शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

श्रमदानासाठी येणाऱ्यांचे स्वागत करते सांडपाणी

By admin | Updated: May 15, 2017 00:37 IST

गावात सध्या वाटर कप स्पर्धेची धामधूम आहे. गाव पाणीदार करण्यासाठी ग्रामस्थ सकाळ-सायंकाळ श्रमदान करीत आहे.

डासांचा वाढता प्रादुर्भाव : स्मार्ट गाव म्हणून मिरविणाऱ्या गावातच दुर्गंधीचे साम्राज्य लोकमत न्यूज नेटवर्क विरूळ (आकाजी) : गावात सध्या वाटर कप स्पर्धेची धामधूम आहे. गाव पाणीदार करण्यासाठी ग्रामस्थ सकाळ-सायंकाळ श्रमदान करीत आहे. सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते, अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी गावात येऊन श्रमदान करीत आहे. ग्रा.पं. प्रशासन एक महिन्यापासून या कामी आहे. मागील आठवड्यात गावाला दहा लाखांचा पुरस्कारही जाहीर झाला. स्मार्ट ग्राम स्पर्धेत आर्वी तालुक्यातून प्रथम येण्याचा मान गावाने पटकाविला. ही आनंदाची बाब असली तरी समस्या ‘जैसे थे’ आहेत. गावातील नाल्या पूर्णत: बुजल्या आहे. भवानी वॉर्डातील प्राथमिक शाळेजवळची नाली बजून सांडपाणी रस्त्यावरून वाहत आहे. यामुळे या वॉर्डात घाणीचे साम्राज्य निर्माण होऊन डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. गावातील अनेक नाल्यांची हीच स्थिती आहे. एकीकडे स्वच्छ भारत मिशन राबविले जात आहे; पण येथील ग्रा.प. या मिशनला ग्रहण लावत असल्याचे गावात आल्यावर दिसून येते. काही दिवसांतच पावसाळा सुरू होणार असल्याने गावातील नाल्या उपसणे गरजेचे आहे. अन्यथा नागरिकांच्या घरांत पाणी शिरण्याची शक्यता नाकारता येत नाही. भवानी वॉर्डातील नाल्यांचे तर एकदमच खस्ताहाल झाले आहे. मागील ३० वर्षांपासून या नाल्यांचे बांधकाम करण्यात आले नाही. यामुळे ही नाली पूर्णत: खचली असून बुजली आहे. या नालीचे बांधकाम करून ती ऊंच करण्याची गरज व्यक्त होत आहे. ज्यांची घरे या नाल्यांच्या काठावर आहे, त्यांना साप, विंचु, किटकांचा त्रास सहन करावा लागत आहे. गावातील काही नागरिकांनी शेणखतांचे ढिगारे ऐन रस्त्यावर आणून टाकले आहे. गावात मुख्य चौकात दोन हायस्कूल, कॉलेज आहे. या शाळांसमोरच काही नागरिक शौचास बसत असल्याचे दिसते. यामुळे विद्यार्थी, शिक्षक व नागरिकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागतो. गावाच्या मुख्य चौकातच उघड्यावर बकऱ्या, कोंबड्यांची कत्तल होत असल्याने घाण होत असून आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. या सर्व समस्यांकडे ग्रा.प.ने लक्ष देण्याची गरज आहे. वॉटर कप स्पर्धेत ग्रामस्थांनी केलेल्या श्रमदानामुळे गावास नावलौकिक प्राप्त होत आहे. यामुळे शासनाचे अधिकारी, पदाधिकारी गावास भेटी देतात; पण त्यांना गाव स्वच्छ दिसावे, याची दक्षता घेणे गरजेचे झाले आहे.