शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
2
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
3
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
4
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
5
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
6
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
7
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
8
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
9
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
10
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
11
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
12
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
13
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
14
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
15
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
16
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
17
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
18
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
19
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
20
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...

बंदीनंतरही वर्धेकरांचा सुसाट संचार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 5:00 AM

जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून त्यात सर्वाधिक रुग्ण वर्धा तालुक्यात आढळून येत आहे. कोरोनाची ही संसर्ग साखळी तोडण्याकरिता नागरिकांनी घरातच रहावे, याकरिता पंधरा दिवसांची संचारबंदी लागू केली आहे. पण, नागरिक अद्यापही गंभीर नसल्याचे चित्र पहावयास मिळाले. शासनाने जीवनावश्यक वस्तुंची दुकाने, बँका सुरु ठेवण्यास परवानगी दिल्याने याचाच आधार घेत नागरिक विनाकारण रस्त्याने फिरतांना दिसून आले.

ठळक मुद्देरस्त्यावरील गर्दी रात्रीपर्यंत कायमच : पोलिसांचाही अल्पावधीतच हटला पहारा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोनाचा वाढता प्रकोप लक्षात घेता शासनाने ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत १४ एप्रिलच्या रात्री ८ वाजतापासून १ मे रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत संचारबंदी लागू केली आहे. परंतु पहिल्याच दिवशी याला वर्धेकरांनी हरताळ फासल्याचे चित्र बघायला मिळाले. सकाळपासून सायंकाळी उशिरापर्यंत रस्त्यावर नागरिकांचा मुक्त संचार राहिल्याने ही स्थिती कोरोनाला निमंत्रण देणारी आहे.जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून त्यात सर्वाधिक रुग्ण वर्धा तालुक्यात आढळून येत आहे. कोरोनाची ही संसर्ग साखळी तोडण्याकरिता नागरिकांनी घरातच रहावे, याकरिता पंधरा दिवसांची संचारबंदी लागू केली आहे. पण, नागरिक अद्यापही गंभीर नसल्याचे चित्र पहावयास मिळाले. शासनाने जीवनावश्यक वस्तुंची दुकाने, बँका सुरु ठेवण्यास परवानगी दिल्याने याचाच आधार घेत नागरिक विनाकारण रस्त्याने फिरतांना दिसून आले. पोलिसांनीही शहरातील शिवाजी चौक, आर्वीनाका, पावडे चौक आदी परिसरात नाकेबंदी करुन नागरिकांना सूचना केल्यात. तसेच शिवाजी चौकामध्ये वाहने अडवून काहींकडून दंडही आकारण्यात आला. पण, पोलिसांचीही नाकेबंदी औटघटकेची ठरल्याने नागरिकही सुसाट झालेत. बसस्थानकावर प्रवाशांची गर्दी ओसरलेले पहावयास मिळाली पण, बसस्थानकाबाहेर गर्दी दिसून आली. जिल्ह्यात इतरही ठिकाणी संचारबंदीचे तीनतेरा वाजलेलेच दिसून आले.

आदेशानंतरही खासगी शाळा सुरुचशासनाच्या आदेशानुसार सर्व शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश आहे. इयत्ता दहावी व बारावी विद्यार्थ्यांच्या परीक्षेकरिता नियमात शिथिलता देण्यात आली आहे. असे असतानाही गुरुवारी बऱ्याच खासगी तसेच अनुदानित शाळांमध्ये शिक्षकांची उपस्थिती दिसून आली आहे. शाळा व्यवस्थापनही शिक्षकांना शाळेत येण्याची सक्ती करीत असल्याने यावर कारवाई होणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

कुंभमेळ्यातून येणाऱ्यांनी आधी तपासणी करावी जिल्ह्यातील काही भाविक कुंभमेळ्याकरिता गेले आहेत. ते परतीच्या मार्गावर असून जिल्ह्यात दाखल होणार आहेत. सर्व भक्तांनी जिल्ह्यात आल्यानंतर स्वत: कोविड सेंटरमध्ये जावून तपासणी करुन घ्यावी. तसेच गृहविलगीकरणात राहून नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. तसेच कुंभमेळ्याकरिता गेलेल्यांची माहिती मिळाल्यास पोलीस नियंत्रण कक्षातील १०० क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार व एसपी प्रशांत होळकर यांनी केले.

आता दंड नकोत, दंडुकाच हवाय !

प्रशासनाकडून नागरिकांच्या आरोग्याकरिता उपाययोजना करुन ‘घरी रहा, सुरक्षित रहा’ असे आवाहन केले जात आहे. पंधरा दिवस संचारबंदी कायम ठेवण्याकरिता पोलीस प्रशासनाकडूनही कंबर कसण्यात आली आहे. याकरिता ९० पोलीस अधिकारी, ७०० पोलीस कर्मचारी तर ५०० गृहरक्षक दलाचे कर्मचारी तैनात करण्यात आले आहे. पहिल्या दिवशी पोलीस प्रशासनाने नागरिकांना नियम पाळण्याचे आवाहन केले. पण, नागरिक जुमानत नसल्याचे दिसून येत असल्यामुळे आता दंड नकोत, दंडाच हवाय, अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. रस्त्यावर होत असलेली गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाने कठोर भूमिका घेण्यापूर्वीच ‘आपले कुटुंब, आपली जबाबदारी’ ओळखून या महामारीच्या काळातसर्वांनी सहकार्य करण्याची गरज आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिस