शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

गेट बंद ठेवून अडविले जाते पाणी; शेतकरी त्रस्त

By admin | Updated: November 1, 2015 02:37 IST

सिंचन प्रकल्पांतून सध्या शेतकऱ्यांच्या पिकांकरिता पाणी सोडण्यात आले आहे.

अध्यक्षाची मनमानी : इतरांची पिके राहतात असिंचितआकोली : सिंचन प्रकल्पांतून सध्या शेतकऱ्यांच्या पिकांकरिता पाणी सोडण्यात आले आहे. यात पाणी वाटप सहकारी संस्थेचा अध्यक्ष स्वत:चे ओलित होईपर्यंत कालव्याचे गेट बंद करतात. यामुळे अन्य शेतकऱ्यांची पिकांचे सिंचन रखडले आहे. याकडे लक्ष देत कारवाई करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.आंजी-बोरखेडी तलाव पाणी वाटप सहकारी संस्थेचे अध्यक्ष सुरेश ढोकणे हे स्वत:चे व आप्तांचे सिंचन होईपर्यंत इतर गेट बंद ठेवतात. यामुळे वैफल्यग्रस्त शेतकरी आंदोलनाच्या तयारीत आहेत. शिवाय पाणी कराची रक्कम जमा करून पावती दिली जात नसल्याची ओरड होत आहे. आंजी-बोरखेडी तलावाच्या लाभ क्षेत्रात मदनी, आमगाव, आंजी व बोरली शिवारातील शेती येते. यातील ऊस पिकासाठी ५ हजार २०० रुपये हेक्टर व इतर पिकांसाठी २ हजार रुपये भरून सिंचनासाठी पाणी घेता येते. येथील गेटच्या चाव्या संस्थाध्यक्ष कर्मचाऱ्यांकडे न देता स्वत:कडे ठेवतात. संस्थाध्यक्षाचा दहा एकरात ऊस असून इतर नातेवाईकांचाही ऊस आहे. आपल्या पिकांचे ओलित होईपर्यंत इतर गेट बंद ठेवले जात असल्याची ओरड शेतकऱ्यांतून होत आहे. येथील तलावाचे व्यवस्थापन दहेगाव (गोंडी) कार्यालयाकडे असून शाखा अभियंत्याचा वचक नाही. अध्यक्ष ढोकणे यांनी मुख्य कालव्यात सिमेंटचा चबुतरा बांधून पाण्याला अवरोध निर्माण केला. यामुळे त्यांच्या शेतात अधिक पाणी येते तर इतरांना बांधावर वाट पाहावी लागते. पाणी कर नगदी भरण्याऱ्या शेतकऱ्यांची नावे साखर कारखान्याला वसुलीकरिता दिलेल्या यादीत समाविष्ट केली असून एकाच पाणी कराची दोन वेळा वसूली केली जात आहे.(वार्ताहर)