शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

शेतात जमा होणारे पाणी पोहचले नाल्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 23:25 IST

दरवर्षी येणाºया पावसामुळे व पुरामुळे शेतात एखाद्या भागात पाणी जमा होवून राहत होते. त्यामुळे ही जागा शेतकºयाला पडिकच ठेवावी लागत होती.

ठळक मुद्देशेतकºयांचे नुकसान टळले : जाण्यासाठी रस्ता झाला तयार

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : दरवर्षी येणाºया पावसामुळे व पुरामुळे शेतात एखाद्या भागात पाणी जमा होवून राहत होते. त्यामुळे ही जागा शेतकºयाला पडिकच ठेवावी लागत होती. या पाण्यामुळे शेतजमीन खराबही होत होती. या त्रासातून शेतकºयाला कायम मुक्ती मिळाली आहे. वर्धा तालुक्याच्या महाकाळ व साटोडा या दोन गावातील २० शेतकºयांना सुक्ष्म पाणलोट विकास तत्वावर आधारित जलसंधारण प्रकल्पातून दिलासा मिळाला आहे.धाम नदीच्या काठावर असलेले साटोडा व महाकाळ हे दोन गावे या गावातील शेतकºयांना दरवर्षी पावसाळ्यात पुराच्या संकटाला समोर जावे लागत होते. अनेक शेतकºयांच्या शेतात पावसाचे पाणी जमा होवून राहत होते. उतराच्या भागावर असलेली शेतजमीन यामुळे खराब होवून गेली होती. पाण्याचा निचरा होत नव्हता. त्यामुळे मातीचे ही नुकसान शेतकºयाला झाले. या सर्व त्रासातून मुक्ती मिळावी म्हणून साटोडा व महाकाळ ग्रामसभेने ठराव घेवून गावाजवळून जाणाºया नाल्याचे खोलीकरण व रूंदीकरण याचे काम हाती घेण्याचे ठरविले. या कामासाठी सद्भावना ग्रामीण विकास संस्था, वर्धाचे मिलिंद भगत यांनी पुढाकार घेतला. या कामाला स्थापत्य अभियंता माधवराव कोटस्थाने यांचे मार्गदर्शन लाभले व कामाला सुरूवात झाली. या परिसरातल्या २० शेतकºयांच्या शेतात नाल्यालगत प्रत्येकी दोन पाईप टाकून शेताच्या उतारावर जमा होणारे पाणी नाल्यात सोडण्याचे काम हाती घेण्यात आले. तसेच या नाल्यावर गॅबीआॅन बंधारा बांधताना शेतकºयांचा रहदारीचा रस्ता बंद होणार नाही याची काळजी घेत दोन ठिकाणी बांध व ओलांडणीचा पुल तयार करून देण्यात आला. त्यामुळे नाला खोलीकरण होवून शेतातील पाणी ही नाल्यात जमा होवू लागले. जलस्त्रोताची पातळी उंचावण्यास मदत झाली.राज्यात सर्वत्र जलयुक्त शिवार योजनेतून जलसंधारणाची कामे केली जात आहे. यात नाल्यांचे मुख्य प्रवाह, वळण बदलवून टाकण्यात आले आहे. मात्र साटोडा व महाकाळ येथे उत्तम दर्जाचे कामे झाले आहेत. हे काम राज्याच्या इतर भागासाठी आदर्श ठरणारे आहेत.- रवींद्र काळी, ज्येष्ठ भूवैज्ञानिक तथा प्रकल्पाचे तांत्रिक मार्गदर्शक.नाला खोलीकरण कामामुळे आम्हा शेतकºयांना चांगला फायदा झाला आहे. नाल्याला लागून शेत आहे. नाल्याचे पाणी शेतात न येता ते बंधाºयातच जमा होऊ लागले आहे. त्यामुळे पाणी उपलब्धता वाढली. आता चांगले उत्पन्न होण्यास मदत होणार आहे.- आकाश भगत, शेतकरी, साटोडा.