शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा तुर्कीला दणका, विमानतळांवर सेवा देणाऱ्या सेलेबी कंपनीची सुरक्षा मंजुरी केली रद्द!
2
बिहार दौऱ्यात राहुल गांधी यांच्याविरोधात दोन गुन्हे दाखल, पोलिसांनी शंभराहून अधिक जणांना केलं आरोपी
3
India Pakistan Ceasefire: "भारत-पाकिस्तान यांच्यात १८ मेपर्यंत शस्त्रसंधी"; पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री डार यांचे विधान
4
आधी ट्रम्प यांच्यावर भडकली, नंतर पोस्ट डिलीट; कंगना म्हणाली, "जेपी नड्डांनी डिलीट करायला सांगितली"
5
ED Raid: 23 कोटींचं सोनं, 8 कोटी रोख; वसई विरार मनपाचे नगररचना उपसंचालक रेड्डीकडे सापडली कोट्यवधींची माया
6
Donald Trump : "मी असं म्हणत नाही की..."; भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठे दावे करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची पलटी
7
सुटी रद्द झाल्याने कामावर परतणाऱ्या मेजरवर काळाचा घाला; डोळ्यादेखत पत्नीचा मृत्यू, लेक गंभीर जखमी
8
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
9
'गदर'मधला दरम्यान सिंग आठवतोय का? एका आजारामुळे झालं होत्याचं नव्हतं, अभिनेत्याचा झाला दुर्देवी शेवट
10
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
11
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 'लेडी सेहवाग'ला मिळाली कमबॅकची संधी
12
अटक करण्याची धमकी देत मागितली खंडणी: उल्हासनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निलंबित
13
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
14
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
15
आश्चर्यकारक! आरोपीने बलात्कार पिडितेला भरकोर्टात केलं 'प्रपोज'; सर्वोच्च न्यायालयातील प्रसंग
16
"बेटा, सरेंडर कर", दहशतवाद्याने चकमकीआधी आईला केलेला Video कॉल; तिने समजावलं पण...
17
Shahapur: डोंगरावरून उडणारा ड्रोन अचानक कोसळला अन् गावात उडाली खळबळ; तो ड्रोन कोणाचा?
18
Nagpur: संधी मिळताच प्रवाशांना लुटायचे, रेल्वे स्थानकांवर चोऱ्या करणारी टोळी अटकेत
19
Ganeshotsav 2025: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मूर्तिकारांसाठी बीएमसीची महत्त्वाची पोस्ट
20
"बॉलिवूडमध्ये मंदी आली आहे, छोट्या कलाकारांकडे तर...", कल्कि कोचलीनचा खुलासा

शेतात जमा होणारे पाणी पोहचले नाल्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 23:25 IST

दरवर्षी येणाºया पावसामुळे व पुरामुळे शेतात एखाद्या भागात पाणी जमा होवून राहत होते. त्यामुळे ही जागा शेतकºयाला पडिकच ठेवावी लागत होती.

ठळक मुद्देशेतकºयांचे नुकसान टळले : जाण्यासाठी रस्ता झाला तयार

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : दरवर्षी येणाºया पावसामुळे व पुरामुळे शेतात एखाद्या भागात पाणी जमा होवून राहत होते. त्यामुळे ही जागा शेतकºयाला पडिकच ठेवावी लागत होती. या पाण्यामुळे शेतजमीन खराबही होत होती. या त्रासातून शेतकºयाला कायम मुक्ती मिळाली आहे. वर्धा तालुक्याच्या महाकाळ व साटोडा या दोन गावातील २० शेतकºयांना सुक्ष्म पाणलोट विकास तत्वावर आधारित जलसंधारण प्रकल्पातून दिलासा मिळाला आहे.धाम नदीच्या काठावर असलेले साटोडा व महाकाळ हे दोन गावे या गावातील शेतकºयांना दरवर्षी पावसाळ्यात पुराच्या संकटाला समोर जावे लागत होते. अनेक शेतकºयांच्या शेतात पावसाचे पाणी जमा होवून राहत होते. उतराच्या भागावर असलेली शेतजमीन यामुळे खराब होवून गेली होती. पाण्याचा निचरा होत नव्हता. त्यामुळे मातीचे ही नुकसान शेतकºयाला झाले. या सर्व त्रासातून मुक्ती मिळावी म्हणून साटोडा व महाकाळ ग्रामसभेने ठराव घेवून गावाजवळून जाणाºया नाल्याचे खोलीकरण व रूंदीकरण याचे काम हाती घेण्याचे ठरविले. या कामासाठी सद्भावना ग्रामीण विकास संस्था, वर्धाचे मिलिंद भगत यांनी पुढाकार घेतला. या कामाला स्थापत्य अभियंता माधवराव कोटस्थाने यांचे मार्गदर्शन लाभले व कामाला सुरूवात झाली. या परिसरातल्या २० शेतकºयांच्या शेतात नाल्यालगत प्रत्येकी दोन पाईप टाकून शेताच्या उतारावर जमा होणारे पाणी नाल्यात सोडण्याचे काम हाती घेण्यात आले. तसेच या नाल्यावर गॅबीआॅन बंधारा बांधताना शेतकºयांचा रहदारीचा रस्ता बंद होणार नाही याची काळजी घेत दोन ठिकाणी बांध व ओलांडणीचा पुल तयार करून देण्यात आला. त्यामुळे नाला खोलीकरण होवून शेतातील पाणी ही नाल्यात जमा होवू लागले. जलस्त्रोताची पातळी उंचावण्यास मदत झाली.राज्यात सर्वत्र जलयुक्त शिवार योजनेतून जलसंधारणाची कामे केली जात आहे. यात नाल्यांचे मुख्य प्रवाह, वळण बदलवून टाकण्यात आले आहे. मात्र साटोडा व महाकाळ येथे उत्तम दर्जाचे कामे झाले आहेत. हे काम राज्याच्या इतर भागासाठी आदर्श ठरणारे आहेत.- रवींद्र काळी, ज्येष्ठ भूवैज्ञानिक तथा प्रकल्पाचे तांत्रिक मार्गदर्शक.नाला खोलीकरण कामामुळे आम्हा शेतकºयांना चांगला फायदा झाला आहे. नाल्याला लागून शेत आहे. नाल्याचे पाणी शेतात न येता ते बंधाºयातच जमा होऊ लागले आहे. त्यामुळे पाणी उपलब्धता वाढली. आता चांगले उत्पन्न होण्यास मदत होणार आहे.- आकाश भगत, शेतकरी, साटोडा.