शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

वर्धा नदीपात्राला सर्वत्र घाणीचा विळखा

By admin | Updated: October 27, 2015 03:25 IST

जिल्ह्याची ओळख असलेली वर्धा(पूर्वीचे नाव वरदा) नदी ही जिल्ह्यासाठी वरदान ठरली आहे. नदीला मोठी सांस्कतिक परंपरा

वर्धा : जिल्ह्याची ओळख असलेली वर्धा(पूर्वीचे नाव वरदा) नदी ही जिल्ह्यासाठी वरदान ठरली आहे. नदीला मोठी सांस्कतिक परंपरा लाभली आहे. परंतु या नदीपात्राची स्वच्छता होत नसल्याने पात्राला अवकळा आल्याचे चित्र सध्या पुलगाव परिसरात पहावयास मिळत आहे. परिसरात वर्धा नदीचे मोठे पात्र लाभले आहे. हजारो हेक्टर शेतजमीन यामुळे सिंचित झाली आहे. परंतु संबंधित विभागाच्या उदासीन धोरणामुळे पुलगाव परिसरात वर्धा नदीपात्राला अवकळा आली आहे. परिसरात सर्वत्र हराळी शेवाळ आणि तण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. या शेवाळामुळे नैसर्गिक प्रवाह काही प्रमाणात अवरुद्ध होत आहे. तसेच शेवाळामुळे गाळ साचून त्यात विषाणूंची निर्मिती होऊन पाण्याला दुर्गंधी सुटली आहे. या नदीकाठावर अनेक प्राचीन मंदिरे आहेत. त्यामुळे धार्मिक आणि सांस्कतिकदृष्ट्याही या नदीला आणि पुलगाव परिसराला मोठे महत्त्व आहे. अधिक महिन्यात हा परिसर भक्तांनी गजबजलेला असतो. असे असतानाही शासकीय यंत्रणेद्वारे नदीपात्र स्वच्छ ठेवण्याकडे कुठलीही ठोस पावले उचलली जात नाही. पुलगाव शहराला याच पात्रातून पाणीपुरवठा होतो. परंतु पात्र प्रवाही नसल्याने पाण्याद्वारे शेवाळही ओढले जाऊत ते पाईपमध्ये साचते. पुलगाव शहरातील गणेशोत्सव आणि दूर्गोत्सव हे दोन्ही सण उत्साहात भव्य प्रमाणात साजरे केले जातात. त्यामुळे हजारोंच्या संख्येने मूर्ती नदीपात्रात विसर्जित होतात. त्यामुळेही पात्र दूषित होते. आजघडीला शेवाळ आणि हराळी तण वाढल्याने नदीपात्र उथळ झाले आहे. मोठ्या प्रमाणात गाळ येथे साचला आहे. परिणामी पाण्याची साठवणक्षमता ही कमी होत चालली आहे. पाणी दुर्गंधीयुक्त झाल्याने त्वचेचे आजार वाढत आहे. नदीवर दोन मोठी धरणे बांधण्यात आल्याने पूर्वीप्रमाणे नदी प्रवाही राहात नाही. याचाही परिणाम होऊन अनेक ठिकाणी नदी केवळ डबक्यासारखी झाली आहे. या सर्व बाबी ध्यानात घेत वर्धा नदी स्वच्छता मोहीम हाती घावी अशी मागणी होत आहे.(शहर प्रतिनिधी) याच नदीमुळे वर्धा आणि अमरावती हे जिल्हे विभागले गेले आहे. नदीवर असलेल्या पुलावरून अमरावतीकडे मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. दिवसभर या पुलावरून वाहनांची वर्दळ सुरू असते. असे असतानाही या इंग्रजकालीन पुलावर कठडे नाही. परिणामी अपघाताची शक्यता बळावली आहे. मोठ्या प्रमाणात बसेस आणि अवजड वाहनेही या पुुलावरून धावतात. एखादे वाहन अनियंत्रित झाल्यास प्रवाश्यांना जीव गमवावा लागू शकतो. ४काहीच दिवसांपूर्वी या पुलाची दुरुस्ती करण्यात आली. परंतु दुरुस्तीदरम्यान येथे कठडे लावण्याचा प्रशासनाला विसर पडला. अपघाताची शक्यता लक्षात घेता येथे कठडे लावण्याची गरज प्रवासी व्यक्त करतात. नदीपात्रात वाहनेही धुतली जातातयेथील अनेक वाहनधारक आपली अवजड वाहने सरळ नदीपात्रात धुण्यासाठी आणतात. त्यामुळे नदीपात्र दूषित होते. तसेच पात्रातून नियमबाह्य रेतीचा उपसा हा केला जातोच. त्यामुळेही नदीची मोठ्या प्रमाणात वाताहत होत आहे. गणेश व दूर्गा मूर्ती येथे विसर्जित करण्यात येतात. परंतु विसर्जन प्रक्रिया आटोपल्यानंतर पात्रातून गाळाचा उपसा केला जात नाही. यात स्थानिक प्रशासनाची उदासीनता निदर्शनास येते. प्राचीन परंपरेने समृद्ध असलेल्या या नदीला आणि पुलगाव येथील नदीपात्राला या काही वर्षात अवकळा पसरली आहे. पाणी दूषित होऊन नागरिकांना त्वचेचे आजार बळावण्याची शक्यता आहे. परिसरातील सामाजिक संघटनाही पात्राच्या स्वच्छतेकडे लक्ष देत नसल्याने सामान्य नागरिक संताप व्यक्त करतात.