शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
2
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
3
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
4
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
5
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
6
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
7
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
8
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
9
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
10
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
11
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
12
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
13
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
14
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
15
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
16
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
17
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
18
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
19
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
20
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!

शेतात जमा होणारे पाणी पोहचले नाल्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 23:25 IST

दरवर्षी येणाºया पावसामुळे व पुरामुळे शेतात एखाद्या भागात पाणी जमा होवून राहत होते. त्यामुळे ही जागा शेतकºयाला पडिकच ठेवावी लागत होती.

ठळक मुद्देशेतकºयांचे नुकसान टळले : जाण्यासाठी रस्ता झाला तयार

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : दरवर्षी येणाºया पावसामुळे व पुरामुळे शेतात एखाद्या भागात पाणी जमा होवून राहत होते. त्यामुळे ही जागा शेतकºयाला पडिकच ठेवावी लागत होती. या पाण्यामुळे शेतजमीन खराबही होत होती. या त्रासातून शेतकºयाला कायम मुक्ती मिळाली आहे. वर्धा तालुक्याच्या महाकाळ व साटोडा या दोन गावातील २० शेतकºयांना सुक्ष्म पाणलोट विकास तत्वावर आधारित जलसंधारण प्रकल्पातून दिलासा मिळाला आहे.धाम नदीच्या काठावर असलेले साटोडा व महाकाळ हे दोन गावे या गावातील शेतकºयांना दरवर्षी पावसाळ्यात पुराच्या संकटाला समोर जावे लागत होते. अनेक शेतकºयांच्या शेतात पावसाचे पाणी जमा होवून राहत होते. उतराच्या भागावर असलेली शेतजमीन यामुळे खराब होवून गेली होती. पाण्याचा निचरा होत नव्हता. त्यामुळे मातीचे ही नुकसान शेतकºयाला झाले. या सर्व त्रासातून मुक्ती मिळावी म्हणून साटोडा व महाकाळ ग्रामसभेने ठराव घेवून गावाजवळून जाणाºया नाल्याचे खोलीकरण व रूंदीकरण याचे काम हाती घेण्याचे ठरविले. या कामासाठी सद्भावना ग्रामीण विकास संस्था, वर्धाचे मिलिंद भगत यांनी पुढाकार घेतला. या कामाला स्थापत्य अभियंता माधवराव कोटस्थाने यांचे मार्गदर्शन लाभले व कामाला सुरूवात झाली. या परिसरातल्या २० शेतकºयांच्या शेतात नाल्यालगत प्रत्येकी दोन पाईप टाकून शेताच्या उतारावर जमा होणारे पाणी नाल्यात सोडण्याचे काम हाती घेण्यात आले. तसेच या नाल्यावर गॅबीआॅन बंधारा बांधताना शेतकºयांचा रहदारीचा रस्ता बंद होणार नाही याची काळजी घेत दोन ठिकाणी बांध व ओलांडणीचा पुल तयार करून देण्यात आला. त्यामुळे नाला खोलीकरण होवून शेतातील पाणी ही नाल्यात जमा होवू लागले. जलस्त्रोताची पातळी उंचावण्यास मदत झाली.राज्यात सर्वत्र जलयुक्त शिवार योजनेतून जलसंधारणाची कामे केली जात आहे. यात नाल्यांचे मुख्य प्रवाह, वळण बदलवून टाकण्यात आले आहे. मात्र साटोडा व महाकाळ येथे उत्तम दर्जाचे कामे झाले आहेत. हे काम राज्याच्या इतर भागासाठी आदर्श ठरणारे आहेत.- रवींद्र काळी, ज्येष्ठ भूवैज्ञानिक तथा प्रकल्पाचे तांत्रिक मार्गदर्शक.नाला खोलीकरण कामामुळे आम्हा शेतकºयांना चांगला फायदा झाला आहे. नाल्याला लागून शेत आहे. नाल्याचे पाणी शेतात न येता ते बंधाºयातच जमा होऊ लागले आहे. त्यामुळे पाणी उपलब्धता वाढली. आता चांगले उत्पन्न होण्यास मदत होणार आहे.- आकाश भगत, शेतकरी, साटोडा.