शहरं
Join us  
Trending Stories
1
१२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
2
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
3
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
4
पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान
5
स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली; युद्धासाठी तयार आहोत; पाकच्या नौदल प्रमुखाचं विधान
6
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
7
'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलीबाबत राहुल गांधींचे मोठे विधान
8
स्मरण दिन: नियमितपणे श्री शंकर महाराजांची बावन्नी म्हणा, शुभ पुण्य फल मिळवा; जय शंकर!
9
आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...
10
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
11
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
12
प्रार्थना बेहेरेच्या घरी आला नवा पाहुणा, नावही आहे खूपच ट्रेडिंग; नवऱ्याला वचन देत म्हणाली...
13
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
14
Jasprit Bumrah: आयपीएलदरम्यान जसप्रीत बुमराहनं पत्नी संजनाला नेलं डेटवर, शेअर केला खास फोटो
15
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
16
Dewald Brevis DRS: डेवॉल्ड ब्रेव्हिसच्या विकेटवरून गोंधळ, आरसीबी- सीएसकेच्या समर्थकांमध्ये तूतू-मैमै!
17
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
18
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
19
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
20
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...

गेट बंद ठेवून अडविले जाते पाणी; शेतकरी त्रस्त

By admin | Updated: November 1, 2015 02:37 IST

सिंचन प्रकल्पांतून सध्या शेतकऱ्यांच्या पिकांकरिता पाणी सोडण्यात आले आहे.

अध्यक्षाची मनमानी : इतरांची पिके राहतात असिंचितआकोली : सिंचन प्रकल्पांतून सध्या शेतकऱ्यांच्या पिकांकरिता पाणी सोडण्यात आले आहे. यात पाणी वाटप सहकारी संस्थेचा अध्यक्ष स्वत:चे ओलित होईपर्यंत कालव्याचे गेट बंद करतात. यामुळे अन्य शेतकऱ्यांची पिकांचे सिंचन रखडले आहे. याकडे लक्ष देत कारवाई करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.आंजी-बोरखेडी तलाव पाणी वाटप सहकारी संस्थेचे अध्यक्ष सुरेश ढोकणे हे स्वत:चे व आप्तांचे सिंचन होईपर्यंत इतर गेट बंद ठेवतात. यामुळे वैफल्यग्रस्त शेतकरी आंदोलनाच्या तयारीत आहेत. शिवाय पाणी कराची रक्कम जमा करून पावती दिली जात नसल्याची ओरड होत आहे. आंजी-बोरखेडी तलावाच्या लाभ क्षेत्रात मदनी, आमगाव, आंजी व बोरली शिवारातील शेती येते. यातील ऊस पिकासाठी ५ हजार २०० रुपये हेक्टर व इतर पिकांसाठी २ हजार रुपये भरून सिंचनासाठी पाणी घेता येते. येथील गेटच्या चाव्या संस्थाध्यक्ष कर्मचाऱ्यांकडे न देता स्वत:कडे ठेवतात. संस्थाध्यक्षाचा दहा एकरात ऊस असून इतर नातेवाईकांचाही ऊस आहे. आपल्या पिकांचे ओलित होईपर्यंत इतर गेट बंद ठेवले जात असल्याची ओरड शेतकऱ्यांतून होत आहे. येथील तलावाचे व्यवस्थापन दहेगाव (गोंडी) कार्यालयाकडे असून शाखा अभियंत्याचा वचक नाही. अध्यक्ष ढोकणे यांनी मुख्य कालव्यात सिमेंटचा चबुतरा बांधून पाण्याला अवरोध निर्माण केला. यामुळे त्यांच्या शेतात अधिक पाणी येते तर इतरांना बांधावर वाट पाहावी लागते. पाणी कर नगदी भरण्याऱ्या शेतकऱ्यांची नावे साखर कारखान्याला वसुलीकरिता दिलेल्या यादीत समाविष्ट केली असून एकाच पाणी कराची दोन वेळा वसूली केली जात आहे.(वार्ताहर)