शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

जलशुद्धीकरण केंद्रच पडले आजारी

By admin | Updated: May 12, 2017 00:54 IST

चार गावांसाठी तयार करण्यात आलेली द्रुगवाडा नळयोजना व जलशुद्धीकरण केंद्र सध्या आजारी पडले आहे.

चार गावांच्या पाणी पुरवठ्यावर प्रश्नचिन्ह : द्रुगवाडा ग्रामस्थांनी नाकारले पाणी लोकमत न्यूज नेटवर्क आष्टी (शहीद) : चार गावांसाठी तयार करण्यात आलेली द्रुगवाडा नळयोजना व जलशुद्धीकरण केंद्र सध्या आजारी पडले आहे. पाण्याचे शुद्धीकरण तर दूरच येथील साफसफाईदेखील होत नाही. यातच द्रुगवाडा येथील ग्रामस्थांनी पाणी नाकारले असून ते खासगी विहीर अधिग्रहित करून तहान भागवित आहे. याला नियोजनाचा अभाव कारणीभूत ठरत आहे. यात पाणी पुरवठा विभागाने सुधारणा करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. द्रुगवाडा, साहूर, सावंगा (पुनर्वसन) व धाडी या चार गावांसाठी जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात आले. वर्धा नदीत बारमाही पाणी वाहत असल्याने या ठिकाणी केंद्र उभारण्यात आले. या केंद्रातून प्रारंभी चांगली सेवा मिळाली. काळ बदलत गेला. संपूर्ण व्यवस्था कोलमडत गेली. या ठिकाणी ब्लिचींग पावडर नाही, केंद्र तीन महिन्यांपासून बंद आहे. सभोवताल घाणीचे साम्राज्य पसरले आहे. मोकाट जनावरांचा कळप, गावठी वराह आणि कुत्रे हे पाण्यात बसत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. यामुळे खरोखरच नागरिक हे पाणी पिणार काय, हा प्रश्नच आहे. गॅस्ट्रोची लागण हे सर्वकाही सांगून जात आहे. द्रुगवाडा ग्रा.पं. च्या सभेत यावर चर्चा झाली. या नळ योजनेचे पाणी पिणार नाही, असा निर्धार करून त्वरित नवीन व्यवस्था उभी करण्यात आली. दुसऱ्या खासगी विहिरीमधून गावकऱ्यांना पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. साहूर, सावंगा (पुनर्वसन), धाडी या तीन गावांना याच ठिकाणाहून पाणी येत आहे. वर्धा नदीच्या पात्रातील पाणी थेट पिण्यासाठी येत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. जलशुद्धीकरण केंद्र तीन महिन्यांपासून बंद असल्याने नागरिकांना दूषित व गढुळ पाणी प्यावे लागत आहे. साहूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. भागवत राऊत यांनी भेट देत पाहणी केली. यात अस्वच्छतेचा कळस दिसून आला. शासनाचे धोरण चांगले आहे; पण अंमलबजावणी करणारी यंत्रणा कुचकामी असल्याने ग्रामस्थांना आजारांचा सामना करावा लागत आहे. याकडे लक्ष देत शुद्ध पाणी पुरवठा करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.