजना व जलशुद्धीकरण केंद्र सध्या आजारी पडले आहे.

चार गावांच्या पाणी पुरवठ्यावर प्रश्नचिन्ह : द्रुगवाडा ग्रामस्थांनी नाकारले पाणी लोकमत न्यूज नेटवर्क आष्टी (शहीद) : चार गावांसाठी तयार करण्यात आलेली द्रुगवाडा नळयोजना व जलशुद्धीकरण केंद्र सध्या आजारी पडले आहे. पाण्याचे शुद्धीकरण तर दूरच येथील साफसफाईदेखील होत नाही. यातच द्रुगवाडा येथील ग्रामस्थांनी पाणी नाकारले असून ते खासगी विहीर अधिग्रहित करून तहान भागवित आहे. याला नियोजनाचा अभाव कारणीभूत ठरत आहे. यात पाणी पुरवठा विभागाने सुधारणा करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. द्रुगवाडा, साहूर, सावंगा (पुनर्वसन) व धाडी या चार गावांसाठी जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात आले. वर्धा नदीत बारमाही पाणी वाहत असल्याने या ठिकाणी केंद्र उभारण्यात आले. या केंद्रातून प्रारंभी चांगली सेवा मिळाली. काळ बदलत गेला. संपूर्ण व्यवस्था कोलमडत गेली. या ठिकाणी ब्लिचींग पावडर नाही, केंद्र तीन महिन्यांपासून बंद आहे. सभोवताल घाणीचे साम्राज्य पसरले आहे. मोकाट जनावरांचा कळप, गावठी वराह आणि कुत्रे हे पाण्यात बसत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. यामुळे खरोखरच नागरिक हे पाणी पिणार काय, हा प्रश्नच आहे. गॅस्ट्रोची लागण हे सर्वकाही सांगून जात आहे. द्रुगवाडा ग्रा.पं. च्या सभेत यावर चर्चा झाली. या नळ योजनेचे पाणी पिणार नाही, असा निर्धार करून त्वरित नवीन व्यवस्था उभी करण्यात आली. दुसऱ्या खासगी विहिरीमधून गावकऱ्यांना पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. साहूर, सावंगा (पुनर्वसन), धाडी या तीन गावांना याच ठिकाणाहून पाणी येत आहे. वर्धा नदीच्या पात्रातील पाणी थेट पिण्यासाठी येत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. जलशुद्धीकरण केंद्र तीन महिन्यांपासून बंद असल्याने नागरिकांना दूषित व गढुळ पाणी प्यावे लागत आहे. साहूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. भागवत राऊत यांनी भेट देत पाहणी केली. यात अस्वच्छतेचा कळस दिसून आला. शासनाचे धोरण चांगले आहे; पण अंमलबजावणी करणारी यंत्रणा कुचकामी असल्याने ग्रामस्थांना आजारांचा सामना करावा लागत आहे. याकडे लक्ष देत शुद्ध पाणी पुरवठा करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.