शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

वर्धा नदीपात्राला सर्वत्र घाणीचा विळखा

By admin | Updated: October 27, 2015 03:25 IST

जिल्ह्याची ओळख असलेली वर्धा(पूर्वीचे नाव वरदा) नदी ही जिल्ह्यासाठी वरदान ठरली आहे. नदीला मोठी सांस्कतिक परंपरा

वर्धा : जिल्ह्याची ओळख असलेली वर्धा(पूर्वीचे नाव वरदा) नदी ही जिल्ह्यासाठी वरदान ठरली आहे. नदीला मोठी सांस्कतिक परंपरा लाभली आहे. परंतु या नदीपात्राची स्वच्छता होत नसल्याने पात्राला अवकळा आल्याचे चित्र सध्या पुलगाव परिसरात पहावयास मिळत आहे. परिसरात वर्धा नदीचे मोठे पात्र लाभले आहे. हजारो हेक्टर शेतजमीन यामुळे सिंचित झाली आहे. परंतु संबंधित विभागाच्या उदासीन धोरणामुळे पुलगाव परिसरात वर्धा नदीपात्राला अवकळा आली आहे. परिसरात सर्वत्र हराळी शेवाळ आणि तण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. या शेवाळामुळे नैसर्गिक प्रवाह काही प्रमाणात अवरुद्ध होत आहे. तसेच शेवाळामुळे गाळ साचून त्यात विषाणूंची निर्मिती होऊन पाण्याला दुर्गंधी सुटली आहे. या नदीकाठावर अनेक प्राचीन मंदिरे आहेत. त्यामुळे धार्मिक आणि सांस्कतिकदृष्ट्याही या नदीला आणि पुलगाव परिसराला मोठे महत्त्व आहे. अधिक महिन्यात हा परिसर भक्तांनी गजबजलेला असतो. असे असतानाही शासकीय यंत्रणेद्वारे नदीपात्र स्वच्छ ठेवण्याकडे कुठलीही ठोस पावले उचलली जात नाही. पुलगाव शहराला याच पात्रातून पाणीपुरवठा होतो. परंतु पात्र प्रवाही नसल्याने पाण्याद्वारे शेवाळही ओढले जाऊत ते पाईपमध्ये साचते. पुलगाव शहरातील गणेशोत्सव आणि दूर्गोत्सव हे दोन्ही सण उत्साहात भव्य प्रमाणात साजरे केले जातात. त्यामुळे हजारोंच्या संख्येने मूर्ती नदीपात्रात विसर्जित होतात. त्यामुळेही पात्र दूषित होते. आजघडीला शेवाळ आणि हराळी तण वाढल्याने नदीपात्र उथळ झाले आहे. मोठ्या प्रमाणात गाळ येथे साचला आहे. परिणामी पाण्याची साठवणक्षमता ही कमी होत चालली आहे. पाणी दुर्गंधीयुक्त झाल्याने त्वचेचे आजार वाढत आहे. नदीवर दोन मोठी धरणे बांधण्यात आल्याने पूर्वीप्रमाणे नदी प्रवाही राहात नाही. याचाही परिणाम होऊन अनेक ठिकाणी नदी केवळ डबक्यासारखी झाली आहे. या सर्व बाबी ध्यानात घेत वर्धा नदी स्वच्छता मोहीम हाती घावी अशी मागणी होत आहे.(शहर प्रतिनिधी) याच नदीमुळे वर्धा आणि अमरावती हे जिल्हे विभागले गेले आहे. नदीवर असलेल्या पुलावरून अमरावतीकडे मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. दिवसभर या पुलावरून वाहनांची वर्दळ सुरू असते. असे असतानाही या इंग्रजकालीन पुलावर कठडे नाही. परिणामी अपघाताची शक्यता बळावली आहे. मोठ्या प्रमाणात बसेस आणि अवजड वाहनेही या पुुलावरून धावतात. एखादे वाहन अनियंत्रित झाल्यास प्रवाश्यांना जीव गमवावा लागू शकतो. ४काहीच दिवसांपूर्वी या पुलाची दुरुस्ती करण्यात आली. परंतु दुरुस्तीदरम्यान येथे कठडे लावण्याचा प्रशासनाला विसर पडला. अपघाताची शक्यता लक्षात घेता येथे कठडे लावण्याची गरज प्रवासी व्यक्त करतात. नदीपात्रात वाहनेही धुतली जातातयेथील अनेक वाहनधारक आपली अवजड वाहने सरळ नदीपात्रात धुण्यासाठी आणतात. त्यामुळे नदीपात्र दूषित होते. तसेच पात्रातून नियमबाह्य रेतीचा उपसा हा केला जातोच. त्यामुळेही नदीची मोठ्या प्रमाणात वाताहत होत आहे. गणेश व दूर्गा मूर्ती येथे विसर्जित करण्यात येतात. परंतु विसर्जन प्रक्रिया आटोपल्यानंतर पात्रातून गाळाचा उपसा केला जात नाही. यात स्थानिक प्रशासनाची उदासीनता निदर्शनास येते. प्राचीन परंपरेने समृद्ध असलेल्या या नदीला आणि पुलगाव येथील नदीपात्राला या काही वर्षात अवकळा पसरली आहे. पाणी दूषित होऊन नागरिकांना त्वचेचे आजार बळावण्याची शक्यता आहे. परिसरातील सामाजिक संघटनाही पात्राच्या स्वच्छतेकडे लक्ष देत नसल्याने सामान्य नागरिक संताप व्यक्त करतात.