शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: दिल्ली विमानतळाकडून प्रवाशांना मार्गदर्शक सूचना जारी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

निम्न वर्धाच्या कालव्यातून पाण्याचा पाझर

By admin | Updated: February 4, 2015 23:21 IST

निम्न वर्धा प्रकल्पाचा मायनर कालवा सेक्शन नंबर सहा यातून पाणी पाझरते. नजीकच्या सायखेडा मौजातील शेतकऱ्यांना यामुळे नुकसान सोसावे लागत आहे. या कालव्याच्या निकृष्ट

रोहणा : निम्न वर्धा प्रकल्पाचा मायनर कालवा सेक्शन नंबर सहा यातून पाणी पाझरते. नजीकच्या सायखेडा मौजातील शेतकऱ्यांना यामुळे नुकसान सोसावे लागत आहे. या कालव्याच्या निकृष्ट बांधकामामुळे तसेच बऱ्याच वर्र्षांपासून कोणतीचे दुरुस्ती न झाल्यामुळे हा कालवा अनेक ठिकाणी पाझरतो. या कालव्यातील पाणी लगतच्या शेतात जमा होत असल्याने पिकांचे नुकसान होत आहे.हा पाझर सतत सुरू असल्याने काही भागात दलदल तयार झाली आहे. तर पाझर काही ठिकाणी बुजल्याने पाणी सरळ न वाहता लगतच्या शेतात पसरते. परिणामी कालवा परिसरातील शेतात दलदल निर्माण झाली आहे. यामुळे शेकडो एकर शेतातील पिकांचे नुकसान होवून शेतकऱ्यांना दरवर्षी लाखोंचा फटका सहन करावा लागत आहे. पाटबंधारे विभाग याकडे दुर्लक्ष करीत असल्याने समस्या कायम आहे.सायखेडा शिवारातून लोअर वर्धा प्रकल्पाचा मायनर कालवा सेक्शन नंबर ६ गेला आहे. या कालव्याच्या बाजूला अरुण बोबडे, सुभाष डाखोरे, रमेश ठाकरे, माजी सरपंच सुनीता बोबडे, वसंत बोबडे, निरंजन बोबडे, धर्मराज डाखोरे, सुरेश ठाकरे, शालीक ठाकरे, धनराज कैलुके, भाष्कर ठाकरे, गजानन डाखोरे यांची शंभर एकरच्या जवळपास जमीन आहे. सदर मायनर कालव्याचे काम निकृष्ठ दर्जाचे झाले असल्याने तो सुरुवातीपासूनच अनेक ठिकाणी पाझरत होता. हा पाझर अद्याप कायम आहे. आतातर त्या कालव्यात अनेक ठिकाणी माती साचून कालवा बुजत आहे. कालव्यातून सिंचनासाठी सोडलेले पाणी सरळ वाहत न जाता परिसरातील शेतात पाझरते. जेथे कालवा बुजला तेथून पाणी प्रवाह बदलून अनेकांच्या शेतातून पाट वाहतात. परिणामी शेतात दलदल तयार होवनू पिकांना नुकसान होते. एवढेच नव्हे तर हजारोलिटर पाणी यामुळे वाया जात आहे. सदर बाब पिडीत शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागातील अधिकऱ्यांना भेटून व लेखी निवेदनाद्वारे लक्षात अनेकदा आणून दिली. मात्र यावर कार्यवाही झाली नाही. कधी निधी नाही तर निवडणूक आचार संहिता असे कारणे पुढे करीत असल्याने प्रश्न कायम आहे.(वार्ताहर)