शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

स्वतंत्र विदर्भाकरिता वर्धेत आंदोलन

By admin | Updated: May 1, 2015 23:55 IST

वेगळ्या विदर्भाकरिता स्वतंत्र विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने शुक्रवारी महात्मा गांधी पुतळ्याजवळ आंदोलन व नारे निदर्शने करण्यात आली.

कार्यकर्ते स्थानबद्ध : पोलिसांचा तगडा बंदोबस्त, शासनाचा निषेधवर्धा : वेगळ्या विदर्भाकरिता स्वतंत्र विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने शुक्रवारी महात्मा गांधी पुतळ्याजवळ आंदोलन व नारे निदर्शने करण्यात आली. तसेच यावेळी प्रंतप्रधान व मुख्यमंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले जाणार होते. आंदोलनाकरिता समितीचे पदाधिकारी जमा झाले; मात्र पोलीस बंदोेबस्त असल्याने पुतळ्याचे दहन न करताच आंदोलकांना निषेध नोंदवूनच समाधान मानावे लागले. यावेळी शहर पोलिसांनी उपस्थित सदस्यांना अटक करून स्थानबद्ध केले.स्वतंत्र विदर्भ राज्याकरिता अनेक वर्षांपासून आंदोलन सुरू आहे. राज्यात भाजपचे सरकार आल्यावर वेगळा विदर्भ करू असे आश्वासन देण्यात आले होेते. भारतीय जनता पक्षाचे शासन येवून आठ महिन्याचा कालावधी होत आहे. असे असतानाही वेगळ्या विदर्भ राज्याकरिता कुठल्याही हालचाली होताना दिसत नाही. यामुळे शुक्रवारी जिल्ह्यात सर्वत्र मुख्यमंत्री व पंतप्रधान यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्याचा इशारा देण्यात आला होता. आंदोलनात माजी आमदार सरोज काशिकर, गंगाधर मुटे, भालशंकर यांच्यासह समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.(प्रतिनिधी)केवळ निषेध व्यक्त करण्यावरच समाधानआश्वासन देऊनही स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण न केल्यामुळे स्वतंत्र विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने मुख्यमंत्री व प्रधानमंत्री यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले जाणार होते. ठरल्याप्रमाणे महात्मा गांधी पुरळ्याजवळ कार्यकर्ते गोळा झाले. परंतु तगडा पोलीस बंदोबस्त असल्याने कार्यकर्त्यांना पुतळे जाळता आले नाही. यामुळे केवळ सरकारचा निषेध नोंदवूनच समाधान मानावे लागले. शहरात पुरळ्याचे दहन करण्यात आले नसले तरीही जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये समितीच्या कार्यकतर््यांद्वारे पुतळ्याचे दहन केले जाणार असल्याचे यावेळी मुटे यांनी सांगितले. गोदामातील कामगार मागण्यांकरिता रस्त्यावरशासकीय गोदामात काम करणाऱ्या कामगारांच्या राष्ट्रीय कष्टकरी पंचायतीच्यावतीने कामगार दिनी शुकवारी महात्मा गांधी पुतळ्याजवळ विविध मागण्यांकरिता आंदोलन करण्यात आले. यावेळी महत्मा गांधी यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून कामगारांनी आंदोलन मागे घेतले. मागण्यांच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या. शेतकरी शेतमजूर व असंघटित कामगारांसाठी असलेल्या सामाजिक सुरक्षा कायद्याची अंमलबजावणी करावी, बाजार समितीत महिला कामगारांना योग्य न्याय मिळावा, वृद्ध कामगारांना पेंशन मिळावी तसेच माथाडी कायद्याची अंमलबजावणी व्हावी आदी अनेक मागण्या राष्ट्रीय कष्टकरी पंचायतच्या वतीने केल्या जात आहे. परंतु या मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे कामगारदिनी आंदोलन करण्यात आले. परंतु महात्मा गांधी पुतळ्याजवळ पोलिसांचा बंदोबस्त असल्याने कामगारांना केवळ निषेध नोंदवून पुतळ्याजवळून काढता पाय घ्यावा लागला.