शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
2
कृषिमंत्री कोकाटे किती मिनिटे रमी खेळत होते?, विधिमंडळ चौकशी अहवालात उघड, रोहित पवारांचा दावा
3
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
4
"हा माझा नवरा"; इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर हायव्होल्टेज ड्रामा; मृतदेहासाठी २ बायका भिडल्या, अखेर...
5
NSDL IPO: ८०० रुपये प्राईज बँड, १२७ रुपये GMP; LIC नं केली गुंतवणूक, तुमचा विचार काय?
6
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
7
रश्मिका मंदानाची कॉपी? छत्रपती संभाजीनगरची लेक, विजय देवरकोंडासोबत करणार रोमान्स
8
'ऑपरेशन महादेव'नंतर आता 'ऑपरेशन शिवशक्ती' सुरू! भारतीय सैन्याने दोन दहशतवाद्यांना घातलं कंठस्नान
9
थंडबस्त्यात गेला अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' सिनेमा, रेणुका शहाणे म्हणाल्या - "मला धक्काच बसला.."
10
कमाल! स्मार्टफोन App द्वारे आतड्यांतील बॅक्टेरियावर नियंत्रण, आली ओरल कॅप्सूल, कसा होणार फायदा?
11
Kamchatka Earthquake: ५ जुलैचे भविष्य ३० जुलैला खरे होणार? रशियातील भुकंपाच्या उंच लाटा जपानच्या किनाऱ्यावर धडकू लागल्या...
12
"दीड लाख देऊन इथं आलोय, मला बोलू द्या..."; संसदेत हजेरी लावणं खासदार राशीद यांना इतकं महाग का पडलं?
13
Reliance Jio ची आपल्या ग्राहकांना मोठी भेट; फक्त ₹५९९ मध्ये घरच्या TV ला बनवा कॉम्प्यूटर
14
PM किसान योजनेचा २० वा हप्ता जाहीर! २००० रुपये थेट बँक खात्यात, लगेच 'असं' तपासा तुमचं नाव!
15
भीक मागणाऱ्या व्यक्तीच्या दोन बायका, आता त्याची तक्रार तर ऐका; कलेक्टरकडे पोहोचला अन् म्हणाला...
16
Pranjal Khewalkar Arrest : मोबाईलमधून हाऊस पार्टीतील महिलांशी केलेली चॅटिंग व पार्टीचे व्हिडिओ सापडले
17
UPI मध्ये १ ऑगस्टपासून होणार बदल; बॅलन्स चेक ते ऑटो-पे पर्यंत सर्वकाही बदलणार, पाहा तुमच्यासाठी काय नवं?
18
Sonam Raghuvanshi : बेवफा सोनमवर चित्रपट येणार, 'हे' नाव असणार; दिग्दर्शकाने घेतली राजा रघुवंशीच्या भावाची भेट
19
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात; Sensex १९० अंकांपेक्षा जास्त वधारला, 'या' शेअर्समध्ये तेजी
20
शेजारी राहणाऱ्या महिलेवर केले वार, गुप्तांगावरही ओरबाडलं अन् जंगलात फेकून दिलं! तरुण का झाला हैवान?

वर्ध्याच्या शेतकऱ्याला कर्जमाफीचा संदेश तर आला; पण रक्कम नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 11:47 IST

कर्जमाफी झाल्याचा संदेश शेतकऱ्यांच्या मोबाईलवर आला. मात्र बँकेत जाऊन चौकशी केली असता खात्यात रक्कमच जमा नसल्याचा अजब प्रकार समोर येत आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांची थट्टा कायमबँकांकडून मार्गदर्शन करण्यास टाळाटाळ

रूपेश खैरी ।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना अंमलात आली तेव्हापासून सुरू झालेला गोंधळ आजही कायम आहे. कर्जमाफी झाल्याचा संदेश शेतकऱ्यांच्या मोबाईलवर आला. मात्र बँकेत जाऊन चौकशी केली असता खात्यात रक्कमच जमा नसल्याचा अजब प्रकार समोर येत आहे.वर्धा जिल्ह्यातील वायफड येथील शेतकरी अनिल लक्ष्मणराव चरडे यांच्यासोबत असाच प्रकार घडला. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांसह मुख्यमंत्र्यांनाही पत्रव्यवहार केला; परंतु मोबाईलवर कर्जमाफीचा संदेश आल्यानंतर त्यांनी लगेच कर्जाची उचल केलेल्या वायफड येथील बँक आॅफ बडोदाची शाखा गाठून चौकशी केली. मात्र तिथे त्यांच्या खात्यात कुठलीच रक्कम जमा झाली नसल्याचे कळले. त्यांनी विचारणा केली असता प्रतीक्षा करा असे उत्तर मिळाले. याला दोन महिने होत आहेत.चरडे यांनी १९ मे २०१६ रोजी ९० हजार रुपयांचे कर्ज उचलले होते. या कर्जावर व्याज चढून ते ९३ हजार रुपये झाले. कर्जमाफी योजनेची घोषणा होताच निर्देशानुसार अर्ज भरला. त्यात कोणतीही त्रुटी नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्रुटी असलेल्या यादीत आपले नावही तपासले असता त्यात नाव नसल्याचे त्यांनी सांगितले. असे असताना कर्जमाफी झाल्याचा संदेश आल्याने आपला सातबारा कोरा झाल्याचे स्वप्न रंगविणाऱ्या या शेतकऱ्यांवर बँकांचे आणि प्रशासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजविण्याची वेळ आली आहे.

मग, कर्जमाफीचा संदेश कसा?३१ मार्च २०१६ पर्यंतचेच कर्ज माफ करण्याचे आदेश बँकेला असताना १९ मे २०१६ रोजी कर्ज घेणाऱ्या या शेतकऱ्याला कर्जमाफी झाल्याचा संदेश कसा, असा नवा प्रश्न समोर येत आहे. कर्जमाफी राबविणाऱ्या यंत्रणेची ही चूक असेल तर अशी चूक शेतकऱ्याच्या जीवावर उठणारी ठरू शकते, याची जाणीव या यंत्रणेला नाही का, असा सवाल शेतकरी करीत आहेत.

३१ मार्च २०१६ पर्यतचे कर्ज माफ करण्याचे आदेश बँकांना आले आहेत हे खरे आहे. पण यानंतर कर्ज उचललेल्या शेतकऱ्याला कर्जमाफीचा संदेश कसा आला हा संशोधनाचा विषय आहे. या शेतकऱ्याने जिल्हा बँकेशी संपर्क साधावा.- वामन कोहाड, व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक, वर्धा.

असा प्रकार घडलेल्या शेतकऱ्याने आमच्याशी संपर्क साधावा. या संदर्भात काय गडबड झाली याची चौकशी करण्यात येईल. नियमानुसार संदेश आल्यानंतर ती रक्कम खात्यातून माफ होणे अनिवार्य आहे.- शैलेश नवाल, जिल्हाधिकारी,वर्धा

टॅग्स :Farmerशेतकरी